शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

पोलीस प्रशासनाचा रोख केवळ मंदिरांवरच; टी. राजासिंह यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 14:26 IST

सोलापूर : कायद्याचा बडगा केवळ दाखवून पोलीस प्रशासन अतिक्रमणाच्या नावाखाली प्रशासन मंदिरे पाडण्याचे काम करत आहे. अन्य  धर्मियाच्या प्रार्थना ...

ठळक मुद्देहिंदू राष्ट्र जागृती सभेच्या वतीने जय भवानी हायस्कूलच्या पटांगणावर जाहीर सभाधर्मांतर, गोहत्या, हिंदुत्ववादी नेते आणि संतांच्या हत्या अशा अनेक समस्या आपल्यासमोर उभ्या आहेत - आमदार राजसिंह

सोलापूर : कायद्याचा बडगा केवळ दाखवून पोलीस प्रशासन अतिक्रमणाच्या नावाखाली प्रशासन मंदिरे पाडण्याचे काम करत आहे. अन्य  धर्मियाच्या प्रार्थना स्थळांना हातही लावत नाही. धर्मांतराच्या घटनांवरही पायबंद घातला जात नाही. आता या विरोधात कृतिशील पाऊल उचलायला हवे,  असे आवाहन श्रीराम युवासेनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार टी. राजसिंह यांनी केले.

हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या वतीने बुधवारी जय भवानी हायस्कूलच्या पटांगणावर जाहीर सभा पार पडली. यावेळी टी. राजसिंह बोलत होते.  व्यासपीठावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख, हिंदू जनजागृती समिती पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात राज्य समन्वयक मनोज खाड्ये, सनातन संस्थेच्या धर्मप्रसारक स्वाती खाड्ये यांची उपस्थिती होती.

प्रारंभी शंखनाद करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. पुरोहित वेणुगोपाल जिल्ला, पुरोहित नागराज रासकोंडा, पुरोहित भानुचंद्र चिप्पा यांनी वेदमंत्रपठण केले. समितीच्या कार्याचा आढावा हिंदू जनजागृती समितीचे राजन बुणगे यांनी मांडला.

यावेळी आमदार राजसिंह यांनी आपल्या भाषणातून धर्मांतर, गोहत्या, हिंदुत्ववादी नेते आणि संतांच्या हत्या अशा अनेक समस्या आपल्यासमोर उभ्या आहेत. पोलीस प्रशासनाकडून मंदिरे पाडली जाताहेत. अनधिकृत धार्मिक स्थळांची माहिती देऊनही कारवाई केली जात  नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्य समन्वयक मनोज खाड्ये, आणि सनातन संस्थेच्या धर्मप्रसारक स्वाती खाड्ये यांनीही अनेक प्रश्नांवर आवाज उठवून जागे होण्याचे आवाहन केले.

सभेचे सूत्रसंचालन समितीचे विपुल भोपळे आणि हिंदू  विधिज्ञ परिषदेचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी केले. या सभेसाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सोलापूर जिल्ह्यातील हिंदू प्रेमी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :SolapurसोलापूरHindu Janajagruti Samitiहिंदू जनजागृती समिती