शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आता शंभर किलोचं पोतं पेलतंय कुणाला ? पन्नास किलोच्या कट्ट्यामध्येच मिळतंय धान्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 10:46 IST

रेवणसिद्ध जवळेकर  सोलापूर : पूर्वीचा आहार सकस होता... तशी ताकदवान मंडळीही होती. १०० किलो धान्याची पोती अलगदपणे उचलायची. आता ...

ठळक मुद्देशेतकºयांनीही केले पोत्याचे वजन कमी३० किलोच्या पिशव्यांमध्येही धान्यांची खरेदी-विक्री

रेवणसिद्ध जवळेकर 

सोलापूर : पूर्वीचा आहार सकस होता... तशी ताकदवान मंडळीही होती. १०० किलो धान्याची पोती अलगदपणे उचलायची. आता चित्र बदललेय. हायब्रीडच्या जमान्यात धान्यातील कसही निघून गेलाय अन् माणसंही कसदार राहिली नाहीत. १०० किलो (क्विंटल) धान्याचे पोते पेलण्याची ताकदही राहिली नसल्याने त्याची जागा आता कट्ट्याने (म्हणजे ५० किलो) घेतली आहे. 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अडत दुकानांमध्ये शेतीमाल यायचा तो क्विंटलमध्येच. स्वत: शेतकरी आपला शेतीमाल वाहनांमध्ये भरायचे. आलेला शेतीमाल अडत व्यापारी माथाडी कामगारांच्या मदतीने दुकानात उतरवून घ्यायचे. तो काळ आता राहिला नाही. शेतकरी काय अन् माथाडी कामगार काय, क्विंटल धान्य त्यांना आता पेलवत नाही. आता शेतकरी, व्यापारी कट्ट्याची भाषा बोलू लागले आहेत. ५० किलोचा कट्टा असला तरी काही शेतकरी मात्र ६० ते ७० किलोच्या पोत्यात धान्य घेऊन येत असल्याचे मार्केट यार्डातील व्यापारी सचिन घटोळे, शिवराज निरगुडे यांनी सांगितले. 

माल उतरवणे अथवा भरणे असो... माथाडी कामगार एका पोत्याला ५ रुपये मजुरी घेत असतात; मात्र दिवसभर कष्ट उपसत असताना हेच माथाडी कामगार मात्र शेतकºयांच्या ६० ते ७० किलोच्या एका पोत्यालाही तेवढेच दर आकारुन त्यांच्याविषयीची आपली भावनाही व्यक्त करताना दिसतात. 

आम्ही कधीच शेतकºयांची अडवणूक करीत नाही. उलट त्यांना आम्ही माथाडी कामगार सौजन्याने वागणूक देत असल्याचे माथाडी कामगार सिद्धाराम हिप्परगी, प्रशांत कोळी, इरेश शेरे, श्रीमंत हिप्परगी यांनी सांगितले. पूर्वी अडत, भुसार दुकानांमधून १०० किलो धान्याचे पोते किराणा दुकानांमध्ये जायचे. आता हेच पोते ५० किलोमध्ये म्हणजे कट्ट्यात येऊ लागले आहे. वास्तविक ग्राहकांनाही कट्ट्याचा हा व्यवहार सोयीचा ठरत आहे. धान्य घेण्याऐवजी टप्प्याटप्प्याने घेणे ग्राहक अधिक पसंत करीत असल्याने क्विंटलऐवजी कट्टा व्यवहाराला व्यापारी आणि ग्राहकही अधिक पसंती देताना दिसतात. 

आता प्लास्टिकच्या पोत्यातूनही धान्य

  • - मालाची ने-आण करताना माथाडी कामगारांकडून अनेकवेळा पोत्याला हूक लागले जातात. हूक लागल्यामुळे एक तर धान्याची गळती होते. त्यामुळे शेतकºयांना थोडा फटकाही बसतो. शेतकरी आणि ग्राहकांसाठी आता गोणीऐवजी प्लास्टिकच्या पोत्याचा वापर सुरु आहे.
  • - पूर्वी एकत्र कुटूंब पद्धत होती. त्यामुळे धान्य क्विंटलमध्ये खरेदी व्हायचे. बोटावर मोजण्याइतपत मंडळी सोडली तर ही पद्धत कुठे दिसत नाही. त्यामुळे २० किलो, ३० किलोच्या पोत्यातही धान्य मिळू लागले आहे. आपल्या दुचाकीवरुनही धान्याच्या पिशव्या अथवा कट्टे ग्राहकांना सहजपणे नेता येतात. 

तांदूळ, गहू, डाळ आदी धान्य आता प्लास्टिकच्या पोत्यातूनच येऊ लागले आहे. या पोत्याला हूक लावण्याची गरज नाही. या पोत्यातून धान्याची गळती होत नाही. -सचिन घटोळे, व्यापारी.

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजार