शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

नीरा खोऱ्यात ५२ टक्केच पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:21 IST

मार्चपासून धरणांतून उन्हाळी आवर्तनाला सुरुवात झाली आहे. नीरा नदीच्या डाव्या कालव्यातून ८२७ तर उजव्या कालव्यातून १५५० क्युसेकने विसर्ग सुरू ...

मार्चपासून धरणांतून उन्हाळी आवर्तनाला सुरुवात झाली आहे.

नीरा नदीच्या डाव्या कालव्यातून ८२७ तर उजव्या कालव्यातून १५५० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. दोन महिन्यांसाठी हे आवर्तन असणार आहे. नीरा खोऱ्यातील चारही धरणात उपलब्ध असलेल्या २५.८६ टीएमसी पाण्याचे उन्हाळी हंगामासाठी नियोजन केले आहे. भाटघर, नीरा देवघर, वीर आणि गुंजवणी या धरणांतील उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजनानुसार उन्हाळी आवर्तन सुरू आहे. सदरचे पाणी शेतकरी व इतरांनी काटकसरीने वापरावे. कालव्यातून नियमबाह्य पद्धतीने सिंचन करू नये, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

तालुकानिहाय सिंचनक्षेत्र

नीरा डाव्या कालव्यावर पुणे जिल्ह्यातील ३७ हजार ७० हेक्टर, तर उजव्या कालव्यावर सातारा व सोलापूर जिल्ह्यातील ६५ हजार ५०६ हेक्टर असे एकूण १ लाख २ हजार ५७६ हेक्टर प्रकल्पीय सिंचनक्षेत्र आहे. डाव्या कालव्यावर पुरंदर तालुक्यातील ४२० हेक्टर, बारामतीमधील १३,७८० हेक्टर आणि इंदापूरमधील २२,८७० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. उजव्या कालव्यावर खंडाळा तालुक्यातील १०६ हेक्टर, फलटण २२,१५८ हेक्टर, माळशिरस ३२,२३६ हेक्टर, पंढरपूर ५,६५६ हेक्टर आणि सांगोला तालुक्यातील २,३५० हेक्टर इतके क्षेत्र अवलंबून आहे.

धरणांतील उपयुक्त पाणीसाठा

भाटघर : १२.८६ : ५६.९९

नीरा देवघर : ५.५२ : ४५.५३

वीर : ५.५६ : ५९.९१ गुंजवणी : २.०२ : ५४.२६