शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

पाच तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:25 IST

सोलापूर : जिल्ह्यातील पाच तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक, तर चार तालुक्यांत ९३ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. करमाळा व माळशिरस ...

सोलापूर : जिल्ह्यातील पाच तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक, तर चार तालुक्यांत ९३ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. करमाळा व माळशिरस तालुक्यांत सरासरीच्या ८५ टक्के इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण ९९.९ टक्के इतका पाऊस झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळ्यात ४८१.१ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित आहे. शनिवार दिनांक २५ सप्टेंबरपर्यंत ४८०.६ मि.मी. म्हणजे ९९.९ टक्के इतका पाऊस पडला आहे. मोहोळ, उत्तर सोलापूर, बार्शी, दक्षिण सोलापूर व मंगळवेढा या तालुक्यांत सरासरीच्या १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. मोहोळ तालुक्यात पावसाळ्याच्या चार महिन्यांत ४५७.४ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना ५२७ मि.मी. इतका ११५.३ टक्के, उत्तर तालुक्यात ५५२ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना ६१० मि.मी. ११०.५ टक्के, बार्शी तालुक्यात ५२८ मि.मी. अपेक्षित असताना ५८३ मि.मी. ११०.४ टक्के, दक्षिण सोलापूर तालुक्यात ५३६ मि.मी. अपेक्षित असताना ५५६ मि. मी. म्हणजे १०३.७ टक्के तर मंगळवेढा तालुक्यात ४३४ मि.मी. अपेक्षित असताना ४३९ मि. मी. म्हणजे १०१ टक्के इतका पाऊस पडला आहे.

अक्कलकोट तालुक्यात ९७.९ टक्के, सांगोला तालुक्यात ९६.६ टक्के, पंढरपूर तालुक्यात ९३.७ टक्के, तर माढा तालुक्यात ९३.७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. माळशिरस व करमाळा तालुक्यांत मात्र आतापर्यंत ८५ टक्के इतकाच पाऊस पडला आहे.

---

जिल्य्यातील दोन बोरी व पिंपळगाव ढाळे हे मध्यम तलाव तर १५ लघु होटगी, बोरगाव, शिरवळवाडी, भुरीकवठे, कोरेगाव, गोरमाळे, वालवड, काटेगाव, जवळा, घेरडी, हंगीरगे, ममदापूर, शेळगाव, चारे, कळंबवाडी, जवळगाव हे तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. गळोरगी, डोंबरजवळगे, काझीकणबस, पाथरी, कारी, तावडी, वैराग व घोळसगाव या तलावात ६४ टक्क्यांपेक्षा अधिक पाणी साठा झाला आहे. रामपूर २५ टक्के, तर बीबीदारफळ तलावात ३२ टक्के पाणी साठा झाला आहे.

---

उजनी जलाशयानंतर जिल्ह्यात सर्वाधिक पाणी साठवण क्षमता असलेल्या एकरुख मध्यम प्रकल्पात ६७.३५ टक्के (१.४५ टी.एम.सी.) पाणी आले आहे. हिंगणी ७५.४५ टक्के, जवळगाव ७७.४६ टक्के, मांगी १३.९७ टक्के, आष्टी ५७.३७ टक्के तर बोरी व पिंपळगाव ढाळे हे मध्यम तलाव पूर्ण भरले आहेत.

---

0आठ मध्यम तलावाची १३४.४५ द.ल.घ.मी. इतकी पाणी साठवण क्षमता आहे. प्रत्यक्षात ६७.७० द.ल.घ.मी. म्हणजे ४.७५ टी.एम.सी. पाणी साठा झाला आहे.

0 ५६ लघु तलावात ५६.२६ दलघमी म्हणजे ४१.१५ टक्के पाणी साठा झाला आहे.

-----

फोटो- तलाव भरलेला ...