शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सोलापूरातील विमानसेवेचा विषय लांबणीवर, प्राधिकरणाचा पर्याय सिध्देश्वरला अमान्य‘

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 14:25 IST

‘सिद्धेश्वर’च्या चिमणीचा अहवाल : भारतीय विमानतळ प्राधिकरणाने तीन जागा सुचविल्या 

ठळक मुद्देसात दिवस लिपिकाकडे राहिला अहवालविषय पुन्हा प्रलंबित राहणारजिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाºयांना काही देणे-घेणे नाही

सोलापूर : सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याला पर्यायी चिमणी उभारण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने तीन जागा सुचविल्या आहेत. या जागा कारखान्याबाहेरील आहेत. तांत्रिकदृष्ट्या त्या खूपच गैरसोयीच्या असल्याने कारखाना प्रशासनाला मान्य होणार नाहीत. त्यामुळे यासंदर्भातील अहवाल आता शासनाला पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

होटगी रस्त्यावरील विमानतळावरून नियमित विमानसेवा सुरू करण्यास सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा असल्याचा अहवाल विमानतळ प्राधिकरणाने दिला आहे. कारखाना प्रशासनाने चिमणी हटविण्याची तयारी दर्शविली आहे. पर्यायी चिमणी उभारण्यास जागा सुचविण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाºयांनी ६ जून रोजी कारखानास्थळावर जाऊन पाहणी केली. प्राधिकरणाचे सहसरव्यवस्थापक गिरीश श्रीवास्तव, रणजितकुमार चंदा, विमानतळ विकास कंपनीचे संतोष कौलगी यांच्यासह कारखान्याचे तांत्रिक अधिकारी उपस्थित होते.

प्राधिकरणाने दिलेला अहवाल मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासमोर आला. डॉ. भोसले म्हणाले, पाहणीपूर्व बैठकीत प्राधिकरणाने कारखाना प्रशासनाला तीन जागा सुचविल्या. त्या कारखान्याला अमान्य आहेत. पाहणीचा अहवाल शासनाला सादर करण्यात येईल. एनटीपीसीच्या चिमणीला कोणत्याही प्रकारचा अडथळा नसल्याचेही प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

सात दिवस लिपिकाकडे राहिला अहवालच्भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाºयांनी ७ जून रोजी आपला अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेकडे सादर केला. मुळातच चिमणीचा विषय महत्त्वाचा असल्याने हा अहवाल निवासी उपजिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकाºयांकडेच आणून द्यावा, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले होते. मात्र विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकांनी एका कर्मचाºयामार्फत ७ जून रोजी तो जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेकडे पोहोच केला.

सामान्य शाखेतील लिपिकांनाही या अहवालाचे महत्त्व लक्षात आले नाही. त्यामुळे तो सामान्य शाखेतच राहिला. विशेष म्हणजे या अहवालाच्या प्राप्तीची नोंद मंगळवार, १२ जूनपर्यंत झालीच नसल्याचेही दिसून आले. पत्रकारांनी सायंकाळी विचारपूस केल्यानंतर लिपिकांनी शोधमोहीम सुरू केली. 

विषय पुन्हा प्रलंबित राहणारच्उडान योजनेच्या माध्यमातून शासन सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीमुळे ही सेवा सुरू होऊ शकत नसल्याचे विमानतळ विकास कंपनीचे म्हणणे आहे. विमानतळ प्राधिकरणाने कारखान्यापासून दोन किमी अंतरावर चिमणी उभारावी, असे सुचविले आहे. आता शासन आणि कारखाना प्रशासनावर यावर काय निर्णय घेते याकडेही लक्ष असणार आहे. निर्णय होईपर्यंत विमानसेवेचा विषय प्रलंबित राहणार आहे.

कर्मचाºयांना काही देणे-घेणे नाहीसोलापुरात विमानसेवा सुरू व्हावी आणि सिद्धेश्वरच्या चिमणीचा विषय मार्गी लागावा, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ते नियमितपणे विमानतळ विकास कंपनी, भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याशी संपर्क ठेवून आहेत. जिल्हाधिकाºयांच्या पुढाकारामुळे प्राधिकरणाच्या अधिकाºयांनी सोलापुरात येऊन पाहणी केली. अहवालही सादर केला, परंतु तो विमानतळ विकास कंपनीचे सोलापुरातील अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिकांच्या अनास्थेमुळे जिल्हाधिकाºयांपर्यंत पोहोचण्यास वेळ लागला. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय