शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आता शंभर किलोचं पोतं पेलतंय कुणाला ? पन्नास किलोच्या कट्ट्यामध्येच मिळतंय धान्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 10:46 IST

रेवणसिद्ध जवळेकर  सोलापूर : पूर्वीचा आहार सकस होता... तशी ताकदवान मंडळीही होती. १०० किलो धान्याची पोती अलगदपणे उचलायची. आता ...

ठळक मुद्देशेतकºयांनीही केले पोत्याचे वजन कमी३० किलोच्या पिशव्यांमध्येही धान्यांची खरेदी-विक्री

रेवणसिद्ध जवळेकर 

सोलापूर : पूर्वीचा आहार सकस होता... तशी ताकदवान मंडळीही होती. १०० किलो धान्याची पोती अलगदपणे उचलायची. आता चित्र बदललेय. हायब्रीडच्या जमान्यात धान्यातील कसही निघून गेलाय अन् माणसंही कसदार राहिली नाहीत. १०० किलो (क्विंटल) धान्याचे पोते पेलण्याची ताकदही राहिली नसल्याने त्याची जागा आता कट्ट्याने (म्हणजे ५० किलो) घेतली आहे. 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अडत दुकानांमध्ये शेतीमाल यायचा तो क्विंटलमध्येच. स्वत: शेतकरी आपला शेतीमाल वाहनांमध्ये भरायचे. आलेला शेतीमाल अडत व्यापारी माथाडी कामगारांच्या मदतीने दुकानात उतरवून घ्यायचे. तो काळ आता राहिला नाही. शेतकरी काय अन् माथाडी कामगार काय, क्विंटल धान्य त्यांना आता पेलवत नाही. आता शेतकरी, व्यापारी कट्ट्याची भाषा बोलू लागले आहेत. ५० किलोचा कट्टा असला तरी काही शेतकरी मात्र ६० ते ७० किलोच्या पोत्यात धान्य घेऊन येत असल्याचे मार्केट यार्डातील व्यापारी सचिन घटोळे, शिवराज निरगुडे यांनी सांगितले. 

माल उतरवणे अथवा भरणे असो... माथाडी कामगार एका पोत्याला ५ रुपये मजुरी घेत असतात; मात्र दिवसभर कष्ट उपसत असताना हेच माथाडी कामगार मात्र शेतकºयांच्या ६० ते ७० किलोच्या एका पोत्यालाही तेवढेच दर आकारुन त्यांच्याविषयीची आपली भावनाही व्यक्त करताना दिसतात. 

आम्ही कधीच शेतकºयांची अडवणूक करीत नाही. उलट त्यांना आम्ही माथाडी कामगार सौजन्याने वागणूक देत असल्याचे माथाडी कामगार सिद्धाराम हिप्परगी, प्रशांत कोळी, इरेश शेरे, श्रीमंत हिप्परगी यांनी सांगितले. पूर्वी अडत, भुसार दुकानांमधून १०० किलो धान्याचे पोते किराणा दुकानांमध्ये जायचे. आता हेच पोते ५० किलोमध्ये म्हणजे कट्ट्यात येऊ लागले आहे. वास्तविक ग्राहकांनाही कट्ट्याचा हा व्यवहार सोयीचा ठरत आहे. धान्य घेण्याऐवजी टप्प्याटप्प्याने घेणे ग्राहक अधिक पसंत करीत असल्याने क्विंटलऐवजी कट्टा व्यवहाराला व्यापारी आणि ग्राहकही अधिक पसंती देताना दिसतात. 

आता प्लास्टिकच्या पोत्यातूनही धान्य

  • - मालाची ने-आण करताना माथाडी कामगारांकडून अनेकवेळा पोत्याला हूक लागले जातात. हूक लागल्यामुळे एक तर धान्याची गळती होते. त्यामुळे शेतकºयांना थोडा फटकाही बसतो. शेतकरी आणि ग्राहकांसाठी आता गोणीऐवजी प्लास्टिकच्या पोत्याचा वापर सुरु आहे.
  • - पूर्वी एकत्र कुटूंब पद्धत होती. त्यामुळे धान्य क्विंटलमध्ये खरेदी व्हायचे. बोटावर मोजण्याइतपत मंडळी सोडली तर ही पद्धत कुठे दिसत नाही. त्यामुळे २० किलो, ३० किलोच्या पोत्यातही धान्य मिळू लागले आहे. आपल्या दुचाकीवरुनही धान्याच्या पिशव्या अथवा कट्टे ग्राहकांना सहजपणे नेता येतात. 

तांदूळ, गहू, डाळ आदी धान्य आता प्लास्टिकच्या पोत्यातूनच येऊ लागले आहे. या पोत्याला हूक लावण्याची गरज नाही. या पोत्यातून धान्याची गळती होत नाही. -सचिन घटोळे, व्यापारी.

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजार