शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

चैत्र वारीसाठी पंढरपुरात दीड लाख भाविक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 12:29 IST

चैत्र वारी (कामदा एकादशी) असल्याने विठुरायाचे दर्शन घेऊन हा सुखसोहळा डोळ्यात साठविण्यासाठी भाविकांची गर्दी

ठळक मुद्देश्री विठ्ठलाची पदस्पर्श दर्शनरांग  विप्र दत्तघाटापर्यंतदर्शनासाठी भाविकांना केवळ ८ ते १० तास लागत असल्याचे दिसून येते़

प्रभू पुजारीपंढरपूर : सावळ्या विठुरायाच्या भेटीची आस मनी घेऊन चैत्र वारीसाठी राज्याच्या कानाकोपºयातून दीड लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. मंगळवारी चैत्र वारी (कामदा एकादशी) असल्याने विठुरायाचे दर्शन घेऊन हा सुखसोहळा डोळ्यात साठविण्यासाठी भाविक दाखल झाले आहेत़

श्री विठ्ठलाची पदस्पर्श दर्शनरांग  ७ वाजेपर्यंत विप्र दत्तघाटापर्यंत गेली होती़ मात्र मंदिर समितीने उभारलेले पत्राशेड रिकामेच होते़ त्यामुळे दर्शनासाठी भाविकांना केवळ ८ ते १० तास लागत असल्याचे दिसून येते़ भाविकांच्या पायाला चटके बसू नयेत म्हणून मंदिर समितीच्या वतीने दर्शनरांगेत चटई टाकली होती तर उन्हापासून संरक्षणासाठी खांब उभारून मंडप टाकून सावलीची सोय केली होती़ 

पंढरपुरात आषाढी, कार्तिकी, माघ वारीनंतर चैत्र वारी असते़ या वारीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन घेण्यासाठी एसटी, रेल्वे, खासगी वाहनांनी भाविक पंढरीत दाखल होत आहेत. भरउन्हात डोक्यावर रुमाल किंवा टॉवेल टाकून, काखेला किंवा पाठीला अडकविलेली बॅग़़़, हाती भगवा झेंडा घेऊऩ़़ मुखी विठुनामाचा जयघोष करीत़़़ झपाझप पावले टाकत अनेक जण चिमुकल्यांसह महिला, पुरुष मंदिराच्या दिशेने निघाले होते़ त्यामुळे स्टेशन रस्ता, शिवाजी चौक, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट, भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते़ संत गजानन महाराज मठ, संत तनपुरे महाराज मठ, संत कैकाडी महाराज मठ यांसह अन्य मठातही भाविकांची वर्दळ होती़ जे भाविक दाखल झाले ते मात्र मठ, धर्मशाळा, आश्रमशाळेत भजन, प्रवचन, कीर्तनात रंगले होते़ शिवाय काही भाविक चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी जात होते, मात्र पाणी कमी असल्याने काही भाविक त्यातच स्नान करून आणि काही भाविक केवळ हात, पाय व तोंड धुऊन विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी दर्शनरांगेकडे जाताना दिसून आले़

६५ एकर परिसर रिकामाच- ६५ एकर परिसरात आषाढ, कार्तिक व माघ वारीत मोठ्या प्रमाणात गर्दी होते़ किमान एक लाख वारकºयांची सोय या परिसरात केली जाते, मात्र चैत्र वारीसाठी सध्या या परिसरात केवळ २० दिंड्या दाखल झाल्या आहेत़ एकूण ५२ प्लॉट केले असून, या परिसरात २० ते २२ हजार भाविक दाखल झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली़ आलेल्या भाविकांसाठी नळाद्वारे पाण्याची सोय, तात्पुरते शौचालय, विजेची सोय, चोख पोलीस बंदोबस्त, अग्निशमन गाडी आदी सोयी-सुविधा प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत़

पाण्याअभावी भाविकांचे हाल- चैत्र वारीसाठी पंढरीत आलेले भाविक प्रथम चंद्रभागेत पवित्र स्नान करून, भक्त पंडलिकाचे दर्शन घेऊन नंतर दर्शनरांगेतून श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन घेतात़ मात्र चंद्रभागा नदीपात्रात पाणी नसल्याने भाविकांचे हाल होताना दिसून आले़ काही भाविक डबक्यातील पाण्यालाच पवित्र मानून स्नान करीत होते तर काही जण केवळ हातपाय, तोंड धुऊन दर्शनासाठी निघत होते़ वारीसाठी प्रशासनाने पाण्याचे नियोजन न केल्याने श्रीमंत पवार, बाळासाहेब सुतार, युवराज मेंथे, तुकाराम मासाळ या भाविकांनी नाराजी व्यक्त केली़ 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर