शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पंढरपूर विधानसभा; सध्याच्या सरकारने शेतकऱ्यांना उध्वस्त केलंय : केशव उपाध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 15:33 IST

  पंढरपूर : पंढरपूर -मंगळवेढा मतदार संघाची निवडणूक शेतकरी हित व शेतकरी विरोधी अशी लढाई आहे. ठाकरे यांनी  लॉकडाऊन ...

 पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाची निवडणूक शेतकरी हित व शेतकरी विरोधी अशी लढाई आहे. ठाकरे यांनी  लॉकडाऊन शब्द उच्चारला अन् द्राक्षांचे भाव घसरले. ठाकरे सरकार शेतकऱ्यांना उद्धवस्त करण्याचे काम करत आहे. पंढरपूर तिर्थक्षेत्र असूनही या सरकारने दीड वर्षात नवा पैसा दिला नाही, असे भाजपाचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले.

पंढरपूर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खा. रणजितसिंह निंबाळकर, माजीमंत्री बाळा भेगडे, आ. राहुल कुल, शंतनु दंडवते, बादलसिंह ठाकूर उपस्थित होते.

पुढे उपाध्ये म्हणाले, खा. संजय राऊत यांनी पुन्हा राजकारण करू नये. गुजरात सरकार प्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील कोरोना इंजेक्शन निर्यातीला बंदी घातली तर महाराष्ट्रातील कोरोना इंजेक्शनचा तुटवडा पडला नसता. कोरोनाबाबत राजकारण थंबवावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. परंतु त्यांच्या पक्षातील खा. संजय राऊत यांनी पुन्हा राजकारण सुरू केले आहे. यामुळे ठाकरे यांनी प्रथम स्वतः च्या पक्षातील नेत्यांना आवरावे असेही उपाध्ये यांनी सांगितले.

पवारांनी खालच्या पातळीचे

बोलणे चुकीचे : निंबाळकर

पंढरपूर शहर जरी माझ्या मतदार संघात नसले तरीही मी अनेक वेळा पंढरपूर शहरातील प्रश्न मांडले आहेत. या पावन भूमीत उपमुख्यमंत्री अजित पवार खालच्या पातळीवर बोलून गेले आहेत. त्यांनी गल्ली बोळात जाऊन बॅगा पोच करायचं काम केले आहे. राष्ट्रवादी नसून भ्रष्टवादी असल्याची टीका खा. रणजीतसिंह निंबाळकर यांनी केली.

फडणवीस सोमवारी पंढरपूर मंगळवेढ्यात

मंगळवेढा तालुक्यातील बोराळे, नंदेश्र्वर, मंगळवेढा शहर व पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, गादेगाव, टिळक स्मारक (पंढरपूर शहर) येथे माजी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा सोमवारी होणार असल्याचे भेगडे यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरpandharpur-acपंढरपूरElectionनिवडणूकPoliticsराजकारण