शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

ग्रामीण महाराष्टच्या समृद्धीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार : प्रभाकर देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 16:18 IST

सोलापूर : प्रशासनात काम करीत असताना शासनाच्या अनेक योजना प्रभावीपणे राबविल्या. ग्रामीण महाराष्टच्या समृद्धीसाठी नेमके काय करावे लागेल, याचा अनुभव आला. सेवानिवृत्तीनंतरही सध्या माणदेश फाउंडेशनच्या माध्यमातून गटशेती, कौशल्य विकास, जलसंधारण, शिक्षण या महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये काम करीत असल्याची माहिती पुण्याचे सेवानिवृत्त विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिली. प्रभाकर देशमुख यांनी ‘लोकमत भवन’ला ...

ठळक मुद्देमाण तालुक्यात माणदेश फाउंडेशनच्या वतीने ‘वृक्ष माझा सखा’ हा अभिनव उपक्रमग्रामीण महाराष्टचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही - देशमुख

सोलापूर : प्रशासनात काम करीत असताना शासनाच्या अनेक योजना प्रभावीपणे राबविल्या. ग्रामीण महाराष्टच्या समृद्धीसाठी नेमके काय करावे लागेल, याचा अनुभव आला. सेवानिवृत्तीनंतरही सध्या माणदेश फाउंडेशनच्या माध्यमातून गटशेती, कौशल्य विकास, जलसंधारण, शिक्षण या महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये काम करीत असल्याची माहिती पुण्याचे सेवानिवृत्त विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिली.

 प्रभाकर देशमुख यांनी ‘लोकमत भवन’ला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी ‘लोकमत’चे संपादक राजा माने आणि सहायक सरव्यवस्थापक रमेश तावडे यांनी त्यांचे स्वागत केले. देशमुख पुढे बोलताना म्हणाले, भविष्याचा विचार केला तर पाणी आणि शिक्षण हे दोन प्रश्न महत्त्वाचे आहेत. या प्रश्नांवर योग्यरीतीने काम केल्यास ग्रामीण महाराष्टचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. देशमुख यांनी विविध पदांवर काम केले आहे. पंढरपूर, सोलापूर, पुणे, बारामती, पुणे अशा अनेक ठिकाणी काम केले आहे. कोल्हापूरला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना लोकसहभागातून शाळांची सुधारणा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी राबविला. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचे नूतनीकरण (आयएसओ) करून शिक्षण पद्धतीत आमूलाग्र सुधारणा केली. यामुळे गुणवत्ताही वाढली. हा ‘कोल्हापूर पॅटर्न’ महाराष्टत अनेक ठिकाणी राबविण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांची गळती थांबल्याचे देशमुख यांनी सांगितले. पुण्यातील राजर्षी शाहू अकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांना कौशल्य विकासावर आधारित प्रशिक्षण देण्यात येत आहे. १० हजार मुलांना असे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यातील ६ हजार ७०० मुले सध्या व्यवसाय किंवा नोकरी यशस्वीपणे करीत आहेत. स्पर्धा परीक्षेबाबतही युवकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. यासाठी पुण्यातील नामांकित ३४ संस्थांशी सहकार्याचा करार केला आहे. २०११ आणि २०१२ अशी दोन वर्षे राज्यात सलग दुष्काळ पडला. शिक्षण व्यवस्था सुधारण्याच्या धर्तीवर ‘जलयुक्त गाव’ ही योजना माझ्या प्रयत्नातून सुरू केली. लोकचळवळीतून केलेल्या कामांद्वारे आठ टीएमसी पाणी साठल्याचे देशमुख यांनी सांगितले. एक टीएमसी पाणी साठविण्यासाठी शासनाला ३०० कोटी खर्च येतो. आठ टीएमसी पाणी साचल्यामुळे शासनाचे २४०० कोटी रुपये वाचले आहेत, असे देशमुख म्हणाले.

गटशेतीचा लाभ- अल्पभूधारक शेतकºयांनी एकत्र येऊन गटशेती करण्यासाठी माणदेश फाउंडेशनच्या वतीने प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रभाकर देशमुख म्हणाले. १५-२० शेतकरी एकत्र आल्यास उत्पादन, दर्जा आणि मार्केटिंगसंदर्भातली दोन दिवसीय कार्यशाळा सध्या फाउंडेशनच्या वतीने गरजेनुसार घेण्यात येते. या कार्यशाळेत शरद पवार यांची शेतीवरील भाषणे आणि सर्व क्षेत्राील तज्ज्ञांचे मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.

‘वृक्ष माझा सखा’- माण तालुक्यात माणदेश फाउंडेशनच्या वतीने ‘वृक्ष माझा सखा’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. तालुक्यातील सर्व शाळांमधील १० हजार ५०० मुलांना झाड दिले. या झाडाचे ५२ आठवडे संवर्धन करायचे. यानंतर वृक्षसंवर्धनावर निबंध लिहायचा, असा आगळा-वेगळा उपक्रम राबविल्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षसंवर्धनाचे काम झाल्याचे प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयJalyukt Shivarजलयुक्त शिवार