शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

उद्योगांना ‘बुस्ट’ देणारे पॅकेज; ठोस अंमलबजावणीची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 11:36 IST

आत्मनिर्भर अभियानाचे सोलापुरात स्वागत; व्यापारी-उद्योजकांकडून समाधान

ठळक मुद्देपॅकेजची अंमलबजावणी ठोसपणे झाल्यास आत्मनिर्भर भारत निश्चितच उदयास येईलमायक्रो, लघु आणि मध्यम उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहेउद्योजकांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने उद्योगांना बुस्ट देणारे पॅकेज जाहीर केले

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आर्थिक महामंदीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीतून उद्योजकांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने उद्योगांना बुस्ट देणारे पॅकेज जाहीर केले आहे. यातून मायक्रो, लघु आणि मध्यम उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर अभियानाचे येथील उद्योग जगतातून स्वागत होत आहे. पॅकेजची अंमलबजावणी ठोसपणे झाल्यास आत्मनिर्भर भारत निश्चितच उदयास येईल, अशा भावना सोलापुरातील उद्योजकांनी व्यक्त केल्या आहेत. 

स्वदेशी कंपन्यांना प्रोत्साहन मिळेल- उद्योजकांना विनातारण कर्जाची व्यवस्था पॅकेजद्वारे करण्यात आली आहे. तसेच मायक्रो उद्योगांना एक कोटीपर्यंत गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यात आले आहे. पूर्वी ही मर्यादा २५ लाखांपर्यंत होती, ही दिलासादायक बाब आहे. यातून मायक्रो आणि लघु तसेच मध्यम उद्योगांना फायदा होणार आहे. २०० कोटींपर्यंत टेंडर विदेशी कंपन्यांना देण्याचा निर्णय खूपच चांगला आहे. यातून स्वदेशी कंपन्यांना प्रोत्साहन मिळेल. पॅकेज उद्योगहितैषी आहे, फक्त त्याची अंमलबजावणी चांगल्यारीत्या व्हायला हवी, असे बालाजी अमाईन्सचे कार्यकारी संचालक राम रेड्डी यांनी म्हणाले.

पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केली. गेल्या दोन महिन्यांच्या कोरोनाच्या नकारात्मक पार्श्वभूमीवर अत्यंत पॉझिटिव्ह घटना म्हटली पाहिजे. यासाठी जाहीर केलेले पॅकेजही आकर्षक आहे. यातून लघु आणि मध्यम उद्योगांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल. लोकल ते ग्लोबल ही काळाची गरजच आहे. प्रिसिजन हे लोकल ते ग्लोबलचं सगळ्यात उत्तम उदाहरण आहे. या पॅकेजमुळे देशाच्या मंदावलेल्या अर्थचक्राला गती मिळण्याची शक्यता आहे, असे मला वाटते.- यतीन शहा, प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेड, सोलापूर

सोलापुरातील ९० टक्के यंत्रमाग उद्योजक हे मायक्रो उद्योगात मोडतात. उर्वरित दहा टक्के हे लघुउद्योगात येतात. त्यामुळे या पॅकेजचा फायदा यंत्रमाग उद्योगाला शंभर टक्के होईल. सोलापुरी टॉवेल व चादरला देशांतर्गत बाजारपेठेत मागणी वाढेल.- अंबादास बिंगी, खजिनदार, जिल्हा यंत्रमागधारक संघ

सूक्ष्म, लघु, मध्यम याची लिमिटची व्याख्या वाढविण्याचा केंद्राने आज निर्णय घेतला. तसेच ई पीएफ, इन्कम टॅक्सची तारीख वाढवली. अभय योजना तसेच टीडीएस/टीसीएस यामध्ये २५ टक्के सवलत देण्यात आली. विवाद से विश्वास तक या अभय योजनेला ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ दिली. वीज वितरण कंपनीला ९०,००० कारोडचे अर्थिक सहाय्य दिले . याचे सोलापूर चेंबर आॅफ कॉमर्सने स्वागत केले आहेÞ.- राजू राठी, चेंबर आॅफ कॉमर्स. 

ट्रस्ट व करदाते यांचे परतावे लवकर दिल्याने त्यांना आर्थिक मदत होईल. रेरा प्रोजेक्ट व रजिस्ट्रेशन मुदतीत वाढ व टीडीएस, टीसीएस दरात २५ टक्के कपात झाल्याने कॉन्ट्रॅक्टर निश्चिंत मनाने काम पूर्ण करू शकतील. त्यांना दंड लागू होणार नाही. एकूण शेअर बाजार कोसळत असल्याने त्याचे म्युच्युअल फंडावर परिणाम होतात. परंतु एनबीएफसी, हौसिंग फायनान्स कंपनी व म्युच्युअल फंडासाठी रुपये ३०,००० कोटी दिल्याने त्यांना चांगली कामगिरी करून गुंतवणूकदारांना दिलासा देता येईल. एकूणच आर्थिक तरलता निर्माण केल्याने आर्थिक समतोल राखता येईल.- अश्विनी आशिष दोशी, सीए, माजी अध्यक्ष, सीए असोसिएशन, सोलापूर.

इन्कम टॅक्सला मुदतवाढ मिळाली आहे. तसेच टीडीएसच्या रेटमध्ये कपात झाल्याने व्यवसायातील पैसा व्यवसायातच राहील. याचा दिलासा उद्योजकांना निश्चित मिळेल. मायक्रो व लघु उद्योजकांना यातून शंभर टक्केफायदा होणार आहे. बँकांकडून कर्ज घेण्यात यापूर्वी          अनेक अडचणी येत होत्या, त्या अडचणी आता कमी होतील. लहान उद्योग मोठ्या क्षमतेने गुंतवणूक करायला तयार होतील. पॅकेजमुळे रोजगार वाढेल.   त्याची अंमलबजावणी योग्यरीत्या व्हायला हवी.- व्यंकटेश चन्ना, सीए, सोलापूर.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीGSTजीएसटीTaxकर