शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

सोलापुरातील परिवहनला पर्याय...स्मार्ट रिक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 12:45 IST

सोलापुरातील परिवहन व्यवस्था कोलमडलीय

परवा गांधी नगर परिसरात माझ्या गाडीला एका रिक्षाने ठोकरले. मी बाहेर पडून त्याच्याशी बोलेपर्यंत तो पसार झाला. गाडीचा उजवा कोपरा बराच आत गेला. भोवताली गर्दी जमली.  तेवढ्यात एक पोलीसही थांबला. मी त्याला म्हटलं, अहो तुम्ही तरी त्याला थांबवायचं ना? त्याचं उत्तर होतं, काय करणार साहेब, हे असेच माजलेत लेकाचे! तोही निघून गेला. विचार केला की पुढे कुठेतरी ती रिक्षा सापडेलच म्हणून पांजरापोळ चौकापर्यंत शोधाशोध केली. पण व्यर्थ! सोलापुरात हा अनुभव नवा नाही. 

नंतर दोन दिवस विचार करत होतो, गांधी नगर, सात रस्ता ते थेट शिवाजी चौक या परिसरात कुठेही पाहा.. रिक्षांचं कोंडाळं दिसेल. एकाला लागून एक नव्हे चार-चार रिक्षा थांबलेल्या असतात. उरलेल्या चिंचोळ्या जागेतून तुम्हाला जावं लागतं. पोलीस कधीतरी येतात, दंडुका घेऊन दमबाजी करतात. पेपरला बातमी येते... पांजरापोळ चौकाने घेतला  मोकळा श्वास!... पण किती काळ? एक-दोन तासाने पुन्हा तीच अवस्था...!! हे झाले वाहतुकीच्या बाबतीत. रिक्षाने प्रवास करणाºयांचे अनुभव विचारा... ते यापेक्षा भयानक असतील. आॅटो रिक्षात वाजणारा स्पिकर, त्याचा आवाज, रिक्षावाल्याचं रस्त्यावर थुंकणं, प्रवाशांसोबतचा त्याचा व्यवहार, अरेरावी.. सगळंच किळसवाणं असतं. माझा कोणत्याही रिक्षावाल्यावर व्यक्तिगत राग असण्याचे कारण नाही. पण या परिस्थितीत बदल होणार कधी?

याला काही उपाय नाही काय? सोलापुरात परिवहन व्यवस्था कोलमडलीय. महापालिका प्रशासनाची उदासीनता आहेच, त्यात सोलापूरकरांना भेडसावणाºया प्रश्नाशी आपला काही संबंध असतो याची जाणीव पदाधिकाºयांना असलीच पाहिजे असं बंधनही आपल्याकडं नाही. सिटी बस यंत्रणा बंद आहे. त्यामुळे आॅटो रिक्षांची संख्या वाढलीय.  

या सगळ्या समस्येकडे थोडं सकारात्मक दृष्टीने पाहण्यात सोलापुरात सिटी बस एरवीतेरवी बंदच आहे. ती तशीच राहू द्या. फार तर शहराच्या बाहेर ती चालवावी. शहरात मात्र आॅटो रिक्षा ठेवाव्यात. याला अधिक चांगलं कसं करता येईल? याचा विचार करू या. पहिल्यांदा स्क्रॅप रिक्षा रस्त्यावरून बाजूला काढाव्यात. उरलेल्या चांगल्या रिक्षांची नोंदणी करावी. महापालिकेने सर्व आॅटो रिक्षा ताब्यात घ्याव्यात. स्मार्ट सिटीच्या अंतर्गत ही नवी परिवहन व्यवस्था उभी करता येऊ शकते. हे कसे राबवता येईल?

सोलापुरात लोकसंख्येच्या किमान ५० टक्के लोकांकडे स्मार्ट फोन्स आहेत. घरटी एक एक फोन तरी नक्की असेल. महापालिकेने उबेर किंवा ओला कॅबच्या धर्तीवर एक स्वतंत्र मोबाईल अ‍ॅप बनवून घ्यावा. प्रवाशाने आपले डेस्टिनेशन टाकले की जवळचा रिक्षा स्टॉप कुठे आहे, रिक्षांची उपलब्धता, त्यांचे नंबर, ड्रायव्हरचे नाव,  त्याच्या डेस्टिनेशनपर्यंत अंदाजे भाडे काय असेल, अशी सगळी माहिती त्याला मिळावी. 

रिक्षावाल्याने तिथे जाण्यास नकार दिला अथवा भाडे जास्त घेतले, अथवा ओव्हर स्पिडिंग, राँग डेस्टिनेशनला पोहोचवले, की त्याचे क्रेडिट पॉर्इंट कमी होतील. ठराविक क्रेडिट पॉर्इंट कमी झाले की ती रिक्षा रेड लिस्टमध्ये जाईल. अशा रिक्षा ड्रायव्हरना पुन्हा रस्त्यावर धावण्याचा अधिकार नसेल. प्रवाशांना चांगला अनुभव आला, ड्रायव्हरचं बोलणं, वागणं, प्रामाणिकपणा, सभ्यता अनुभवायला आली की क्रेडिट पॉर्इंट देताही आले पाहिजेत.

शेअर रिक्षा की स्वतंत्र रिक्षा असा आॅप्शनही असावा. रिक्षातल्या उपलब्ध जागेनुसार हे ठरवता आले पाहिजे. ज्या रिक्षा या योजनेशी जोडलेल्या आहेत तेवढ्याच रस्त्यावर धावतील. त्यांचे रूट ठरलेले असतील. स्टॉप ठरलेले असतील. डेस्टिनेशन मात्र प्रवाशांच्या गरजेनुसारच असतील. रिक्षातील जीपीएस यंत्रणेनुसार महापालिकेला त्याच्या हालचाली कळतील. प्रत्येक किलोमीटरमागे पन्नास पैसे अथवा एक रुपया महापालिकेला जमा होईल.

या कामासाठी महापालिका आऊटसोर्सिंग करू शकते अथवा स्वत:ची यंत्रणा उभी करू शकते. स्मार्ट शहरात स्मार्ट रिक्षा ही गरज आहे. सोलापुरात इंजिनिअरिंग कॉलेजची कमतरता नाही. असे अ‍ॅप निर्माण करून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा. आरटीओ, पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग घेता येऊ शकतो. परिवहनच्या जागा व्यावसायिक पद्धतीने विकसित करता येतील, बस स्टॉपला रिक्षा स्टॉपमध्ये कन्व्हर्ट करता येईल. रिक्षामध्ये व्यावसायिक जाहिराती घेऊन उत्पन्न वाढवता येईल. सिटी बस फक्त शहराच्या बाहेर असेल.. स्मार्ट सिटीमध्ये फक्त स्मार्ट रिक्षा! कशी वाटली आयडिया?- माधव देशपांडे (लेखक प्रिसिजन उद्योग समूहात जनसंपर्क विभागाचे प्रमुख आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरTrafficवाहतूक कोंडीSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाSmart Cityस्मार्ट सिटी