शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

गतवर्षी मे महिन्यात पाऊस

By admin | Updated: June 3, 2014 00:45 IST

यंदा वादळाच्या तडाख्यामुळे तापमानात वाढ

सोलापूर: फेब्रुवारीपासून सतत वादळ, गारा व विजा पडल्याने जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणावर होत आहे. मागील वर्षी ३० व ३१ मे रोजी उत्तर, दक्षिण सोलापूर तालुक्यात चांगला पाऊस झाला होता. सलग दोन वर्षे सोलापूर जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. सोलापूर जिल्ह्याची पाणी पातळी खोलवर गेली होती. निरीक्षण विहिरींची पाण्याची पातळी एवढ्या खोलवर जाण्याची पहिलीच वेळ असल्याचे वरिष्ठ भू वैज्ञानिक कार्यालयाने सांगितले होते; मात्र मागील वर्षी मे महिन्यातच पावसाचे वातावरण तयार झाले होते. ३० व ३१ मे रोजी सोलापूर जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली होती. ३० मे रोजी एकूण २३.४ तर ३१ मे रोजी ७३.८ मि.मी. पाऊस पडला होता. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट व मोहोळ तालुक्यात चांगला पाऊस झाला होता. त्यानंतर पावसाचे वातावरण तसेच राहिले व सतत पाऊस पडत राहिला. पाऊस धो-धो पडला नसला तरी खरीप व रब्बी पिके चांगली येण्यासाठी उपयुक्त होता. याचा फायदा नक्कीच झाला होता. उजनी धरणाची पाणी पातळी वजा ५० झाली होती. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात उजनी धरण परिसर व पुणे जिल्ह्यात पाऊस सुरु झाल्याने उजनीच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली होती. सततच्या पावसाने एकंदरीत चांगले चित्र निर्माण झाले होते

. --------------------

जूनमध्ये वादळी पाऊस

यावर्षी २६ फेब्रुवारी ते ११ मार्च दरम्यान सोलापूर जिल्ह्यात गारपीट, वादळ व विजांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या कालावधीत ७ नागरिकांचा वीज पडल्याने मृत्यू झाला होता. जनावरे मोठ्या प्रमाणावर दगावली, घरांची मोठी पडझड झाली व पिकांची हानीही झाली होती. त्यानंतरही अधूनमधून वादळ, विजा पडणे व गारपीट सुरूच आहे. मान्सून तोंडावर आला असतानाही वादळी पावसाचे थैमान थांबले नाही. याउलट जिल्ह्यात तापमानात वाढ झाली आहे.