शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

चैत्र वारीसाठी पंढरपुरात दीड लाख भाविक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 12:29 IST

चैत्र वारी (कामदा एकादशी) असल्याने विठुरायाचे दर्शन घेऊन हा सुखसोहळा डोळ्यात साठविण्यासाठी भाविकांची गर्दी

ठळक मुद्देश्री विठ्ठलाची पदस्पर्श दर्शनरांग  विप्र दत्तघाटापर्यंतदर्शनासाठी भाविकांना केवळ ८ ते १० तास लागत असल्याचे दिसून येते़

प्रभू पुजारीपंढरपूर : सावळ्या विठुरायाच्या भेटीची आस मनी घेऊन चैत्र वारीसाठी राज्याच्या कानाकोपºयातून दीड लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. मंगळवारी चैत्र वारी (कामदा एकादशी) असल्याने विठुरायाचे दर्शन घेऊन हा सुखसोहळा डोळ्यात साठविण्यासाठी भाविक दाखल झाले आहेत़

श्री विठ्ठलाची पदस्पर्श दर्शनरांग  ७ वाजेपर्यंत विप्र दत्तघाटापर्यंत गेली होती़ मात्र मंदिर समितीने उभारलेले पत्राशेड रिकामेच होते़ त्यामुळे दर्शनासाठी भाविकांना केवळ ८ ते १० तास लागत असल्याचे दिसून येते़ भाविकांच्या पायाला चटके बसू नयेत म्हणून मंदिर समितीच्या वतीने दर्शनरांगेत चटई टाकली होती तर उन्हापासून संरक्षणासाठी खांब उभारून मंडप टाकून सावलीची सोय केली होती़ 

पंढरपुरात आषाढी, कार्तिकी, माघ वारीनंतर चैत्र वारी असते़ या वारीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन घेण्यासाठी एसटी, रेल्वे, खासगी वाहनांनी भाविक पंढरीत दाखल होत आहेत. भरउन्हात डोक्यावर रुमाल किंवा टॉवेल टाकून, काखेला किंवा पाठीला अडकविलेली बॅग़़़, हाती भगवा झेंडा घेऊऩ़़ मुखी विठुनामाचा जयघोष करीत़़़ झपाझप पावले टाकत अनेक जण चिमुकल्यांसह महिला, पुरुष मंदिराच्या दिशेने निघाले होते़ त्यामुळे स्टेशन रस्ता, शिवाजी चौक, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट, भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते़ संत गजानन महाराज मठ, संत तनपुरे महाराज मठ, संत कैकाडी महाराज मठ यांसह अन्य मठातही भाविकांची वर्दळ होती़ जे भाविक दाखल झाले ते मात्र मठ, धर्मशाळा, आश्रमशाळेत भजन, प्रवचन, कीर्तनात रंगले होते़ शिवाय काही भाविक चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी जात होते, मात्र पाणी कमी असल्याने काही भाविक त्यातच स्नान करून आणि काही भाविक केवळ हात, पाय व तोंड धुऊन विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी दर्शनरांगेकडे जाताना दिसून आले़

६५ एकर परिसर रिकामाच- ६५ एकर परिसरात आषाढ, कार्तिक व माघ वारीत मोठ्या प्रमाणात गर्दी होते़ किमान एक लाख वारकºयांची सोय या परिसरात केली जाते, मात्र चैत्र वारीसाठी सध्या या परिसरात केवळ २० दिंड्या दाखल झाल्या आहेत़ एकूण ५२ प्लॉट केले असून, या परिसरात २० ते २२ हजार भाविक दाखल झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली़ आलेल्या भाविकांसाठी नळाद्वारे पाण्याची सोय, तात्पुरते शौचालय, विजेची सोय, चोख पोलीस बंदोबस्त, अग्निशमन गाडी आदी सोयी-सुविधा प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत़

पाण्याअभावी भाविकांचे हाल- चैत्र वारीसाठी पंढरीत आलेले भाविक प्रथम चंद्रभागेत पवित्र स्नान करून, भक्त पंडलिकाचे दर्शन घेऊन नंतर दर्शनरांगेतून श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन घेतात़ मात्र चंद्रभागा नदीपात्रात पाणी नसल्याने भाविकांचे हाल होताना दिसून आले़ काही भाविक डबक्यातील पाण्यालाच पवित्र मानून स्नान करीत होते तर काही जण केवळ हातपाय, तोंड धुऊन दर्शनासाठी निघत होते़ वारीसाठी प्रशासनाने पाण्याचे नियोजन न केल्याने श्रीमंत पवार, बाळासाहेब सुतार, युवराज मेंथे, तुकाराम मासाळ या भाविकांनी नाराजी व्यक्त केली़ 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर