शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

आता शंभर किलोचं पोतं पेलतंय कुणाला ? पन्नास किलोच्या कट्ट्यामध्येच मिळतंय धान्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 10:46 IST

रेवणसिद्ध जवळेकर  सोलापूर : पूर्वीचा आहार सकस होता... तशी ताकदवान मंडळीही होती. १०० किलो धान्याची पोती अलगदपणे उचलायची. आता ...

ठळक मुद्देशेतकºयांनीही केले पोत्याचे वजन कमी३० किलोच्या पिशव्यांमध्येही धान्यांची खरेदी-विक्री

रेवणसिद्ध जवळेकर 

सोलापूर : पूर्वीचा आहार सकस होता... तशी ताकदवान मंडळीही होती. १०० किलो धान्याची पोती अलगदपणे उचलायची. आता चित्र बदललेय. हायब्रीडच्या जमान्यात धान्यातील कसही निघून गेलाय अन् माणसंही कसदार राहिली नाहीत. १०० किलो (क्विंटल) धान्याचे पोते पेलण्याची ताकदही राहिली नसल्याने त्याची जागा आता कट्ट्याने (म्हणजे ५० किलो) घेतली आहे. 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अडत दुकानांमध्ये शेतीमाल यायचा तो क्विंटलमध्येच. स्वत: शेतकरी आपला शेतीमाल वाहनांमध्ये भरायचे. आलेला शेतीमाल अडत व्यापारी माथाडी कामगारांच्या मदतीने दुकानात उतरवून घ्यायचे. तो काळ आता राहिला नाही. शेतकरी काय अन् माथाडी कामगार काय, क्विंटल धान्य त्यांना आता पेलवत नाही. आता शेतकरी, व्यापारी कट्ट्याची भाषा बोलू लागले आहेत. ५० किलोचा कट्टा असला तरी काही शेतकरी मात्र ६० ते ७० किलोच्या पोत्यात धान्य घेऊन येत असल्याचे मार्केट यार्डातील व्यापारी सचिन घटोळे, शिवराज निरगुडे यांनी सांगितले. 

माल उतरवणे अथवा भरणे असो... माथाडी कामगार एका पोत्याला ५ रुपये मजुरी घेत असतात; मात्र दिवसभर कष्ट उपसत असताना हेच माथाडी कामगार मात्र शेतकºयांच्या ६० ते ७० किलोच्या एका पोत्यालाही तेवढेच दर आकारुन त्यांच्याविषयीची आपली भावनाही व्यक्त करताना दिसतात. 

आम्ही कधीच शेतकºयांची अडवणूक करीत नाही. उलट त्यांना आम्ही माथाडी कामगार सौजन्याने वागणूक देत असल्याचे माथाडी कामगार सिद्धाराम हिप्परगी, प्रशांत कोळी, इरेश शेरे, श्रीमंत हिप्परगी यांनी सांगितले. पूर्वी अडत, भुसार दुकानांमधून १०० किलो धान्याचे पोते किराणा दुकानांमध्ये जायचे. आता हेच पोते ५० किलोमध्ये म्हणजे कट्ट्यात येऊ लागले आहे. वास्तविक ग्राहकांनाही कट्ट्याचा हा व्यवहार सोयीचा ठरत आहे. धान्य घेण्याऐवजी टप्प्याटप्प्याने घेणे ग्राहक अधिक पसंत करीत असल्याने क्विंटलऐवजी कट्टा व्यवहाराला व्यापारी आणि ग्राहकही अधिक पसंती देताना दिसतात. 

आता प्लास्टिकच्या पोत्यातूनही धान्य

  • - मालाची ने-आण करताना माथाडी कामगारांकडून अनेकवेळा पोत्याला हूक लागले जातात. हूक लागल्यामुळे एक तर धान्याची गळती होते. त्यामुळे शेतकºयांना थोडा फटकाही बसतो. शेतकरी आणि ग्राहकांसाठी आता गोणीऐवजी प्लास्टिकच्या पोत्याचा वापर सुरु आहे.
  • - पूर्वी एकत्र कुटूंब पद्धत होती. त्यामुळे धान्य क्विंटलमध्ये खरेदी व्हायचे. बोटावर मोजण्याइतपत मंडळी सोडली तर ही पद्धत कुठे दिसत नाही. त्यामुळे २० किलो, ३० किलोच्या पोत्यातही धान्य मिळू लागले आहे. आपल्या दुचाकीवरुनही धान्याच्या पिशव्या अथवा कट्टे ग्राहकांना सहजपणे नेता येतात. 

तांदूळ, गहू, डाळ आदी धान्य आता प्लास्टिकच्या पोत्यातूनच येऊ लागले आहे. या पोत्याला हूक लावण्याची गरज नाही. या पोत्यातून धान्याची गळती होत नाही. -सचिन घटोळे, व्यापारी.

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजार