शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
2
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
3
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
4
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
6
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
7
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
8
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
9
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
10
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
11
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
13
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
14
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
15
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
16
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
17
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
18
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
19
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
20
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार

पाच तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:25 IST

सोलापूर : जिल्ह्यातील पाच तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक, तर चार तालुक्यांत ९३ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. करमाळा व माळशिरस ...

सोलापूर : जिल्ह्यातील पाच तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक, तर चार तालुक्यांत ९३ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. करमाळा व माळशिरस तालुक्यांत सरासरीच्या ८५ टक्के इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण ९९.९ टक्के इतका पाऊस झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळ्यात ४८१.१ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित आहे. शनिवार दिनांक २५ सप्टेंबरपर्यंत ४८०.६ मि.मी. म्हणजे ९९.९ टक्के इतका पाऊस पडला आहे. मोहोळ, उत्तर सोलापूर, बार्शी, दक्षिण सोलापूर व मंगळवेढा या तालुक्यांत सरासरीच्या १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. मोहोळ तालुक्यात पावसाळ्याच्या चार महिन्यांत ४५७.४ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना ५२७ मि.मी. इतका ११५.३ टक्के, उत्तर तालुक्यात ५५२ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना ६१० मि.मी. ११०.५ टक्के, बार्शी तालुक्यात ५२८ मि.मी. अपेक्षित असताना ५८३ मि.मी. ११०.४ टक्के, दक्षिण सोलापूर तालुक्यात ५३६ मि.मी. अपेक्षित असताना ५५६ मि. मी. म्हणजे १०३.७ टक्के तर मंगळवेढा तालुक्यात ४३४ मि.मी. अपेक्षित असताना ४३९ मि. मी. म्हणजे १०१ टक्के इतका पाऊस पडला आहे.

अक्कलकोट तालुक्यात ९७.९ टक्के, सांगोला तालुक्यात ९६.६ टक्के, पंढरपूर तालुक्यात ९३.७ टक्के, तर माढा तालुक्यात ९३.७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. माळशिरस व करमाळा तालुक्यांत मात्र आतापर्यंत ८५ टक्के इतकाच पाऊस पडला आहे.

---

जिल्य्यातील दोन बोरी व पिंपळगाव ढाळे हे मध्यम तलाव तर १५ लघु होटगी, बोरगाव, शिरवळवाडी, भुरीकवठे, कोरेगाव, गोरमाळे, वालवड, काटेगाव, जवळा, घेरडी, हंगीरगे, ममदापूर, शेळगाव, चारे, कळंबवाडी, जवळगाव हे तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. गळोरगी, डोंबरजवळगे, काझीकणबस, पाथरी, कारी, तावडी, वैराग व घोळसगाव या तलावात ६४ टक्क्यांपेक्षा अधिक पाणी साठा झाला आहे. रामपूर २५ टक्के, तर बीबीदारफळ तलावात ३२ टक्के पाणी साठा झाला आहे.

---

उजनी जलाशयानंतर जिल्ह्यात सर्वाधिक पाणी साठवण क्षमता असलेल्या एकरुख मध्यम प्रकल्पात ६७.३५ टक्के (१.४५ टी.एम.सी.) पाणी आले आहे. हिंगणी ७५.४५ टक्के, जवळगाव ७७.४६ टक्के, मांगी १३.९७ टक्के, आष्टी ५७.३७ टक्के तर बोरी व पिंपळगाव ढाळे हे मध्यम तलाव पूर्ण भरले आहेत.

---

0आठ मध्यम तलावाची १३४.४५ द.ल.घ.मी. इतकी पाणी साठवण क्षमता आहे. प्रत्यक्षात ६७.७० द.ल.घ.मी. म्हणजे ४.७५ टी.एम.सी. पाणी साठा झाला आहे.

0 ५६ लघु तलावात ५६.२६ दलघमी म्हणजे ४१.१५ टक्के पाणी साठा झाला आहे.

-----

फोटो- तलाव भरलेला ...