शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राईनपाडा हत्याकांड प्रकरण ; ‘त्या’ चौघांच्या अस्थी बांधल्या झाडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 11:35 IST

शासनाच्या आश्वासनाची पूर्तता झाल्याशिवाय अस्थी विसर्जन नाही : राईनपाडा हत्याकांडातील मृतांच्या कुटुंबीयांचा निर्णय

ठळक मुद्देराईनपाडा हत्याकांडातील मृतांच्या कुटुंबीयांचा निर्णय शासनाच्या आश्वासनाची पूर्तता झाल्याशिवाय अस्थी विसर्जन नाही

मंगळवेढा :  धुळे येथील राईनपाडा हत्याकांडातील त्या मृतांच्या कुटुंबीयांनी शासनाकडून मदतीच्या आश्वासनाची पूर्तता झाल्याशिवाय अस्थी विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आहे़ मृत चौघांच्या अस्थी कपड्यामध्ये बांधून झाडाला लटकविण्यात आल्या आहेत. दरम्यान, नुकताच त्या मृत चौघांचा दशक्रिया विधी पार पडल्यानंतर कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला आहे़

धुळे येथील राईनपाडा परिसरात खवे व मानेवाडी येथील भारत माळवे, भारत भोसले, दादा भोसले, आप्पासाहेब शिंदे व राजेंद्र भोसले हे पाच जण भिक्षा मागण्यासाठी गेले असता तेथील ग्रामस्थांनी मुले पळविणारी टोळी असल्याचा समज करून त्यांची निर्घृण हत्या केली होती. नुकताच या मयतांचा त्यांच्या गावी दशक्रिया विधी पार पडला. दशक्रिया विधीला अस्थीचे नदीच्या पात्रात विसर्जन करण्याची परंपरा आहे. मात्र या कुटुंबीयांनी शासनाने घोषित केलेली १० लाखांची आर्थिक मदत, घरकुल, जमीन, ओळखपत्र, शासकीय नोकरी आदींची पूर्तता झाल्याशिवाय अस्थीचे विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आहे़ 

त्या मृतदेहांच्या अस्थी एका कपड्यामध्ये गुंडाळून लिंबाच्या झाडाला लटकावल्याचे भोसले कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. भारत भोसले व दादा भोसले हे दोघे सख्खे भाऊ या घटनेत मयत झाल्याने त्या कुटुंबावर आसमानी संकट कोसळले असून, घरातील कर्ते पुरूष मृृृत पावल्याने लहान मुलांचे शिक्षण व कुटुंब कसे चालवायचे हा ज्वलंत प्रश्न त्या मृतांच्या पत्नीपुढे उभा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षे पूर्ण होती आली तरी अद्यापही काही समाज भटकंतीचे जीवन जगत निसर्गाशी सामना करीत आहेत़ या समाजाकडे उन्नतीसाठी व्यवसाय असता तर हा समाज भटकंती करीत गेला नसता व त्यांचे जीव वाचले असते, अशी प्रतिक्रिया खवे व मानेवाडी गावातील ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे़

या कुटुंबांना तातडीने मदत निधी मिळावी यासाठी शहर व जिल्ह्यातील विविध संस्था, संघटनांकडून मागणी होत आहे़ लवकरच न्याय मिळले असे सांगितले़

रेशनकार्डही नाहीत !- तालुक्यात जवळपास १० हजार डवरी-गोसावी समाजबांधव आहेत. कचरेवाडी, निंबोणी, खुपसंगी, जित्ती, मारोळी, लवंगी, सलगर (खु), महमदाबाद (हु), गोणेवाडी, पडोळकरवाडी, मानेवाडी, पाटखळ, जुनोनी, येळगी, रड्डे, सिध्दापूर, शिरनांदगी व मंगळवेढा शहरातील धर्मगाव रस्ता आदी ठिकाणी हा समाज वास्तव्यास आहे. हा समाज भटकंती जीवन जगत असल्यामुळे आपल्या लहान मुलाबाळांना सोबत नेत आहेत़ परिणामी मुलांचे शिक्षण बुडवून हा समाज शिक्षणापासून वंचित राहत आहे. अपूर्ण शिक्षणामुळे नोकरीही भेटू शकत नाही. पिढ्यान् पिढ्या आपला पारंपरिक व्यवसाय करून गुजराण करीत आहेत. या भटक्या लोकांना रेशनकार्ड नसल्यामुळे शासनाकडील सवलतीतील धान्य व रॉकेलही मिळू शकत नसल्याच्या त्यांच्या तक्रारी आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस