शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

सोलापूर जिल्ह्यातील कारी गावचा उस्मानाबाद जिल्ह्यात समावेश होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 19:56 IST

ग्रामस्थांच्या प्रलंबित मागणीला मिळाले यश; फटाके वाजवून केला आनंद व्यक्त

ठळक मुद्देकारी (ता. बार्शी) हे गाव सोलापूर जिल्ह्यात होते. भौगोलिकदृष्ट्या ते सोलापूरपासून खूप दूर होते गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या मागणीला यश आले

कारी : कारी (ता. बार्शी) हे गाव सोलापूर जिल्ह्यातून उस्मानाबाद  जिल्ह्यात समाविष्ट झाल्याचे राजपत्रित अध्यादेश जाहीर झाले. यामुळे नागरिकांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

कारी (ता. बार्शी) हे गाव सोलापूर जिल्ह्यात होते. भौगोलिकदृष्ट्या ते सोलापूरपासून खूप दूर होते. अनेक शासकीय कामासाठी नागरिकांची होणारी ससेहोलपट होत होती. गेल्या अनेक वर्षांपासून गावचा समावेश उस्मानाबाद जिल्ह्यात होण्यासाठी नागरिकांची व ग्रामपंचायत सदस्य विजयसिंह विधाते यांची मागणी होती, परंतु शासकीयस्तरावरून कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नव्हती, असे नागरिकांना वाटत होते.

गतवर्षी जून २0१८ मध्ये राज्यपाल राजपत्रित अधिसूचना गावाचा समावेश उस्मानाबाद जिल्ह्यात होण्याबद्दल हरकत मागवली होती. हरकती कालावधीत गावाचे स्वागत करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक पक्ष व नेत्यांची मांदियाळी झाली होती, परंतु गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या मागणीला यश आले आहे. २७ मे २0१९ रोजी राज्यपाल राजपत्रित अधिसूचना जाहीर झाली असून, १ आॅगस्ट २0१९ पासून कारी (ता. बार्शी) गावाचा समावेश कारी (ता. व जि. उस्मानाबाद) असा होणारा अध्यादेश प्राप्त झाला आहे. 

अध्यादेश प्राप्तमहाराष्ट्र शासन राजपत्र महसूल व वनविभागाच्या २७ मे २0१९ रोजी महाराष्ट्र जमीन महसूल सहित १९६६ क्रमांक प्राफेब २0१८ प्र. क्र. /३४ /म १0 पोट कलम (१)चे खंड चार व सहा महाराष्ट्र शासन उक्त कलम ४ नुसार केलेल्या पूर्व प्रसिद्धीनंतर कारी गावाचा समावेश उस्मानाबाद जिल्ह्यात करण्याचा आदेश महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्यासह सचिव रवीराज फले यांच्याकडून प्राप्त झाला आहे. गावात आदेश सोशल मीडियावर प्राप्त झाल्यामुळे अनेकांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयOsmanabadउस्मानाबादgovernment schemeसरकारी योजना