शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

राऊतांचं ‘आमदार आपल्या दारी अभियान’; सोपलही लागले कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:22 IST

विधानसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांतच कोरोनाचे संकट आल्यामुळे शहर व तालुक्यातील राजकीय वातावरण काहीसे शांत होते. मात्र, कोरोना कमी ...

विधानसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांतच कोरोनाचे संकट आल्यामुळे शहर व तालुक्यातील राजकीय वातावरण काहीसे शांत होते. मात्र, कोरोना कमी आला आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यातील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले. आता पुढील काही महिन्यांत बार्शी नगरपालिकेची निवडणूक आहे, तसेच वैराग ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यास त्याठिकाणीदेखील निवडणूक होणार आहे. या दोन्ही पालिकांच्या निवडणुका म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीमच ठरणार आहे़

दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था या लोकांच्या मूलभूत प्रश्नांशी निगडित अशा आहेत. सध्या वैराग ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे निरंजन भूमकर यांचे वर्चस्व होते. मात्र, सध्यातरी शासनाने नगरपंचायतीत रूपांतर करण्याची प्रक्रिया ही अंतिम केलेली नाही. नोव्हेंबर महिन्यात बार्शी नगरपालिकेची मुदत संपणार आहे. त्यामुळे हे सत्ताकेंद्र आपल्या ताब्यात घेण्यासाठी या प्रमुख दोन नेत्यांसोबत राजेंद्र मिरगणे व भाऊसाहेब आंधळकर हे प्रयत्नशील आहेत. नगरपालिकेवर सध्या आ. राजेंद्र राऊत गटाची सत्ता आहे. चाळीसपैकी २९ नगरसेवकांसह नगराध्यक्ष त्यांच्या गटाचा आहे, तर सोपल गटाचे ११ सदस्य निवडून आले होते.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. राजेंद्र राऊत यांनी ‘आमदार आपल्या दारी’ हे संपर्क अभियान सुरू केले आहे. शहरात कोट्यवधींची केलेली विकासकामे हे त्यांचे बलस्थान आहे, तर दुसरीकडे माजी आ. दिलीप सोपल हे मध्यंतरीच्या काळात काहीसे शांत होते. मात्र, त्यांनीदेखील अंग झटकून कामाला सुरुवात केल्याचे दिसत आहे. सार्वजनिक कार्यक्रमांतील त्यांची उपस्थिती ही वाढली आहे. वैरागला संपर्क कार्यालय सुरू करून दोन दिवस वैरागकरांसाठी देण्याचे जाहीर केले आहे. सोमवारीच पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांची शहर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सोपल यांनी भेट घेतली आहे़ भाऊसाहेब आंधळकर हेदेखील अन्नछत्राच्या माध्यमातून सक्रिय आहेत. राजेंद्र मिरगणे हे आ. राऊत यांच्यावर सातत्याने पालिकेतील विकास कामांच्या गुणवत्तेवर टीका करून चर्चेत आहेत.

----

एकत्र लढणार की, सवतेसुभे मांडणार

आ. राऊत यांच्या विरोधात दिलीप सोपल, राजेंद्र मिरगणे व भाऊसाहेब आंधळकर हे एकत्र येऊन लढणार, की आपले सवतेसुभे मांडणार यावरदेखील या निवडणुकीचे भावितव्य अवलंबून आहे. शहरात काँग्रेसला मानणारादेखील एक वर्ग आहे. शहराध्यक्ष जीवदनदत्त अरगडे हेदेखील सोशल मीडियाच्या माध्यातून, तसेच कार्यक्रमांच्या माध्यमातून सक्रिय आहेत.