शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

पंढरपुरात महावितरणच्या नवीन मंडल कार्यालयास मंजुरी

By admin | Updated: March 25, 2017 17:30 IST

पंढरपुरात महावितरणच्या नवीन मंडल कार्यालयास मंजुरी

पंढरपुरात महावितरणच्या नवीन मंडल कार्यालयास मंजुरीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यापुर्वी महावितरण विभागाचे एक मंडल कार्यालय होते. त्यामुळे सर्व वीज ग्राहकांचा भार एकाच मंडल कार्यालयावर येत होता. नवीन मंडल कार्यालय व्हावे अशी अनेक दिवसांपासून मागणी होती. त्यानुसार पंढरपूर येथे नवीन मंडल कार्यालयास मंजुरी देण्यात आली आहे़ तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप व अक्कलकोट येथे नवीन उपविभागीय कार्यालय सुरू करण्यासही मंजुरी देण्यात आल्याची माहिती सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली़शुक्रवारी मंत्रालयात ऊजामंत्र्याच्या दालनात सोलापूर जिल्ह्यातील वीज प्रश्नासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उजामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार, कार्यकारी संचालक (मांस) सचिन ढोले, सोलापूर जिल्हा ऊर्जा समन्वयक मोहन आलाट यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सोलापूर जिलह्यातील विजेच्यासंदर्भात आढावा घेण्यात आला. शुक्रवारी झालेल्या बैठकीत ऊर्जा सचिव संजीवकुमार यांच्यासोबत ऊजार्मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. त्यांनी पंढरपूर येथील मंडल कार्यालयाच्या निर्मितीची सूचना मान्य करून कार्यवाही करण्यास संमती दिली. यामुळे पंढरपूर येथील मंडल कार्यालयास तत्काळ मंजुरी देण्यात आली आहे. दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातही अशीच स्थिती असल्याने सध्या उपलब्ध असलेल्या कार्यालयावर व यंत्रणेवर ताण पडत असल्याने तेथेही उपविभागीय कार्यालयाची आवश्यकता होती. यामुळे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अथक प्रयत्नाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप आणि अक्कलकोट येथे नवीन उपविभागीय कार्यालय सुरू करण्यासही मंजुरी देण्यात आली. --------------------------------------------------पंढरीतील पोल फॅक्टरी होणार कार्यान्वितपंढरपूर येथील महावितरण कंपनीच्या मालकीची पोल फॅक्टरी सध्या बंदावस्थेत आहे. यामुळे स्थानिक पातळीवर पोल उपलब्ध करणे आणि पुरवठा करणे अडचणीचे ठरत आहे. यामुळे बंद असलेली फॅक्टरी पुन्हा सुरू करण्याबाबात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ऊर्जा मंत्री बावनकुळे यांना सुचविले. त्यांनी तत्काळ याला सहमती दर्शवित हा कारखाना तत्काळ सुरू करण्याचे आदेश याच बैठकीत अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचबरोबरच पंढरपूर येथे नवीन स्थापत्य विभाग व चाचणी विभागाची निर्मिती करण्यासही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नामुळे मान्यता देण्यात आली आहे.