शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

कृषी पर्यटन करायलाच हवे ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 13:29 IST

राज्यातील कृषी पर्यटन केंद्रांना परराज्यातून व परदेशी पर्यटकांनी हजेरी लावली आहे.

ठळक मुद्देग्रामीण संस्कृतीचा साजबाज राखणारा हा उपक्रम आता लोकप्रिय ठरू लागलाआज महाराष्ट्रातील प्रत्येक विभागातील शेतकरी या कृषी पर्यटन उपक्रमाला जोडलेला आहे. राज्यातील ३५० शेतकरी या कृषी पर्यटन उपक्रमांमध्ये सामील होऊन आत्मसन्मानाने जगत आहेत.

कृषी पर्यटनाच्या माध्यमातून अस्सल ग्रामीण संस्कृती व परंपरा, गावरान जेवणाचा आस्वाद घेणे असो वा हिरवाईमधून बैलगाडीतून फेरफटका, ग्रामीण खेळ, चुलीवर भाजलेली हातावरची भाकरी, खर्डा, हुरडा, धपाटा, खमंग उसळ, वांग्याचे भरीत, भरलं वांगं, भेंडी, गाड्यातील दही, पशुपालन, शेततळे, फुलबागा, औषधी वनस्पती, रात्रीचं चांदणं आशा कितीतरी बाबी लोकांना अनुभवता येत आहेत.

राज्यातील कृषी पर्यटन केंद्रांना परराज्यातून व परदेशी पर्यटकांनी हजेरी लावली आहे. ग्रामीण संस्कृतीचा साजबाज राखणारा हा उपक्रम आता लोकप्रिय ठरू लागला आहे. नुकत्याच पार पडलेल्या जागतिक कृषी पर्यटनाच्या निमित्ताने यावर प्रकाशझोत टाकू यात.सुखकारक आयुष्य जगण्यासाठी चांगला आर्थिक स्रोत निर्माण करणं आणि तो करत असताना वेळेची व कष्टाची मर्यादा ओलांडून शरीराची हेळसांड होऊन मन, बुद्धी यावर ताण पडू लागला आहे, पण ‘दुनिया की रेसमध्ये’ टिकून राहण्यासाठी प्रत्येकाला हे असे धकाधकीचे आयुष्य जगावे लागते, अशी कौटुंबिक व सामाजिक कर्तव्ये पार पाडताना माणूस स्वत:ला रिचार्ज करून ताजेतवाने करण्यासाठी पर्यटनाची जोड देऊ लागला आहे. 

आरोग्य जपण्यासाठी योगा, मेडिटेशन, सेंद्रिय विषमुक्त सात्विक अन्नाची गरज भासू लागली आणि अशातूनच आज दहा वर्षे सतत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य कृषी आणि ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघाने कृषी पर्यटनाचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले आहे. पर्यटनातून फक्त अर्थार्जन हे उद्दिष्ट न ठेवता प्रगतीपथावरील शेती, नवनवीन शेती प्रयोग, सेंद्रिय अन्नधान्याची, भाजीपाला, फळे यांची उपलब्धता, पर्यावरण पूरक वातावरण निर्मिती,वृक्ष लागवड व संवर्धन, एकत्रित कौटुंबिक आर्थिक स्रोत निर्मिती अशी अनेक उद्दिष्टे या कृषी पर्यटन उपक्रमातून राबवली गेली.

आज महाराष्ट्रातील प्रत्येक विभागातील शेतकरी या कृषी पर्यटन उपक्रमाला जोडलेला आहे. कृषी पर्यटनाचे सरकारकडे एक निश्चित धोरण मंजुरीस अडकलेले आहे आजपर्यंत सरकारकडून केंद्र उभारणे किंवा पर्यटन केंद्र चालविण्यास येणाºया अडचणीवर मात करण्यासाठी एकही रुपया तरतूद नाही. परवाच झालेल्या जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त आम्हाला सांगण्यास अभिमान वाटतो की अशा स्थितीतही आज रोजी संपूर्ण राज्यातील ३५० शेतकरी या कृषी पर्यटन उपक्रमांमध्ये सामील होऊन आत्मसन्मानाने जगत आहेत. संपूर्ण राज्यांतर्गत होणाºया स्मार्ट सिटी प्रोजेक्टच्या बदलांप्रमाणेच अनेक कृषी पर्यटन केंद्रांनी कात टाकली आहे.

एकदा आलेला पर्यटक वारंवार त्या केंद्रावर भेट देण्यास यावा यासाठी केंद्र  नूतनीकरण, स्वच्छता, करमणुकीची साधने, सात्त्विक व स्वादिष्ट भोजन, उत्कृष्ट आदरातिथ्य याबाबत केंद्रचालक अत्यंत बारकाईने लक्ष देत आहेत आणि म्हणूनच आजपर्यंत दहा वर्षांत राज्यातील साडेतीनशे पर्यटन केंद्रांवर येणाºया पर्यटकांची संख्या ७ लाखांवर गेली आहे. पर्यटनाचा व्यवसाय शेतकºयांसाठी आर्थिक आधार ठरतोय. विविध ठिकाणातील देवदेवतांच्या जत्रा, उरूस यासाठी येणारा भाविक वर्ग कृषी पर्यटन ठिकाणी मुक्कामाचा पर्याय निवडतोय.

शहरातील व्यस्त जीवनपद्धतीतून वेळ काढून शांत ठिकाणी जाऊन मनस्वी आनंद घेण्याची आवड अनेकांना असते. त्यातूनच कृषी पर्यटन प्रकार रुजत गेला. अत्यंत कष्ट करूनही शेतकºयांच्या वाट्याला फारसा नफा येत नाही. त्यातूनच शेतकºयांना कूषीपूरक व्यवसायाची गरज वाटू लागली. शेतीला कृषी पर्यटनासारख्या जोड व्यवसायाची साथ मिळाल्यास त्यांच्या उत्पादनात भर पडू शकते, या उद्देशाने महाराष्टÑ राज्य कृषी पर्यटन विकास महामंडळ व महाराष्टÑ राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघामार्फत कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सोलापूर जिल्ह्यामधील ऐतिहासिक व धार्मिक वारसा कृषी पर्यटनाच्या जोडीने बळकट करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. लवकरच तो सिद्धीस जाईल.- सोनाली जाधव-मस्के(लेखिका राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघाच्या संचालिका आहेत)

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीtourismपर्यटन