शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

निसर्ग सेवा फाउंडेशन करणार स्वच्छ अन् सुंदर अक्कलकोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:22 IST

अनेक शहरवासीयांनी स्वत: हाती झाडू घेऊन रविवारी पहाटे ६ ते सकाळी ८ वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थ समाधी मठ व ...

अनेक शहरवासीयांनी स्वत: हाती झाडू घेऊन रविवारी पहाटे ६ ते सकाळी ८ वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थ समाधी मठ व ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर मार्ग परिसराची स्वच्छता करण्यात आली. नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकू नये, इतरांनाही त्यापासून परावृत्त करावे, असे आवाहन संस्थेच्या सदस्यांनी केले.

फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी ना गंदगी करेंगे, ना करने देंग चा मंत्र दिला. जनतेच्या सहभागामुळे स्वच्छ अक्कलकोट अभियानाचे रुपांतर एका शहर चळवळीत झाले.

या मोहिमेत फाउंडेशन चे प्रमुख प्रसिद्ध सुनील बिराजदार, राचप्पा वागदरे, माजी मुख्याध्यापक भजे, तात्यासाहेब समाणे, विद्याधर गुरव, शशिकांत लिम्बीतोटे, प्रमोद लोकापुरे, दत्ता कटारे, रामेश्वर पाटील, अभिजीत लोके, विजयकुमार हंद्राळमठ, दत्ता काटकर, व्यंकटेश होळकर, सूरज आळंद, जयलिंग यादव, मल्लिनाथ बिराजदार, शंकर अलोणे, सुरेश हिरापुरे, चिंदानद बाबा, विनय धरणे, नितीन दोडाळे, संतोष शिर्के, सिध्दाराम मोघे, आनंद कालिबत्ते, रेवनसिध्द सावळे, विरुपाक्ष कुंभार हे सहभागी झाले होते.

सुटीच्या दिवशी राबविणार स्वच्छता मोहीम

या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक सुट्टी दिवशी वेगवेगळ्या भागात शहर स्वच्छतेचे काम केले जाणार आहे. मुख्यतः ग्रामदैवत परिसर स्वच्छ ठेवण्याच्या उपक्रमामध्ये सातत्य ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सध्या २५ हून अधिक सभासद असून यात वाढ होत आहे. समाजउपयोगी कार्यामुळे नागरिकांचा याला प्रतिसाद मिळत आहे.

फोटो

०७अक्कलकोट-स्वच्छता

ओळी

भक्तांसह शहरवासीयांच्या निरोगी आरोग्यसाठी स्वच्छ अक्कलकोट सुंदर अक्कलकोट करण्याच्या उद्देशाने नव्याने स्थापन करण्यात आलेल्या निसर्ग सेवा फौंडेशनचा शुभारंभ स्वच्छतेच्या मोहिमेनेच केला.