शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

कृषी पर्यटन करायलाच हवे ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 13:29 IST

राज्यातील कृषी पर्यटन केंद्रांना परराज्यातून व परदेशी पर्यटकांनी हजेरी लावली आहे.

ठळक मुद्देग्रामीण संस्कृतीचा साजबाज राखणारा हा उपक्रम आता लोकप्रिय ठरू लागलाआज महाराष्ट्रातील प्रत्येक विभागातील शेतकरी या कृषी पर्यटन उपक्रमाला जोडलेला आहे. राज्यातील ३५० शेतकरी या कृषी पर्यटन उपक्रमांमध्ये सामील होऊन आत्मसन्मानाने जगत आहेत.

कृषी पर्यटनाच्या माध्यमातून अस्सल ग्रामीण संस्कृती व परंपरा, गावरान जेवणाचा आस्वाद घेणे असो वा हिरवाईमधून बैलगाडीतून फेरफटका, ग्रामीण खेळ, चुलीवर भाजलेली हातावरची भाकरी, खर्डा, हुरडा, धपाटा, खमंग उसळ, वांग्याचे भरीत, भरलं वांगं, भेंडी, गाड्यातील दही, पशुपालन, शेततळे, फुलबागा, औषधी वनस्पती, रात्रीचं चांदणं आशा कितीतरी बाबी लोकांना अनुभवता येत आहेत.

राज्यातील कृषी पर्यटन केंद्रांना परराज्यातून व परदेशी पर्यटकांनी हजेरी लावली आहे. ग्रामीण संस्कृतीचा साजबाज राखणारा हा उपक्रम आता लोकप्रिय ठरू लागला आहे. नुकत्याच पार पडलेल्या जागतिक कृषी पर्यटनाच्या निमित्ताने यावर प्रकाशझोत टाकू यात.सुखकारक आयुष्य जगण्यासाठी चांगला आर्थिक स्रोत निर्माण करणं आणि तो करत असताना वेळेची व कष्टाची मर्यादा ओलांडून शरीराची हेळसांड होऊन मन, बुद्धी यावर ताण पडू लागला आहे, पण ‘दुनिया की रेसमध्ये’ टिकून राहण्यासाठी प्रत्येकाला हे असे धकाधकीचे आयुष्य जगावे लागते, अशी कौटुंबिक व सामाजिक कर्तव्ये पार पाडताना माणूस स्वत:ला रिचार्ज करून ताजेतवाने करण्यासाठी पर्यटनाची जोड देऊ लागला आहे. 

आरोग्य जपण्यासाठी योगा, मेडिटेशन, सेंद्रिय विषमुक्त सात्विक अन्नाची गरज भासू लागली आणि अशातूनच आज दहा वर्षे सतत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य कृषी आणि ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघाने कृषी पर्यटनाचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले आहे. पर्यटनातून फक्त अर्थार्जन हे उद्दिष्ट न ठेवता प्रगतीपथावरील शेती, नवनवीन शेती प्रयोग, सेंद्रिय अन्नधान्याची, भाजीपाला, फळे यांची उपलब्धता, पर्यावरण पूरक वातावरण निर्मिती,वृक्ष लागवड व संवर्धन, एकत्रित कौटुंबिक आर्थिक स्रोत निर्मिती अशी अनेक उद्दिष्टे या कृषी पर्यटन उपक्रमातून राबवली गेली.

आज महाराष्ट्रातील प्रत्येक विभागातील शेतकरी या कृषी पर्यटन उपक्रमाला जोडलेला आहे. कृषी पर्यटनाचे सरकारकडे एक निश्चित धोरण मंजुरीस अडकलेले आहे आजपर्यंत सरकारकडून केंद्र उभारणे किंवा पर्यटन केंद्र चालविण्यास येणाºया अडचणीवर मात करण्यासाठी एकही रुपया तरतूद नाही. परवाच झालेल्या जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त आम्हाला सांगण्यास अभिमान वाटतो की अशा स्थितीतही आज रोजी संपूर्ण राज्यातील ३५० शेतकरी या कृषी पर्यटन उपक्रमांमध्ये सामील होऊन आत्मसन्मानाने जगत आहेत. संपूर्ण राज्यांतर्गत होणाºया स्मार्ट सिटी प्रोजेक्टच्या बदलांप्रमाणेच अनेक कृषी पर्यटन केंद्रांनी कात टाकली आहे.

एकदा आलेला पर्यटक वारंवार त्या केंद्रावर भेट देण्यास यावा यासाठी केंद्र  नूतनीकरण, स्वच्छता, करमणुकीची साधने, सात्त्विक व स्वादिष्ट भोजन, उत्कृष्ट आदरातिथ्य याबाबत केंद्रचालक अत्यंत बारकाईने लक्ष देत आहेत आणि म्हणूनच आजपर्यंत दहा वर्षांत राज्यातील साडेतीनशे पर्यटन केंद्रांवर येणाºया पर्यटकांची संख्या ७ लाखांवर गेली आहे. पर्यटनाचा व्यवसाय शेतकºयांसाठी आर्थिक आधार ठरतोय. विविध ठिकाणातील देवदेवतांच्या जत्रा, उरूस यासाठी येणारा भाविक वर्ग कृषी पर्यटन ठिकाणी मुक्कामाचा पर्याय निवडतोय.

शहरातील व्यस्त जीवनपद्धतीतून वेळ काढून शांत ठिकाणी जाऊन मनस्वी आनंद घेण्याची आवड अनेकांना असते. त्यातूनच कृषी पर्यटन प्रकार रुजत गेला. अत्यंत कष्ट करूनही शेतकºयांच्या वाट्याला फारसा नफा येत नाही. त्यातूनच शेतकºयांना कूषीपूरक व्यवसायाची गरज वाटू लागली. शेतीला कृषी पर्यटनासारख्या जोड व्यवसायाची साथ मिळाल्यास त्यांच्या उत्पादनात भर पडू शकते, या उद्देशाने महाराष्टÑ राज्य कृषी पर्यटन विकास महामंडळ व महाराष्टÑ राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघामार्फत कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सोलापूर जिल्ह्यामधील ऐतिहासिक व धार्मिक वारसा कृषी पर्यटनाच्या जोडीने बळकट करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. लवकरच तो सिद्धीस जाईल.- सोनाली जाधव-मस्के(लेखिका राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघाच्या संचालिका आहेत)

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीtourismपर्यटन