शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

राईनपाडा हत्याकांड प्रकरण ; ‘त्या’ चौघांच्या अस्थी बांधल्या झाडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 11:35 IST

शासनाच्या आश्वासनाची पूर्तता झाल्याशिवाय अस्थी विसर्जन नाही : राईनपाडा हत्याकांडातील मृतांच्या कुटुंबीयांचा निर्णय

ठळक मुद्देराईनपाडा हत्याकांडातील मृतांच्या कुटुंबीयांचा निर्णय शासनाच्या आश्वासनाची पूर्तता झाल्याशिवाय अस्थी विसर्जन नाही

मंगळवेढा :  धुळे येथील राईनपाडा हत्याकांडातील त्या मृतांच्या कुटुंबीयांनी शासनाकडून मदतीच्या आश्वासनाची पूर्तता झाल्याशिवाय अस्थी विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आहे़ मृत चौघांच्या अस्थी कपड्यामध्ये बांधून झाडाला लटकविण्यात आल्या आहेत. दरम्यान, नुकताच त्या मृत चौघांचा दशक्रिया विधी पार पडल्यानंतर कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला आहे़

धुळे येथील राईनपाडा परिसरात खवे व मानेवाडी येथील भारत माळवे, भारत भोसले, दादा भोसले, आप्पासाहेब शिंदे व राजेंद्र भोसले हे पाच जण भिक्षा मागण्यासाठी गेले असता तेथील ग्रामस्थांनी मुले पळविणारी टोळी असल्याचा समज करून त्यांची निर्घृण हत्या केली होती. नुकताच या मयतांचा त्यांच्या गावी दशक्रिया विधी पार पडला. दशक्रिया विधीला अस्थीचे नदीच्या पात्रात विसर्जन करण्याची परंपरा आहे. मात्र या कुटुंबीयांनी शासनाने घोषित केलेली १० लाखांची आर्थिक मदत, घरकुल, जमीन, ओळखपत्र, शासकीय नोकरी आदींची पूर्तता झाल्याशिवाय अस्थीचे विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आहे़ 

त्या मृतदेहांच्या अस्थी एका कपड्यामध्ये गुंडाळून लिंबाच्या झाडाला लटकावल्याचे भोसले कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. भारत भोसले व दादा भोसले हे दोघे सख्खे भाऊ या घटनेत मयत झाल्याने त्या कुटुंबावर आसमानी संकट कोसळले असून, घरातील कर्ते पुरूष मृृृत पावल्याने लहान मुलांचे शिक्षण व कुटुंब कसे चालवायचे हा ज्वलंत प्रश्न त्या मृतांच्या पत्नीपुढे उभा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षे पूर्ण होती आली तरी अद्यापही काही समाज भटकंतीचे जीवन जगत निसर्गाशी सामना करीत आहेत़ या समाजाकडे उन्नतीसाठी व्यवसाय असता तर हा समाज भटकंती करीत गेला नसता व त्यांचे जीव वाचले असते, अशी प्रतिक्रिया खवे व मानेवाडी गावातील ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे़

या कुटुंबांना तातडीने मदत निधी मिळावी यासाठी शहर व जिल्ह्यातील विविध संस्था, संघटनांकडून मागणी होत आहे़ लवकरच न्याय मिळले असे सांगितले़

रेशनकार्डही नाहीत !- तालुक्यात जवळपास १० हजार डवरी-गोसावी समाजबांधव आहेत. कचरेवाडी, निंबोणी, खुपसंगी, जित्ती, मारोळी, लवंगी, सलगर (खु), महमदाबाद (हु), गोणेवाडी, पडोळकरवाडी, मानेवाडी, पाटखळ, जुनोनी, येळगी, रड्डे, सिध्दापूर, शिरनांदगी व मंगळवेढा शहरातील धर्मगाव रस्ता आदी ठिकाणी हा समाज वास्तव्यास आहे. हा समाज भटकंती जीवन जगत असल्यामुळे आपल्या लहान मुलाबाळांना सोबत नेत आहेत़ परिणामी मुलांचे शिक्षण बुडवून हा समाज शिक्षणापासून वंचित राहत आहे. अपूर्ण शिक्षणामुळे नोकरीही भेटू शकत नाही. पिढ्यान् पिढ्या आपला पारंपरिक व्यवसाय करून गुजराण करीत आहेत. या भटक्या लोकांना रेशनकार्ड नसल्यामुळे शासनाकडील सवलतीतील धान्य व रॉकेलही मिळू शकत नसल्याच्या त्यांच्या तक्रारी आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस