शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

राऊतांचं ‘आमदार आपल्या दारी अभियान’; सोपलही लागले कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:22 IST

विधानसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांतच कोरोनाचे संकट आल्यामुळे शहर व तालुक्यातील राजकीय वातावरण काहीसे शांत होते. मात्र, कोरोना कमी ...

विधानसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांतच कोरोनाचे संकट आल्यामुळे शहर व तालुक्यातील राजकीय वातावरण काहीसे शांत होते. मात्र, कोरोना कमी आला आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यातील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले. आता पुढील काही महिन्यांत बार्शी नगरपालिकेची निवडणूक आहे, तसेच वैराग ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यास त्याठिकाणीदेखील निवडणूक होणार आहे. या दोन्ही पालिकांच्या निवडणुका म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीमच ठरणार आहे़

दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था या लोकांच्या मूलभूत प्रश्नांशी निगडित अशा आहेत. सध्या वैराग ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे निरंजन भूमकर यांचे वर्चस्व होते. मात्र, सध्यातरी शासनाने नगरपंचायतीत रूपांतर करण्याची प्रक्रिया ही अंतिम केलेली नाही. नोव्हेंबर महिन्यात बार्शी नगरपालिकेची मुदत संपणार आहे. त्यामुळे हे सत्ताकेंद्र आपल्या ताब्यात घेण्यासाठी या प्रमुख दोन नेत्यांसोबत राजेंद्र मिरगणे व भाऊसाहेब आंधळकर हे प्रयत्नशील आहेत. नगरपालिकेवर सध्या आ. राजेंद्र राऊत गटाची सत्ता आहे. चाळीसपैकी २९ नगरसेवकांसह नगराध्यक्ष त्यांच्या गटाचा आहे, तर सोपल गटाचे ११ सदस्य निवडून आले होते.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. राजेंद्र राऊत यांनी ‘आमदार आपल्या दारी’ हे संपर्क अभियान सुरू केले आहे. शहरात कोट्यवधींची केलेली विकासकामे हे त्यांचे बलस्थान आहे, तर दुसरीकडे माजी आ. दिलीप सोपल हे मध्यंतरीच्या काळात काहीसे शांत होते. मात्र, त्यांनीदेखील अंग झटकून कामाला सुरुवात केल्याचे दिसत आहे. सार्वजनिक कार्यक्रमांतील त्यांची उपस्थिती ही वाढली आहे. वैरागला संपर्क कार्यालय सुरू करून दोन दिवस वैरागकरांसाठी देण्याचे जाहीर केले आहे. सोमवारीच पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांची शहर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सोपल यांनी भेट घेतली आहे़ भाऊसाहेब आंधळकर हेदेखील अन्नछत्राच्या माध्यमातून सक्रिय आहेत. राजेंद्र मिरगणे हे आ. राऊत यांच्यावर सातत्याने पालिकेतील विकास कामांच्या गुणवत्तेवर टीका करून चर्चेत आहेत.

----

एकत्र लढणार की, सवतेसुभे मांडणार

आ. राऊत यांच्या विरोधात दिलीप सोपल, राजेंद्र मिरगणे व भाऊसाहेब आंधळकर हे एकत्र येऊन लढणार, की आपले सवतेसुभे मांडणार यावरदेखील या निवडणुकीचे भावितव्य अवलंबून आहे. शहरात काँग्रेसला मानणारादेखील एक वर्ग आहे. शहराध्यक्ष जीवदनदत्त अरगडे हेदेखील सोशल मीडियाच्या माध्यातून, तसेच कार्यक्रमांच्या माध्यमातून सक्रिय आहेत.