शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

उडीद, मूग, सोयाबीन खरेदीसाठी हमीभाव केंद्रे, २१०७ शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 18:24 IST

जिल्ह्यातील कुर्डूवाडी, दुधनी व बार्शी येथे उडीद, मूग व सोयाबीन खरेदी हमीभाव केंद्रे सुरू करण्यात आली असून, पुढील आठवड्यात सोलापूर व अक्कलकोट येथे केंद्रांची सुरुवात केली जाणार आहे.

ठळक मुद्देकुर्डूवाडी, दुधनी व बार्शी येथे उडीद, मूग व सोयाबीन खरेदी हमीभाव केंद्रेसोलापूर व अक्कलकोटचे केंद्र पुढील आठवड्यात आॅनलाईन नोंदणीसाठी ७/१२ उतारा, आधार कार्ड व बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत जोडावी.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २७ : जिल्ह्यातील कुर्डूवाडी, दुधनी व बार्शी येथे उडीद, मूग व सोयाबीन खरेदी हमीभाव केंद्रे सुरू करण्यात आली असून, पुढील आठवड्यात सोलापूर व अक्कलकोट येथे केंद्रांची सुरुवात केली जाणार आहे. जिल्ह्यातील पाच केंद्रांसाठी २१०७ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे.खरीप हंगामातील उडीद, मूग व सोयाबीनच्या खरेदीसाठी केंदे्र सुरू करण्यात आली असून, शेतकºयांनी हमीभाव केंद्रांवर धान्य विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी करावयाची आहे. आॅनलाईन नोंदणी केली तरच माल हमीभाव केंद्रावर खरेदी केला जाणार आहे. कुर्डूवाडी केंद्रावर ११५१, दुधनी केंद्रावर ५२, बार्शी केंद्रावर ८४१, सोलापूर केंद्रावर ४५ तर अक्कलकोट केंद्रावर १८ अशा २१०७ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. प्रत्यक्षात उडीद, मूग व सोयाबीनच्या खरेदीसाठी कुर्डूवाडी व दुधनीचे हमीभाव केंद्र यापूर्वी सुरू केले असून बार्शीचे हमीभाव केंद्र गुरुवारी सुरू केले आहे. सोलापूर व अक्कलकोटचे केंद्र पुढील आठवड्यात सुरू केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. ---------------तर हमीभावाची प्रतीक्षाच आर्द्रता(ओलावा) व स्वच्छ मालाच्या जाचक नियमामुळे शेतकºयांचे धान्य सध्या कमी किमतीने बाजार समित्यामध्ये  विक्री केले जात आहे. आॅनलाईन नोंदणी केली तरी प्रत्यक्षात धान्य विक्रीसाठी जाण्यासाठी मालाच्या प्रतवारीच्या तपासणीत धान्य नाकारले जाते. यामुळे शेतकरी भाव कमी का?, मिळेना व्यापाºयाच्या हवाली करुन रिकामा होत आहे.  -----------------शेतकºयांनी मूग, उडीद व सोयाबीनची आॅनलाईन नोंदणी करावी. स्वच्छ धान्य नाकारले जाणार नाही. उडिदासाठी प्रतिक्विंटल ५ हजार ४०० रुपये, मुगासाठी प्रतिक्विंटल ५ हजार ५७५ रुपये व सोयाबीनसाठी तीन हजार ५० रुपये दर दिला जाणार आहे.-अविनाश देशमुख, जिल्हा उपनिबंधक, सोलापूर ---------------------एसएमएस जाणार..- आॅनलाईन नोंदणीसाठी ७/१२ उतारा, आधार कार्ड व बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत जोडावी.-  खरेदी केंद्रावर केंद्र शासनाने निश्चित केलेल्या विशेष  (एफएक्यु)प्रतिचा माल आणावा.-  धान्य वाळवून व चाळणी करुन तसेच धान्याची १२ टक्क्यांपर्यंत आर्द्रता(ओलावा) असावी.- शेतकºयांना खरेदीचा दिनांक व वेळ मोबाईलवर एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे.