शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बोलणेचि नाही । आता देवाविण काही ।।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 14:58 IST

मनुष्य देहाची इंद्रिये ही भगवंत प्राप्तीची साधने आहेत. ‘जेणे तु जोडसी नारायण’ असे संतवचन प्रसिद्ध आहे. यामध्ये ‘वाचा’ हे एक असे साधन आहे की, त्यातून निघालेल्या प्रत्येक शब्दाने आपला व्यावहारिक व आध्यात्मिक विकास होतो आहे. या वाचेलाच वाणी, बोलणं, असे पर्यायी शब्द आहेत. आपण काय बोलतो, हे महत्त्वाचे असते. कारण ...

मनुष्य देहाची इंद्रिये ही भगवंत प्राप्तीची साधने आहेत. ‘जेणे तु जोडसी नारायण’ असे संतवचन प्रसिद्ध आहे. यामध्ये ‘वाचा’ हे एक असे साधन आहे की, त्यातून निघालेल्या प्रत्येक शब्दाने आपला व्यावहारिक व आध्यात्मिक विकास होतो आहे. या वाचेलाच वाणी, बोलणं, असे पर्यायी शब्द आहेत. आपण काय बोलतो, हे महत्त्वाचे असते. कारण आपल्या बोलण्यातून एक सामाजिक वातावरण तयार होत असते. संत तुकाराम महाराज या संबंधात दोन भूमिका व्यक्त करतात. एक तर या वाणीने कसलेच बोलू नये किंवा वाचातीत अशी अवस्था ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने प्रगट करतात. ते म्हणतात-

 न बोलसी करा वाचा।उपाधीचा संबंध।।काहीही बोलले तरी या शब्दातून उपाधी निर्माण होते व जिथे जिथे उपाधी तिथे तिथे दु:ख हे ठरलेलेच असते म्हणून अनिर्वचनीय भूमिकेचे समर्थन तुकाराम महाराज करीत असतात. ते म्हणतात की, जर बोलायचेच असेल तर फक्त देवाविषयी बोलावं बाकी काही नको.

बोलणेचि नाही। आता देवाविण काही।।आता या वाचेने प्रपंचातील काही बोलणे नाही, जे बोलायचे ते फक्त देवाविषयी, अशी ही वाचा भगवद्स्वरूप झालेली आहे. या वाचेला भगवंत नामाचा छंद लागलेला आहे.

माझी मज झाली अनावर वाचा।छंद या नामाचा घेतलासे।।देवर्षी नारदमुनींनी हीच भूमिका भक्तिसूत्रामध्ये सांगितली आहे.अव्यावृत भजनात। ही अवस्था येण्यासाठी प्रथमत: वाचेच्या ठिकाणी या प्रापंचिक आसक्तीने निर्माण झालेले दोष जावे लागतील. कारण प्रपंचामध्ये असताना ही वाचा नको नको ते शब्द बोलून अत्यंत मलिन झालेली आहे. या वाचेतून निघणाºया शब्दाने अनेक कलह समाजामध्ये निार्मण झाले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी माणसाने ‘कसे बोलू नये’ याचे वर्णन केले आहे. ज्ञानेश्वरीतील १३ व्या अध्यायात

विरोधू वादुबळु। प्राणितापढाळु।उपहासु छळु। वर्मस्पर्शुआटु वेगु विंदाणु। अशा शंका प्रतारणु।हे संन्यासिले अवगुणु। जिया वाचा।।आपल्या या वाचेने उपहासाने बोलू नये, छळाचे बोलू नये. हट्टाचे बोलू नये, कपटाचे बोलू नये, वर्मस्पर्शी बोलू नये, शंका निर्माण करणारे बोलू नये, फसवणूक करणारे बोलू नये. अशाप्रकारचे कोणतेही शब्द आपल्या तोंडातून येऊ नयेत. कारण हे बोलणे समाजामध्ये कलह निर्माण करतात; मग या वाचेने कसे बोलावे याचेही उत्तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात-

तैसे साच आणि मवाळ। मितले परि सरळ।।बोल जैसे कल्लोळ। अमृताचे।।माणसाने खरे बोलावे, मवाळ बोलावे, मोजके पंरतु सरळ असे बोलावे. त्याचे बोलणे म्हणजे जशा काही अमृताच्या लाटा आहेत, असे वाटावे. या बोलण्याने समाजात शांतता, समाधान निर्माण होत असते.- अ‍ॅड. जयवंत महाराज बोधले

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर