शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पंत गेले वाडा पोरका जाहला...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 14:24 IST

ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारकांना श्रध्दांजली; सहवास लाभलेल्या नेत्यांनी जागवल्या आठवणी

केवळ पंढरपूर तालुकाच नव्हे तर जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेला पंढरपूरच्या प्रदक्षिणा मार्गावरील वाडा मंगळवारी पोरका झाला. या वाड्यात आता कार्यकर्त्यांचे मोठे मालक अर्थात सुधाकरपंत परिचारक नसतील. असतील त्या केवळ त्यांच्या आठवणी. सुधाकरपंतांचा सहवास लाभलेल्या जिल्ह्यातील नेत्यांनी ‘लोकमत’कडे त्यांच्या आठवणी जागवल्या.

पंढरपूर तालुक्यात खर्डी येथे ५ आॅक्टोबर १९३५ साली  सुधाकरपंतांचा जन्म झाला. मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतले लहानपणापासून समाजसेवेची वडील कै.रामचंद्र बाळकृष्?ण परिचारक व काका दिवान बहादुर कै. गोविंद उर्फ बाबासाहेब बाळकृष्ण परिचारक यांच्याकडून समाजसेवा व राजकारणाचे बाळकडू मिळाले. त्यांच्या वडिलांनी ३५ वर्ष खर्डी चे सरपंच म्हणून काम केले. तर काका पंढरपूर नगरपालिकेमध्ये अकरा वर्ष नगराध्यक्ष होते. वयाच्या विसाव्या वर्षी समाजकार्य व राजकारणामध्ये सक्रिय भाग घेण्यास सुरुवात केली. सन १९६७ मध्ये पंचायत समितीची  पहिली निवडणूक लढवली त्यात ते पंढरपूर पंचायत समितीचे उपसभापती म्हणून त्यांची निवड झाली. सन १९७२ ला सोलापूर जिल्हा परिषदेचे ते सदस्य म्हणून निवडून गेले. १९७८ मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र ते पराभूत झाले. त्यानंतर १९८५ ते २००९ या कालावधीत ते पंढरपूचे आमदार होते. २००९ साली त्यांनी शरद पवारांच्या आदेशाानुसार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासाठी आपल्या उमेदवारीचा त्याग केला. २०१९ साली ते पुन्हा निवडणूक रिंगणाात उतरले होते. मात्र त्यांचा पराभव झाला.

च्पंढरपूर तालुक्यातील पहिल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत त्यांचा वाटा होता. पंढरपूर मधील अनेक सामाजिक मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम केले. १९८६ साली राज्य शासनाने त्यांचीमोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी कारखान्याचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली. कारखाना डबघाईला आलेला असताना त्यांनी त्याला ऊर्जितावस्थेत आणून प्रगतीपथावर पोहोचवले. जिल्ह्यातील आजारी उद्योगांचे ते डॉक्टर ठरले. त्यामुळे शरद पवारांनी त्यांना सन २००० साली राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्त केले. त्यांनी एसटी महामंडळाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढले: 

च्दि पंढरपूर अर्बन को-आॅपरेटिव बँकेचा कारभारही परिचारक यांच्याकडेच होता.  सन १९७५ ते १९८९  अशी १४ वर्षे बँकेचे चेअरमन म्हणून काम केले. सन १९८३ मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबईचे संचालक म्हणून निवड झाली.पंढरपूरमध्ये गणेश रुग्ण सेवा मंडळ स्थापन करून या संस्थेमार्फत मूकबधिर व मतिमंद विद्यालय सुरू केले. पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळाच्या मार्फत उमा महाविद्यालयाची स्थापना केली.

च्सन १९९३ मध्ये परिचारकांनी आगाशे उद्योगसमूहाचा श्रीपूर ता. माळशिरस येथील साखर कारखाना खरेदी केला. एका खासगी कारखान्याचे रुपांतर त्यांनी सहकारी साखर कारखान्यामध्ये केले. हा कारखाना राज्यातील सर्वाधिक उस देणाºया कारखान्यापैकी एक आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूर