शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

देशाचा शत्रू पाकिस्तान की शेतकरी? खासदार राजू शेट्टी यांचा भांबुडी येथील शेतकरी मेळाव्यात सवाल, भाजप सरकारवर जोरदार टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 14:24 IST

जिल्ह्यातील उसाला भाव कमी का? ऊस तुटल्यानंतर १४ दिवसात रक्कम दिली पाहिजे. नाही दिली तर १५ टक्के व्याज द्यावे, तो देण्याचा कायदा आहे. मग कारखान्याची मालमत्ता जप्त करून शेतकºयांचे पैसे दिले पाहिजेत.

ठळक मुद्दे विकास हवा पण शेतकºयांची थडगी बांधून विकास नको : खा. राजू शेट्टीभांबुर्डी (ता. माळशिरस) येथील काकासाहेब मोटे यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होतेशेतकºयांच्या नुकसानीची एका वर्षाची तफावत ६.५० लाख कोटी : खा. राजू शेट्टी

आॅनलाइन लोकमत सोलापूरमाळशिरस दि २८ : जिल्ह्यातील उसाला भाव कमी का? ऊस तुटल्यानंतर १४ दिवसात रक्कम दिली पाहिजे. नाही दिली तर १५ टक्के व्याज द्यावे, तो देण्याचा कायदा आहे. मग कारखान्याची मालमत्ता जप्त करून शेतकºयांचे पैसे दिले पाहिजेत. कमी रिकव्हरीच्या नावाखाली किती दिवस लूट करणार?, साखरेचे दर पडले म्हणून आम्ही दर कमी घेणार नाही. २०१३ च्या कायद्यानुसार जोपर्यंत शेतकरी संमती देत नाही तोपर्यंत रस्ता करता येत नाही. विकास हवा पण शेतकºयांची थडगी बांधून विकास नको आहे. या सरकारने पाकिस्तानातून माल आयात केला. नेमका या सरकारचा शत्रू कोण पाकिस्तान की शेतकरी? असा सवाल खा. राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.भांबुर्डी (ता. माळशिरस) येथील काकासाहेब मोटे यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी काकासाहेब मोटे, अमर कदम, अमोल हिप्परगे, जयंत बगाडे, अनिल पवार, सुरेश मोटे, भीमराव फुले, राहुल बिडवे, किरण साठे, सरपंच केशव वाघमोडे, देविदास वाघमोडे, आप्पासाहेब कर्चे, प्रेमानंद नरुटे, अ‍ॅड. संजय माने, मदनसिंह जाधव, बापू गायकवाड, शिवाजी पाटील, राजाभाऊ वाघमोडे आदी उपस्थित होते.माळशिरस तालुका एकेकाळी स्वाभिमानी संघटनेचा बालेकिल्ला होता. अनेक वर्षांनंतर खा. शेट्टीचा दौरा झाला. ते म्हणाले, काहीही झाले तरी घामाचा दाम मिळायलाच पाहिजे. स्वामीनाथन आयोगासाठी टाळाटाळ केली जाते. शेतकºयांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढत जातोय. शासनाने जाहीर केलेला हमीभावसुद्धा दिला नाही. शेतकºयांच्या नुकसानीची एका वर्षाची तफावत ६.५० लाख कोटी आहे. अशा सरकारचे उदो उदो करणाºयाला तुडवायलाच पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावेळी रवींद्र मोटे, दादासाहेब  वाघमोडे, रामभाऊ कचरे, खंडू कळसुले, महादेव वाघमोडे आदी उपस्थित होते. --------------------शेतकरी संघटनेची पहिली एन्ट्रीअंतर्गत राजकीय घडामोडीनंतर पहिल्यांदाच शेतकरी संघटनेचा छोटेखानी शेतकरी मेळावा घेण्यात आला. यासाठी मात्र शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याचे आयोजन माजी जि. प. सदस्य काकासाहेब मोटे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. यावेळी राजकारणात पदार्पण केलेल्या  काकांचा उल्लेख जखमी वाघ असा खा. शेट्टी यांनी केला. यावेळी सदाभाऊ खोत यांच्या गाडीची तोडफोड करणारे बापू गायकवाड यांचा सत्कार खा. राजू शेट्टी यांनी केला.------------------इतरांची फटकेबाजी - यावेळी आप्पासाहेब कर्चे यांनी अनेक विषयांना हात घालत नेत्यांवर टीकेची झोड उठवली. जयंत बगाडे यांनी संघटनेच्या कामाचे चित्र उभा करत पक्षाच्या पुढाकाराने शेतकºयांच्या प्रश्नाला वाचा फुटली असून यापुढे  समज-गैरसमज बाजूला ठेवून काम करावे. आपल्या डोक्यावरील कर्जाची नैतिक जबाबदारी आहे. यावेळी काकासाहेब मोटे यांनी शंकर सहकारी, चांदापुरी कारखाना, विजय शुगर व सातारा, लातूर, पुणे, पंढरपूर या राष्ट्रीय महामार्ग बाधित शेतकºयांना आपल्या पुढाकाराने न्याय मिळवून देण्याचे आवाहन केले.

टॅग्स :SolapurसोलापूरRaju Shettyराजू शेट्टी