शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

आता शंभर किलोचं पोतं पेलतंय कुणाला ? पन्नास किलोच्या कट्ट्यामध्येच मिळतंय धान्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 10:46 IST

रेवणसिद्ध जवळेकर  सोलापूर : पूर्वीचा आहार सकस होता... तशी ताकदवान मंडळीही होती. १०० किलो धान्याची पोती अलगदपणे उचलायची. आता ...

ठळक मुद्देशेतकºयांनीही केले पोत्याचे वजन कमी३० किलोच्या पिशव्यांमध्येही धान्यांची खरेदी-विक्री

रेवणसिद्ध जवळेकर 

सोलापूर : पूर्वीचा आहार सकस होता... तशी ताकदवान मंडळीही होती. १०० किलो धान्याची पोती अलगदपणे उचलायची. आता चित्र बदललेय. हायब्रीडच्या जमान्यात धान्यातील कसही निघून गेलाय अन् माणसंही कसदार राहिली नाहीत. १०० किलो (क्विंटल) धान्याचे पोते पेलण्याची ताकदही राहिली नसल्याने त्याची जागा आता कट्ट्याने (म्हणजे ५० किलो) घेतली आहे. 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अडत दुकानांमध्ये शेतीमाल यायचा तो क्विंटलमध्येच. स्वत: शेतकरी आपला शेतीमाल वाहनांमध्ये भरायचे. आलेला शेतीमाल अडत व्यापारी माथाडी कामगारांच्या मदतीने दुकानात उतरवून घ्यायचे. तो काळ आता राहिला नाही. शेतकरी काय अन् माथाडी कामगार काय, क्विंटल धान्य त्यांना आता पेलवत नाही. आता शेतकरी, व्यापारी कट्ट्याची भाषा बोलू लागले आहेत. ५० किलोचा कट्टा असला तरी काही शेतकरी मात्र ६० ते ७० किलोच्या पोत्यात धान्य घेऊन येत असल्याचे मार्केट यार्डातील व्यापारी सचिन घटोळे, शिवराज निरगुडे यांनी सांगितले. 

माल उतरवणे अथवा भरणे असो... माथाडी कामगार एका पोत्याला ५ रुपये मजुरी घेत असतात; मात्र दिवसभर कष्ट उपसत असताना हेच माथाडी कामगार मात्र शेतकºयांच्या ६० ते ७० किलोच्या एका पोत्यालाही तेवढेच दर आकारुन त्यांच्याविषयीची आपली भावनाही व्यक्त करताना दिसतात. 

आम्ही कधीच शेतकºयांची अडवणूक करीत नाही. उलट त्यांना आम्ही माथाडी कामगार सौजन्याने वागणूक देत असल्याचे माथाडी कामगार सिद्धाराम हिप्परगी, प्रशांत कोळी, इरेश शेरे, श्रीमंत हिप्परगी यांनी सांगितले. पूर्वी अडत, भुसार दुकानांमधून १०० किलो धान्याचे पोते किराणा दुकानांमध्ये जायचे. आता हेच पोते ५० किलोमध्ये म्हणजे कट्ट्यात येऊ लागले आहे. वास्तविक ग्राहकांनाही कट्ट्याचा हा व्यवहार सोयीचा ठरत आहे. धान्य घेण्याऐवजी टप्प्याटप्प्याने घेणे ग्राहक अधिक पसंत करीत असल्याने क्विंटलऐवजी कट्टा व्यवहाराला व्यापारी आणि ग्राहकही अधिक पसंती देताना दिसतात. 

आता प्लास्टिकच्या पोत्यातूनही धान्य

  • - मालाची ने-आण करताना माथाडी कामगारांकडून अनेकवेळा पोत्याला हूक लागले जातात. हूक लागल्यामुळे एक तर धान्याची गळती होते. त्यामुळे शेतकºयांना थोडा फटकाही बसतो. शेतकरी आणि ग्राहकांसाठी आता गोणीऐवजी प्लास्टिकच्या पोत्याचा वापर सुरु आहे.
  • - पूर्वी एकत्र कुटूंब पद्धत होती. त्यामुळे धान्य क्विंटलमध्ये खरेदी व्हायचे. बोटावर मोजण्याइतपत मंडळी सोडली तर ही पद्धत कुठे दिसत नाही. त्यामुळे २० किलो, ३० किलोच्या पोत्यातही धान्य मिळू लागले आहे. आपल्या दुचाकीवरुनही धान्याच्या पिशव्या अथवा कट्टे ग्राहकांना सहजपणे नेता येतात. 

तांदूळ, गहू, डाळ आदी धान्य आता प्लास्टिकच्या पोत्यातूनच येऊ लागले आहे. या पोत्याला हूक लावण्याची गरज नाही. या पोत्यातून धान्याची गळती होत नाही. -सचिन घटोळे, व्यापारी.

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजार