शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

अवयवदान दिन; जगात दरवर्षी ३ हजार हृदयांचे  होते प्रत्यारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 12:57 IST

जागतिक अवयवदान दिन : अवयवदान वैद्यकीय चमत्कार !

ठळक मुद्दे अवयवदान चळवळीला तीन-चार वर्षांपासून सोलापुरात गती मिळतेयभारतात या चळवळीला २४ वर्षे तर जगात ५१ वे वर्ष पार पडलेदिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये भारतात सर्वप्रथम हृदयाचे प्रत्यारोपण झाले

विलास जळकोटकर सोलापूर: वैद्यकीय क्षेत्रात चमत्कार ठरलेल्या अवयवदान चळवळीला तीन-चार वर्षांपासून सोलापुरात गती मिळतेय. भारतात या चळवळीला २४ वर्षे तर जगात ५१ वे वर्ष पार पडले. १९९४ साली दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये भारतात सर्वप्रथम हृदयाचे प्रत्यारोपण झाले. 

१९८० नंतर ही चळवळ सुरु झाली. शासनाच्या पुढाकाराने या मोहिमेला बळ मिळू लागले आहे. जनतेमध्येही जाणीवजागृती वाढीस लागली आहे. जगामध्ये दरवर्षाला सर्वसाधारणत: ३ हजार हृदयांचे प्रत्यारोपण होते. ही चळवळ म्हणजे समाजाला मिळालेले वरदान असल्याची भावना हृदय शल्यविशारद डॉ. विजय अंधारे यांनी जागतिक अवयवदान दिनाच्या पूर्वसंध्येला लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

१३ आॅगस्ट अवयवदान दिन म्हणून गेल्या ८ वर्षांपासून भारतात साजरा होऊ लागला. अवयवदान ही एक काळाची गरज आहे़ किडनी, डोळे, यकृत या अवयवदानाबरोबरच आजकाल हृदय अवयवदानाची चळवळ वेग घेत आहे. १९६७ साली साऊथ आफ्रिकेमध्ये ख्रिश्चन बर्नाड यांनी एका मनुष्यामधील हृदय दुसºया मनुष्यामध्ये प्रत्यारोपित केले. 

१९८० साली हृदय प्रत्यारोपण झाल्यानंतर शरीर त्याला नाकारू नये म्हणून औषधांचा शोध लागला आणि त्यानंतर या चळवळीने वेग पकडला. भारतामध्ये डॉ़ वेणुगोपाल यांनी पहिले हृदय प्रत्यारोपण दिल्ली येथे एम्स हॉस्पिटलमध्ये १९९४ साली केले. हृदय प्रत्यारोपण झालेले ५० टक्के रुग्ण १० वर्षे व्यवस्थित जगू शकतात. ज्या रुग्णांचे हृदय निकामी झाले आहे, हृदयाचे काम ३५% पेक्षा कमी आहे आणि पेशंटचा रक्तदाब कितीही औषधे दिली, उपाययोजना केल्या तरी वाढत नाही त्यावेळी हदय प्रत्यारोपणाचा पर्याय विचारात घेतला जाऊ शकतो, असे हृदयमित्र अंधारे यांनी स्पष्ट केले.

अवयवदान दिनाच्या निमित्ताने मृत्यूशी कवटाळणाºया आणि ब्रेनडेड झालेल्या रुग्णांच्या नातलगांनी मृत्यूनंतरही आपल्या आप्तचे अवयव कोणाच्यातरी कामी यावेत ही भावना वाढीस लागावी, अशी अपेक्षा वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली. याशिवाय अवयवदान केलेल्या रुग्णाच्या वारसाबद्दल ठोस असे कृतिशील धोरण अवलंबावे, अशीही अपेक्षा सुजाण नागरिकांनी व्यक्त केली.

हृदय प्रत्यारोपणाचे निकष...

हृदय अवयव मिळणे एकूणच कठीण असल्यामुळे हृदय प्रत्यारोपण करताना एखाद्या रुग्णाचा मेंदू मृत (ब्रेन डेड) झाला असेल आणि तो बरे होण्याची काही शक्यता नसेल, त्यांच्या नातेवाईकांनी संमती दिली तरच हृदयासह अन्य अवयवांचे प्रत्यारोपण करता येते. 

रुग्णांचे हृदय प्रथम तपासले जाते. हृदयाचे काम ४५ टक्क्यांपेक्षा जास्त आवश्यक आहे. हृदय देणारा आणि स्वीकारणाºया दोघांचा रक्तगट आणि शरीराचे आकारमान मिळतेजुळते असणे गरजेचे आहे. रक्तदाब व्यवस्थित असेल आणि अवयवदात्याला कोणताही जंतूसंसर्ग नसेल तर त्याच्या अवयवदानाचे प्रत्यारोपण करता येत असल्याचे डॉ. अंधारे यांनी सांगितले. 

सोलापूर अवयवदानात अग्रेसर... सोलापुरात यापूर्वी अश्विनी सहकारी रुग्णालय, अश्विनी ग्रामीण रुग्णालय, कुंभारी येथून उस्मानाबादच्या पार्थ कोळी यांच्यासह अन्य दोघे, शासकीय रुग्णालयात बसवकल्याण येथील ओंकार अशोक महिंद्रकर, यशोधरा हॉस्पिटलमध्ये सविता डिकरे, कालिका महामुनी, चंद्रकांत घोळसगावकर, प्रकाश भागवत, सतीश पलगंटी, कृष्णाहरी बोम्मा आणि आता रवींद्र शिंगाडे अशी अवयवदान केलेल्यांची नावे आहेत. सोलापुरात नवव्यांदा ग्रीन कॅरिडोर निर्माण करुन अवयवदानाच्या दृष्टीने सोलापूर आघाडीवर राहिला आहे.

अवयवदान हे एक वरदान आहे. वैद्यकीय क्षेत्रात हा चमत्कार म्हणावा लागेल. यामुळे अवयव प्रत्यारोपणानंतर हृदयरुग्णाला ३०-३२ वर्षे आयुष्य मिळू शकते. अवयवदानाबद्दल अलीकडच्या काळात जागरुकता वाढते आहे. जनतेमधूनही सकारात्मक सूर भावना निर्माण होत आहे. ती आणखी व्यापक स्वरुपात वाढावी, हीच अपेक्षा.-डॉ. विजय अंधारे, हृदयशल्यविशारद

टॅग्स :SolapurसोलापूरOrgan donationअवयव दान