शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

बोलणेचि नाही । आता देवाविण काही ।।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 14:58 IST

मनुष्य देहाची इंद्रिये ही भगवंत प्राप्तीची साधने आहेत. ‘जेणे तु जोडसी नारायण’ असे संतवचन प्रसिद्ध आहे. यामध्ये ‘वाचा’ हे एक असे साधन आहे की, त्यातून निघालेल्या प्रत्येक शब्दाने आपला व्यावहारिक व आध्यात्मिक विकास होतो आहे. या वाचेलाच वाणी, बोलणं, असे पर्यायी शब्द आहेत. आपण काय बोलतो, हे महत्त्वाचे असते. कारण ...

मनुष्य देहाची इंद्रिये ही भगवंत प्राप्तीची साधने आहेत. ‘जेणे तु जोडसी नारायण’ असे संतवचन प्रसिद्ध आहे. यामध्ये ‘वाचा’ हे एक असे साधन आहे की, त्यातून निघालेल्या प्रत्येक शब्दाने आपला व्यावहारिक व आध्यात्मिक विकास होतो आहे. या वाचेलाच वाणी, बोलणं, असे पर्यायी शब्द आहेत. आपण काय बोलतो, हे महत्त्वाचे असते. कारण आपल्या बोलण्यातून एक सामाजिक वातावरण तयार होत असते. संत तुकाराम महाराज या संबंधात दोन भूमिका व्यक्त करतात. एक तर या वाणीने कसलेच बोलू नये किंवा वाचातीत अशी अवस्था ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने प्रगट करतात. ते म्हणतात-

 न बोलसी करा वाचा।उपाधीचा संबंध।।काहीही बोलले तरी या शब्दातून उपाधी निर्माण होते व जिथे जिथे उपाधी तिथे तिथे दु:ख हे ठरलेलेच असते म्हणून अनिर्वचनीय भूमिकेचे समर्थन तुकाराम महाराज करीत असतात. ते म्हणतात की, जर बोलायचेच असेल तर फक्त देवाविषयी बोलावं बाकी काही नको.

बोलणेचि नाही। आता देवाविण काही।।आता या वाचेने प्रपंचातील काही बोलणे नाही, जे बोलायचे ते फक्त देवाविषयी, अशी ही वाचा भगवद्स्वरूप झालेली आहे. या वाचेला भगवंत नामाचा छंद लागलेला आहे.

माझी मज झाली अनावर वाचा।छंद या नामाचा घेतलासे।।देवर्षी नारदमुनींनी हीच भूमिका भक्तिसूत्रामध्ये सांगितली आहे.अव्यावृत भजनात। ही अवस्था येण्यासाठी प्रथमत: वाचेच्या ठिकाणी या प्रापंचिक आसक्तीने निर्माण झालेले दोष जावे लागतील. कारण प्रपंचामध्ये असताना ही वाचा नको नको ते शब्द बोलून अत्यंत मलिन झालेली आहे. या वाचेतून निघणाºया शब्दाने अनेक कलह समाजामध्ये निार्मण झाले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी माणसाने ‘कसे बोलू नये’ याचे वर्णन केले आहे. ज्ञानेश्वरीतील १३ व्या अध्यायात

विरोधू वादुबळु। प्राणितापढाळु।उपहासु छळु। वर्मस्पर्शुआटु वेगु विंदाणु। अशा शंका प्रतारणु।हे संन्यासिले अवगुणु। जिया वाचा।।आपल्या या वाचेने उपहासाने बोलू नये, छळाचे बोलू नये. हट्टाचे बोलू नये, कपटाचे बोलू नये, वर्मस्पर्शी बोलू नये, शंका निर्माण करणारे बोलू नये, फसवणूक करणारे बोलू नये. अशाप्रकारचे कोणतेही शब्द आपल्या तोंडातून येऊ नयेत. कारण हे बोलणे समाजामध्ये कलह निर्माण करतात; मग या वाचेने कसे बोलावे याचेही उत्तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात-

तैसे साच आणि मवाळ। मितले परि सरळ।।बोल जैसे कल्लोळ। अमृताचे।।माणसाने खरे बोलावे, मवाळ बोलावे, मोजके पंरतु सरळ असे बोलावे. त्याचे बोलणे म्हणजे जशा काही अमृताच्या लाटा आहेत, असे वाटावे. या बोलण्याने समाजात शांतता, समाधान निर्माण होत असते.- अ‍ॅड. जयवंत महाराज बोधले

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर