शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

सोलापूरकरांच्या निवेदनाची ‘पीएमओ’ कार्यालयाने घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 14:27 IST

पीएमओ कार्यालयाची स्पष्टता;‘उडान’ ची विमानसेवा सुरु करू, आधी चिमणी हटवा !

ठळक मुद्देपंतप्रधान कार्यालयास सोलापुरात विमान सेवा सुरु करण्याची मागणीभारतीय वायू सेवा सुरक्षा कायद्यांतर्गत सोलापुरात विमान सेवा सुरु करता येणार नाहीपंतप्रधान कार्यालयाकडून काही हालचाली होतील आणि सोलापुरात विमान सेवा सुरु होईल ?

सोलापूर : उडान योजनेत सोलापूरचा समावेश आहे़ सोलापुरात अद्याप विमान सेवा सुरू झालेली नाही़ त्यामुळे सोलापुरात लवकरात लवकर विमान सेवा सुरू व्हावी, अशा मागणीचे निवेदन सोलापुरातील उद्योजक तसेच नागरिकांनी पंतप्रधान कार्यालयाला पाठवले.  सामाजिक कार्यकर्ते विजय कुंदन जाधव यांनी थेट त्यांच्या नावे पीएमओ कार्यालयाला पत्र पाठवून विमान सेवा सुरू करण्याची मागणी केली़ यासोबत सोलापुरातील उद्योजकांनीही याबाबत पीएमओ कार्यालयाला पत्र पाठवले आहे़ सोलापुरातील त्या वाद्ग्रस्त चिमणीकडे बोट दाखवत विमान सेवा सुरु करण्यास ‘पीएमओ’ कार्यालयाने नकार दिला.

भारतीय वायू सेवा सुरक्षा कायद्यांतर्गत सोलापुरात विमान सेवा सुरु करता येणार नाही, असा खुलासा करणारा मेसेज पंतप्रधान कार्यालयाकडून आला आहे. जोपर्यंत चिमणीचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत सोलापुरात विमान सेवा सुरू करता येणार नाही़ असे उत्तर आल्यानंतर सोलापूरकरांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे़ पंतप्रधान कार्यालयाकडून काही हालचाली होतील आणि सोलापुरात विमान सेवा सुरु होईल, अशी अपेक्षा सोलापूरकरांना होती़, विशेष करून उद्योजकांना़ पण, त्यांच्याकडूनही नकार आल्यानंतर पुन्हा एकदा सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणी विरोधात उद्योजकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

पंतप्रधान कार्यालयाकडून २४ जानेवारी २०१८ साली सोलापूर विमानतळाचा उडान योजनेत समावेश करण्यात आला होता़ होटगी रस्त्यावरील हवाई अड्डा अर्थात विमानतळावर विमान उड्डानाला सिद्धेश्वर साखर कारखान्यातील चिमणी अडथळा ठरत आहे़ चिमणीचे प्रकरण राज्य सरकार आणि सर्वोच्च न्यायालयातही गेले़ न्यायालयाने चिमणी पाडण्याचे आदेश दिले.

त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी चिमणी पाडकामाला सुरुवात करण्याचे आदेश मनपा आयुक्तांना दिले़ त्यामुळे सोलापूर महापालिकेने चिमणी पाडण्याचे टेंडरही निघाले़ काही दिवसात चिमणी पाडण्याची प्रक्रिया सुरु होणार होती़ त्यापूर्वीच राज्यात सरकार बदलले़ सरकार बदलल्यानंतर चिमणी पाडकामाचा विषय मागे पडला़ त्यामुळे याबाबत पुढे काय होईल कोणाला काहीच माहिती नाही़ त्यामुळे विमानसेवेचाही प्रश्न अधांतरी राहिला आहे.

..तर सहा महिन्यात सेवा सुरू!- ६ जानेवारी रोजी मी पंतप्रधान कार्यालयास सोलापुरात विमान सेवा सुरु करण्याची मागणी केली़ त्यानंतर एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या रिजनल जनरल कनेक्टिव्हिटी स्क्रीमचे कार्यकारी अधिकारी राज मलिक यांच्याकडून चिमणी प्रश्न सुटल्यानंतर सहा महिन्यात विमान सेवा सुरु करता येर्ईल, असा खुलासा करणारे पत्र मिळाले. चिमणी प्रश्न  सुटल्याशिवाय विमानसेवा सुरु करता येणार नाही, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले़ त्यांच्या उत्तरावर मी असमाधान व्यक्त केले आहे़ सोलापुरात विमानसेवा सुरू व्हावी, अशी पुन्हा मागणी पीएम पोर्टलवर केली आहे, असे सामाजिक कार्यकर्ते विजय कुंदन जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरAirportविमानतळNarendra Modiनरेंद्र मोदीSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय