शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

सोलापूर जिल्ह्यात हरभºयाचा पेरा अडीच पट वाढला, गव्हाचेही क्षेत्र वाढलेच, ज्वारीचे क्षेत्र यंदा कमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 09:25 IST

जिल्ह्यात यावर्षी दुपटीहून अधिक क्षेत्रावर हरभºयाची पेरणी झाली असून, हरभºयाचे उदंड पीक येण्याची शक्यता आहे. मागील वर्षीच्या दीडपट पेक्षा अधिक क्षेत्रावर हरभºयाचे पीक असल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देरब्बी हंगामातील पेरणीसाठी यावर्षी पावसामुळे उशीर झाला होतासोलापूर जिल्हा हा प्रामुख्याने रब्बीचा व त्यातही ज्वारीची पेरणी क्षेत्र सरासरी मोठ्या प्रमाणावर असतेयावर्षी सरासरी क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे

अरुण बारसकर  सोलापूर दि ६ : जिल्ह्यात यावर्षी दुपटीहून अधिक क्षेत्रावर हरभºयाची पेरणी झाली असून, हरभºयाचे उदंड पीक येण्याची शक्यता आहे. मागील वर्षीच्या दीडपट पेक्षा अधिक क्षेत्रावर हरभºयाचे पीक असल्याचे सांगण्यात आले.रब्बी हंगामातील पेरणीसाठी यावर्षी पावसामुळे उशीर झाला होता. परतीचा पाऊस उशिरापर्यंत पडत राहिल्याने रब्बीची पेरणी दरवर्षीपेक्षा उशिराने सुरू झाली. याचा परिणाम ज्वारीचे क्षेत्र घटण्यामध्ये झाला. सोलापूर जिल्हा हा प्रामुख्याने रब्बीचा व त्यातही ज्वारीची पेरणी क्षेत्र सरासरी मोठ्या प्रमाणावर असते; मात्र यावर्षी सरासरी क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे. यावर्षी पावसाला जून महिन्यातच सुरुवात झाली. यामुळे खरिपातील पिकांचे क्षेत्रही सरासरीपेक्षा वाढले होते. मधल्या कालावधीत खंडित झालेला पाऊस आॅगस्टनंतर सक्रिय झाल्याने ऊस लागवडीवर शेतकºयांनी लक्ष केंद्रीत केले. पाऊस चांगला पडल्याने व उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने उसाचे क्षेत्र अनायसा वाढले आहे. त्यातच परतीचा पाऊस आॅक्टोबरपर्यंत पडत राहिल्याने रब्बीच्या पेरणीवर परिणाम झाला. जिल्ह्याचे ज्वारी पेरणीचे सरासरी क्षेत्र ५ लाख ५६ हजार ८०० हेक्टर होते. प्रत्यक्षात तीन लाख १२ हजार ५०० हेक्टरच्या जवळपास ज्वारीची पेरणी झाल्याची कृषी खात्याची आकडेवारी सांगते. उशिरा वाफसा झालेल्या जमिनीवर शेतकºयांनी मका पीक घेण्याला प्राधान्य दिले. यामुळे सरासरीच्या दीडपट क्षेत्रावर मका पीक घेतले. उशिराने हरभरा व गव्हाची पेरणी केली जाते. ज्वारी व अन्य पिके न घेतलेल्या शिल्लक क्षेत्रावर शेतकºयांनी गहू व हरभºयाची पेरणी केली आहे. गव्हाचे सरासरी क्षेत्र ४२ हजार ८०० हेक्टर क्षेत्र असताना प्रत्यक्षात ५५ हजार ३०० हेक्टरवर तर हरभºयाचे सरासरी क्षेत्र ३६ हजार ६०० हेक्टर असताना प्रत्यक्षात ७८ हजार ८०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. गहू सरासरीच्या दीडपट तर हरभरा सरासरीच्या अडीचपट पेरणी झाली आहे. ------------------मागील वर्षीपेक्षाही अधिक हरभरा च्मागील वर्षी सरासरीच्या दीडपट हरभºयाची पेरणी झाली होती. यावर्षी सरासरीच्या अडीचपट पेक्षाही अधिक क्षेत्रावर हरभºयाचे पीक असल्याचे कृषी खात्याकडून सांगण्यात आले. यावर्षी हरभºयाचे अधिक उत्पादन झाले तर दराची मोठी घसरण होईल अशी भीती कृषी अधिकारी व शेतकºयांमधून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासनाने हरभºयाचे दर घसरणार नाहीत, याची दक्षता घ्यावी अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे. -------------------------आता ऊस अन् कांदा सगळीकडे..च्यावर्षी पाऊस चांगला पडल्याने व अन्य पिकांतून पैसे मिळत नसल्याने शेतकºयांनी यावर्षी मोठ्या प्रमाणावर ऊस लावला आहे. सुधारित जातीच्या बेण्याचा वापर  केला आहे. याशिवाय कांद्याला चांगला भाव असल्याने जमेल त्या ठिकाणी कांद्याची लागवड केली आहे. त्यामुळे ऊस व कांदा सगळीकडेच दिसत आहे. -----------------हरभºयाचे क्षेत्र वाढले आहे. पीकही चांगले आहे. अधिक उत्पादन होईल असे वरिष्ठांना बैठकीत सांगितले आहे. जवळपास सर्वच पिकांचे चांगले उत्पादन होण्याचा अंदाज आहे.- बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय