शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

नारायण पाटील यांनी बदलली समीकरणे

By admin | Updated: October 21, 2014 13:56 IST

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर करमाळ्याचे राजकीय समीकरण बदलले असून, आता तालुक्याच्या राजकारणात बागल, जगताप, पाटील याशिवाय चौथा गट म्हणून संजय शिंदे गट सक्रिय झाला आहे.

नासीर कबीर■ करमाळा

 
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर करमाळ्याचे राजकीय समीकरण बदलले असून, आता तालुक्याच्या राजकारणात बागल, जगताप, पाटील याशिवाय चौथा गट म्हणून संजय शिंदे गट सक्रिय झाला आहे.
करमाळा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवायची म्हणून केवळ दोन महिनेच मतदारसंघाची ओळख करून घेणारे संजय शिंदे यांनी चांगलीच लढत दिली. करमाळा तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने संजय शिदे यांनी चौथा पर्याय उभा केला आहे. तालुक्यातील बागल गटातील विलासराव घुमरे, वामन बदे, तात्यासाहेब मस्कर, सुभाष गुळवे, बागल यांच्या मांगी गावातील देवानंद बागल, सुजित बागल, जगताप गटाबरोबर असलेला सावंत गट आदींसह रथी-महारथी नेतेमंडळी आपल्याकडे वळविण्यात ते यशस्वी झाले आणि त्याकडे बागल यांनीही दुर्लक्ष केले. 
संजय शिंदे यांनी करमाळ्यातून अपेक्षेप्रमाणे २0 हजार मतांचा आकडा पार केला. त्याबरोबरच कुडरूवाडी भागातून ३८ हजारांपर्यंत मतदान घेतल्याने बागल यांची हक्काची मते संजय शिंदे यांच्या पारड्यात पडली. मतविभागणीचा सर्वाधिक फटका बागल यांनाच बसला व बागल यांच्या नशिबी अवघ्या २५७ मतांनी पराभव आला. 
नारायण पाटील यांनी ऐन लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना शिवसेनेत प्रवेश करून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची प्रचंड सभा घेऊन मोठे शक्तिप्रदर्शन करून वातावरण निर्मिती केली. शिवसैनिकांना बरोबर घेत मोहिते-पाटील यांचा अशीर्वाद घेऊन तालुक्यातील मोहिते-पाटील गटाच्या नेत्या सवितादेवी राजेभोसले, केमचे सरपंच अजित तळेकर, नागरिक संघटनेचे अध्यक्ष कन्हैय्यालाल देवी आदींचा पाठिंबा मिळवून प्रचाराचे रान पेटविले. धनगर समाजाचे एकगठ्ठा मतदान मिळवण्यात ते यावेळी यशस्वी झाले. काँग्रेसचे उमेदवार जयवंतराव जगताप यांच्या मतांचा टक्का वाढला नाही, त्यामुळे नारायण पाटील यांची मते घटली नाहीत. कुडरूवाडी भागातील शिवसैनिकांची प्रामाणिक साथ, पोस्टल मतात मिळालेली नशिबाची साथ यामुळे पाटलांचा विजयाचा मार्ग सुकर झाला.
काँग्रेसचे जयवंतराव जगताप निवडणुका जाहीर झाल्यावर रिंगणात उतरले तोपर्यंत त्यांच्या गटाचे सर्मथक दुसरीकडे प्रचाराला लागले होते गत विधानसभेपेक्षा या विधानसभा निवडणुकीत त्यांचे मताधिक्य वाढण्याऐवजी घटले. सरलेल्या विधानसभा निवडणुकीचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या फेरीपासून ते थेट अखेरच्या एकविसाव्या फेरीपर्यंत आघाडी घेणार्‍या रश्मी बागल यांना टपाली मताने दगा दिला. 
शसंजय शिंदे यांनीही दोन महिन्यांच्या त्यांच्या राजकीय कालावधीत प्रस्थापितांविरूध्द तालुक्याच्या राजकारणात वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. 
मतविभागणीचा फायदा 
■ माढा तालुक्याचे नेते संजय शिंदे यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघात एंट्री केल्याने बागल गटाच्या सत्तास्थानाला हादरा बसला असून, मतविभाजनाचा व जातीच्या समीकरणाचा फायदा शिवसेनेचे नारायण पाटील यांना विजय मिळवून देण्यात झाला आहे.