शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

राऊतांचं ‘आमदार आपल्या दारी अभियान’; सोपलही लागले कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:22 IST

विधानसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांतच कोरोनाचे संकट आल्यामुळे शहर व तालुक्यातील राजकीय वातावरण काहीसे शांत होते. मात्र, कोरोना कमी ...

विधानसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांतच कोरोनाचे संकट आल्यामुळे शहर व तालुक्यातील राजकीय वातावरण काहीसे शांत होते. मात्र, कोरोना कमी आला आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यातील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले. आता पुढील काही महिन्यांत बार्शी नगरपालिकेची निवडणूक आहे, तसेच वैराग ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यास त्याठिकाणीदेखील निवडणूक होणार आहे. या दोन्ही पालिकांच्या निवडणुका म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीमच ठरणार आहे़

दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था या लोकांच्या मूलभूत प्रश्नांशी निगडित अशा आहेत. सध्या वैराग ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे निरंजन भूमकर यांचे वर्चस्व होते. मात्र, सध्यातरी शासनाने नगरपंचायतीत रूपांतर करण्याची प्रक्रिया ही अंतिम केलेली नाही. नोव्हेंबर महिन्यात बार्शी नगरपालिकेची मुदत संपणार आहे. त्यामुळे हे सत्ताकेंद्र आपल्या ताब्यात घेण्यासाठी या प्रमुख दोन नेत्यांसोबत राजेंद्र मिरगणे व भाऊसाहेब आंधळकर हे प्रयत्नशील आहेत. नगरपालिकेवर सध्या आ. राजेंद्र राऊत गटाची सत्ता आहे. चाळीसपैकी २९ नगरसेवकांसह नगराध्यक्ष त्यांच्या गटाचा आहे, तर सोपल गटाचे ११ सदस्य निवडून आले होते.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. राजेंद्र राऊत यांनी ‘आमदार आपल्या दारी’ हे संपर्क अभियान सुरू केले आहे. शहरात कोट्यवधींची केलेली विकासकामे हे त्यांचे बलस्थान आहे, तर दुसरीकडे माजी आ. दिलीप सोपल हे मध्यंतरीच्या काळात काहीसे शांत होते. मात्र, त्यांनीदेखील अंग झटकून कामाला सुरुवात केल्याचे दिसत आहे. सार्वजनिक कार्यक्रमांतील त्यांची उपस्थिती ही वाढली आहे. वैरागला संपर्क कार्यालय सुरू करून दोन दिवस वैरागकरांसाठी देण्याचे जाहीर केले आहे. सोमवारीच पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांची शहर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सोपल यांनी भेट घेतली आहे़ भाऊसाहेब आंधळकर हेदेखील अन्नछत्राच्या माध्यमातून सक्रिय आहेत. राजेंद्र मिरगणे हे आ. राऊत यांच्यावर सातत्याने पालिकेतील विकास कामांच्या गुणवत्तेवर टीका करून चर्चेत आहेत.

----

एकत्र लढणार की, सवतेसुभे मांडणार

आ. राऊत यांच्या विरोधात दिलीप सोपल, राजेंद्र मिरगणे व भाऊसाहेब आंधळकर हे एकत्र येऊन लढणार, की आपले सवतेसुभे मांडणार यावरदेखील या निवडणुकीचे भावितव्य अवलंबून आहे. शहरात काँग्रेसला मानणारादेखील एक वर्ग आहे. शहराध्यक्ष जीवदनदत्त अरगडे हेदेखील सोशल मीडियाच्या माध्यातून, तसेच कार्यक्रमांच्या माध्यमातून सक्रिय आहेत.