शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

पंत गेले वाडा पोरका जाहला...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 14:24 IST

ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारकांना श्रध्दांजली; सहवास लाभलेल्या नेत्यांनी जागवल्या आठवणी

केवळ पंढरपूर तालुकाच नव्हे तर जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेला पंढरपूरच्या प्रदक्षिणा मार्गावरील वाडा मंगळवारी पोरका झाला. या वाड्यात आता कार्यकर्त्यांचे मोठे मालक अर्थात सुधाकरपंत परिचारक नसतील. असतील त्या केवळ त्यांच्या आठवणी. सुधाकरपंतांचा सहवास लाभलेल्या जिल्ह्यातील नेत्यांनी ‘लोकमत’कडे त्यांच्या आठवणी जागवल्या.

पंढरपूर तालुक्यात खर्डी येथे ५ आॅक्टोबर १९३५ साली  सुधाकरपंतांचा जन्म झाला. मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतले लहानपणापासून समाजसेवेची वडील कै.रामचंद्र बाळकृष्?ण परिचारक व काका दिवान बहादुर कै. गोविंद उर्फ बाबासाहेब बाळकृष्ण परिचारक यांच्याकडून समाजसेवा व राजकारणाचे बाळकडू मिळाले. त्यांच्या वडिलांनी ३५ वर्ष खर्डी चे सरपंच म्हणून काम केले. तर काका पंढरपूर नगरपालिकेमध्ये अकरा वर्ष नगराध्यक्ष होते. वयाच्या विसाव्या वर्षी समाजकार्य व राजकारणामध्ये सक्रिय भाग घेण्यास सुरुवात केली. सन १९६७ मध्ये पंचायत समितीची  पहिली निवडणूक लढवली त्यात ते पंढरपूर पंचायत समितीचे उपसभापती म्हणून त्यांची निवड झाली. सन १९७२ ला सोलापूर जिल्हा परिषदेचे ते सदस्य म्हणून निवडून गेले. १९७८ मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र ते पराभूत झाले. त्यानंतर १९८५ ते २००९ या कालावधीत ते पंढरपूचे आमदार होते. २००९ साली त्यांनी शरद पवारांच्या आदेशाानुसार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासाठी आपल्या उमेदवारीचा त्याग केला. २०१९ साली ते पुन्हा निवडणूक रिंगणाात उतरले होते. मात्र त्यांचा पराभव झाला.

च्पंढरपूर तालुक्यातील पहिल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत त्यांचा वाटा होता. पंढरपूर मधील अनेक सामाजिक मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम केले. १९८६ साली राज्य शासनाने त्यांचीमोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी कारखान्याचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली. कारखाना डबघाईला आलेला असताना त्यांनी त्याला ऊर्जितावस्थेत आणून प्रगतीपथावर पोहोचवले. जिल्ह्यातील आजारी उद्योगांचे ते डॉक्टर ठरले. त्यामुळे शरद पवारांनी त्यांना सन २००० साली राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्त केले. त्यांनी एसटी महामंडळाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढले: 

च्दि पंढरपूर अर्बन को-आॅपरेटिव बँकेचा कारभारही परिचारक यांच्याकडेच होता.  सन १९७५ ते १९८९  अशी १४ वर्षे बँकेचे चेअरमन म्हणून काम केले. सन १९८३ मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबईचे संचालक म्हणून निवड झाली.पंढरपूरमध्ये गणेश रुग्ण सेवा मंडळ स्थापन करून या संस्थेमार्फत मूकबधिर व मतिमंद विद्यालय सुरू केले. पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळाच्या मार्फत उमा महाविद्यालयाची स्थापना केली.

च्सन १९९३ मध्ये परिचारकांनी आगाशे उद्योगसमूहाचा श्रीपूर ता. माळशिरस येथील साखर कारखाना खरेदी केला. एका खासगी कारखान्याचे रुपांतर त्यांनी सहकारी साखर कारखान्यामध्ये केले. हा कारखाना राज्यातील सर्वाधिक उस देणाºया कारखान्यापैकी एक आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूर