शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

इथेनॉल निर्मिती करून साखर उत्पादनावर नियंत्रणाची गरज : विजयसिंह मोहिते-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:23 IST

आगामी गाळप हंगामात इथेनॉलचे उत्पादन व पुरवठ्यासंदर्भात अकलूज येथे पत्रकारांशी ते बोलत होते. डिसेंबर २०२० नंतर केंद्र सरकारने इथेनॉलसंदर्भात ...

आगामी गाळप हंगामात इथेनॉलचे उत्पादन व पुरवठ्यासंदर्भात अकलूज येथे पत्रकारांशी ते बोलत होते. डिसेंबर २०२० नंतर केंद्र सरकारने इथेनॉलसंदर्भात सकारात्मक धोरण घेतले आहे. इथेनॉल दरवाढीबरोबरच ते पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी जास्तीचे प्रमाण ठरवून दिले आहे. सध्या हे प्रमाण १० टक्के असून सन २०२३ पासून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे प्रमाण २० टक्‍क्‍यांपर्यंत वाढविण्याचे केंद्राच्या विचाराधीन आहे. थेट उसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला ६२.६५ पैसे, बी-हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलला ५७.४८ पैसे, तर सी-हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलला ४५.६२ पैसे दर मिळत आहे.

थेट उसाच्या रसापासून तयार केलेल्या इथेनॉलमुळे साखर उताऱ्यात थोडीशी घट येत असली तरी, इथेनॉल विक्रीचे पैसे २० दिवसात मिळत असल्याने व्याजाचा भुर्दंड कमी होतो. साखरेचे उत्पादनही नियंत्रणात राहते. साखर कारखान्यांनी राज्यातील ऑईल कंपन्यांची इथेनॉलची मागणी पूर्ण करून शेजारील गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गोवा, केरळ या राज्यांतील ऑईल कंपन्यांच्या डेपोंना जास्तीत जास्त इथेनॉलचा पुरवठा करण्यावर भर देण्याची गरज आहे. इथेनॉल उत्पादनामुळे साखरेचे दरही कारखान्यांना परवडण्याइतपत राहतील, अशी अपेक्षा विजयसिंह मोहिते - पाटील यांनी व्यक्त केली.

गतवर्षी ७ लाख १० हजार टन साखर उत्पादनात घट

साखर आयुक्तालयातील आकडेवारीनुसार आगामी गळीत हंगामात १ हजार १८९ लाख टन उसाचे गाळप होईल असा अंदाज आहे. त्यातून ११२ लाख टन साखर (इथेनॉलचे उत्पादन गृहित धरून) उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गतवर्षी देशातून ६० लाख टन साखर निर्यात झाल्याने साखरेचे साठे कमी असले तरी, यंदा राज्यात विक्रमी उत्पादन होणार आहे. गतवर्षी थेट उसाच्या रसापासून, बी-हेवी व सी-हेवी मोलॅसिसपासून एकूण ५० कोटी ७३ लाख लिटर इथेनॉलचा पुरवठा ऑईल कंपन्यांना केला आहे. उर्वरित पुरवठाही केला जात आहे. गतवर्षी इथेनॉल निर्मितीमुळे ७ लाख १० हजार टन साखरेचे उत्पादन कमी झाले असल्याचे विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.