शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

निसर्ग सेवा फाउंडेशन करणार स्वच्छ अन् सुंदर अक्कलकोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:22 IST

अनेक शहरवासीयांनी स्वत: हाती झाडू घेऊन रविवारी पहाटे ६ ते सकाळी ८ वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थ समाधी मठ व ...

अनेक शहरवासीयांनी स्वत: हाती झाडू घेऊन रविवारी पहाटे ६ ते सकाळी ८ वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थ समाधी मठ व ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर मार्ग परिसराची स्वच्छता करण्यात आली. नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकू नये, इतरांनाही त्यापासून परावृत्त करावे, असे आवाहन संस्थेच्या सदस्यांनी केले.

फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी ना गंदगी करेंगे, ना करने देंग चा मंत्र दिला. जनतेच्या सहभागामुळे स्वच्छ अक्कलकोट अभियानाचे रुपांतर एका शहर चळवळीत झाले.

या मोहिमेत फाउंडेशन चे प्रमुख प्रसिद्ध सुनील बिराजदार, राचप्पा वागदरे, माजी मुख्याध्यापक भजे, तात्यासाहेब समाणे, विद्याधर गुरव, शशिकांत लिम्बीतोटे, प्रमोद लोकापुरे, दत्ता कटारे, रामेश्वर पाटील, अभिजीत लोके, विजयकुमार हंद्राळमठ, दत्ता काटकर, व्यंकटेश होळकर, सूरज आळंद, जयलिंग यादव, मल्लिनाथ बिराजदार, शंकर अलोणे, सुरेश हिरापुरे, चिंदानद बाबा, विनय धरणे, नितीन दोडाळे, संतोष शिर्के, सिध्दाराम मोघे, आनंद कालिबत्ते, रेवनसिध्द सावळे, विरुपाक्ष कुंभार हे सहभागी झाले होते.

सुटीच्या दिवशी राबविणार स्वच्छता मोहीम

या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक सुट्टी दिवशी वेगवेगळ्या भागात शहर स्वच्छतेचे काम केले जाणार आहे. मुख्यतः ग्रामदैवत परिसर स्वच्छ ठेवण्याच्या उपक्रमामध्ये सातत्य ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सध्या २५ हून अधिक सभासद असून यात वाढ होत आहे. समाजउपयोगी कार्यामुळे नागरिकांचा याला प्रतिसाद मिळत आहे.

फोटो

०७अक्कलकोट-स्वच्छता

ओळी

भक्तांसह शहरवासीयांच्या निरोगी आरोग्यसाठी स्वच्छ अक्कलकोट सुंदर अक्कलकोट करण्याच्या उद्देशाने नव्याने स्थापन करण्यात आलेल्या निसर्ग सेवा फौंडेशनचा शुभारंभ स्वच्छतेच्या मोहिमेनेच केला.