शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
5
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
8
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
9
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
10
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
11
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
12
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
13
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
14
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
15
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
16
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
17
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
18
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
19
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

राईनपाडा हत्याकांड प्रकरण ; ‘त्या’ चौघांच्या अस्थी बांधल्या झाडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 11:35 IST

शासनाच्या आश्वासनाची पूर्तता झाल्याशिवाय अस्थी विसर्जन नाही : राईनपाडा हत्याकांडातील मृतांच्या कुटुंबीयांचा निर्णय

ठळक मुद्देराईनपाडा हत्याकांडातील मृतांच्या कुटुंबीयांचा निर्णय शासनाच्या आश्वासनाची पूर्तता झाल्याशिवाय अस्थी विसर्जन नाही

मंगळवेढा :  धुळे येथील राईनपाडा हत्याकांडातील त्या मृतांच्या कुटुंबीयांनी शासनाकडून मदतीच्या आश्वासनाची पूर्तता झाल्याशिवाय अस्थी विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आहे़ मृत चौघांच्या अस्थी कपड्यामध्ये बांधून झाडाला लटकविण्यात आल्या आहेत. दरम्यान, नुकताच त्या मृत चौघांचा दशक्रिया विधी पार पडल्यानंतर कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला आहे़

धुळे येथील राईनपाडा परिसरात खवे व मानेवाडी येथील भारत माळवे, भारत भोसले, दादा भोसले, आप्पासाहेब शिंदे व राजेंद्र भोसले हे पाच जण भिक्षा मागण्यासाठी गेले असता तेथील ग्रामस्थांनी मुले पळविणारी टोळी असल्याचा समज करून त्यांची निर्घृण हत्या केली होती. नुकताच या मयतांचा त्यांच्या गावी दशक्रिया विधी पार पडला. दशक्रिया विधीला अस्थीचे नदीच्या पात्रात विसर्जन करण्याची परंपरा आहे. मात्र या कुटुंबीयांनी शासनाने घोषित केलेली १० लाखांची आर्थिक मदत, घरकुल, जमीन, ओळखपत्र, शासकीय नोकरी आदींची पूर्तता झाल्याशिवाय अस्थीचे विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आहे़ 

त्या मृतदेहांच्या अस्थी एका कपड्यामध्ये गुंडाळून लिंबाच्या झाडाला लटकावल्याचे भोसले कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. भारत भोसले व दादा भोसले हे दोघे सख्खे भाऊ या घटनेत मयत झाल्याने त्या कुटुंबावर आसमानी संकट कोसळले असून, घरातील कर्ते पुरूष मृृृत पावल्याने लहान मुलांचे शिक्षण व कुटुंब कसे चालवायचे हा ज्वलंत प्रश्न त्या मृतांच्या पत्नीपुढे उभा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षे पूर्ण होती आली तरी अद्यापही काही समाज भटकंतीचे जीवन जगत निसर्गाशी सामना करीत आहेत़ या समाजाकडे उन्नतीसाठी व्यवसाय असता तर हा समाज भटकंती करीत गेला नसता व त्यांचे जीव वाचले असते, अशी प्रतिक्रिया खवे व मानेवाडी गावातील ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे़

या कुटुंबांना तातडीने मदत निधी मिळावी यासाठी शहर व जिल्ह्यातील विविध संस्था, संघटनांकडून मागणी होत आहे़ लवकरच न्याय मिळले असे सांगितले़

रेशनकार्डही नाहीत !- तालुक्यात जवळपास १० हजार डवरी-गोसावी समाजबांधव आहेत. कचरेवाडी, निंबोणी, खुपसंगी, जित्ती, मारोळी, लवंगी, सलगर (खु), महमदाबाद (हु), गोणेवाडी, पडोळकरवाडी, मानेवाडी, पाटखळ, जुनोनी, येळगी, रड्डे, सिध्दापूर, शिरनांदगी व मंगळवेढा शहरातील धर्मगाव रस्ता आदी ठिकाणी हा समाज वास्तव्यास आहे. हा समाज भटकंती जीवन जगत असल्यामुळे आपल्या लहान मुलाबाळांना सोबत नेत आहेत़ परिणामी मुलांचे शिक्षण बुडवून हा समाज शिक्षणापासून वंचित राहत आहे. अपूर्ण शिक्षणामुळे नोकरीही भेटू शकत नाही. पिढ्यान् पिढ्या आपला पारंपरिक व्यवसाय करून गुजराण करीत आहेत. या भटक्या लोकांना रेशनकार्ड नसल्यामुळे शासनाकडील सवलतीतील धान्य व रॉकेलही मिळू शकत नसल्याच्या त्यांच्या तक्रारी आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस