शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

कविवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली यांचे सोलापूरात निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 20:24 IST

मराठी आणि तेलुगू साहित्याचा पुल बांधणारे आणि आपल्या आशयघन कवितांनी अवघ्या मराठीजनांना प्रिय असलेले कवीवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली यांचे आज सायंकाळी येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

ठळक मुद्दे त्यांच्या पार्थिवावर श्निवार दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता अत्यंसंस्कार करण्यात येणार कवीवर्य बोल्ली यांच्या पश्चात पत्नी शोभा बोल्ली, दोन मुले, तीन विवाहित मुली, बंधू सत्यनारायण बोल्लीअसा परिवार आहेकवीवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली हे तेलुगू भाषिक होते; पण मराठीत त्यांनी अजोड साहित्यनिर्मिती केली

सोलापूर : मराठी आणि तेलुगू साहित्याचा पुल बांधणारे आणि आपल्या आशयघन कवितांनी अवघ्या मराठीजनांना प्रिय असलेले कवीवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली यांचे आज सायंकाळी येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर श्निवार दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे. कवीवर्य बोल्ली यांच्या पश्चात पत्नी शोभा बोल्ली, दोन मुले, तीन विवाहित मुली, बंधू सत्यनारायण बोल्लीअसा परिवार आहे.

बोल्ली हे मधुमेह आणि हृदयविकाराने आजारी होते. दोन महिन्यापूर्वी त्यांच्यावर येथील मार्कंडेय रूग्णालयात उपचार करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले होते. त्यांची प्रकृती ठिक होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास लेखनासाठी बसले असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

तेलुगू आणि मराठी भाषेच्या आंतरभारतीची भूमिका घेऊन ते आयुष्यभर लेखनमग्न राहिले. प्रख्यात नाटककार म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. शिवाय ते उत्तम चित्रकार होते. कवीवर्य बोल्ली यांच्या साहित्यसेवेचा तत्कालीन आंध्रप्रदेशातही गौरव झाला होता. हैदराबादच्या पोट्टी श्रीरामलू तेलुगू विद्यापीठाने सन २००५ मध्ये डी. लीट. ही पदवी देऊन त्यांना सन्मानित केले होते.

तेलुगू भाषिक असलेल्या बोल्ली यांच्या लेखनाचा प्रवास १९७८ साली ‘मैफल’ या काव्यसंग्रहाने सुरू झाला. या काव्यसंग्रहाला बा. भ. बोरकरांची प्रस्तावना लाभली होती. १९८२ मध्ये ‘झुंबर’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन पु.  ल. देशपांडे यांच्या हस्ते झाले होते. १९९६ मध्ये त्यांनी सहा साहित्यकृती लेखनाचा षटकार मारला होता. यामध्ये सावली (काव्यसंग्रह), गवाक्ष  (,ललित लेख संग्रह),  तेलुगू फुलांचा मराठी सुगंध (तेलुगू - मराठी भाषेचा तौलनिक अभ्यास), एका पंडिताचे मृत्यूपत्र, विरहिणी वासवदत्त (काव्यनाट्य) आदी साहित्यकृतींचा समावेश आहे.कवीवर्य बोल्ली यांनी श्याम मनोहर यांच्या ‘यकृत’ नाटकाचा तेलुगू भाषेत  अनुवाद करून बोल्लीू यांनी आंध्रात या नाटकाला लोकप्रियता मिळवून दिली होती. ‘एका साळियाने’ हे त्यांचे आत्मचरित्र मराठी साहित्यात रसिकप्रिय ठरले. ‘कवीराय रामजोशी’, कृष्णदेवराय या कादंबºयाही रसिकांना प्रभावित करून गेल्या. बोल्ली यांच्या निधनामुळे साहित्यक्षेत्रात तीव्र दु:ख व्यक्त होत असून, मराठी साहित्यातील एक अग्रगण्य साहित्यिक हरपला, अशा भावना येथील साहित्यविश्वातून व्यक्त होत आहेत.ज्ञानेश्वरभक्त कवीकवीवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली हे तेलुगू भाषिक होते; पण मराठीत त्यांनी अजोड साहित्यनिर्मिती केली. ही ज्ञानेश्वर माऊलींची कृपा असल्याचे ते सांगत. आपल्या निवासस्थानी बैठकीच्या खोलीत माऊलींची मोठी प्रतिमा त्यांनी ठेवली होती. माऊलींपुढे नतमस्तक होऊनच त्यांच्या दिवसाची आणि लेखनाची सुरूवात होत असे. पहाट आणि  सांजवेळी लेखन करणे त्यांना नेहमी आवडायचे.

टॅग्स :Solapurसोलापूर