शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

नावाच्या घोळामुळे आमदाराचे नाव कर्जमाफी यादीत : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 19:39 IST

नावाच्या घोळामुळे कोल्हापूरतील शिवसेनेचे आ़ प्रकाश आबिटकर यांचे नाव कर्जमाफीसाठीच्या यादीत आल्याचे स्पष्टीकरण सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज केले़

ठळक मुद्देकर्जमाफी योजनेसाठी अर्ज भरलेल्या सर्व पात्र शेतकºयांची कर्जमाफी होणारपात्र शेतकºयांनी गोंधळून जाऊ नये : सुभाष देशमुखचूक दुरूस्त करण्याच्या सूचना कोल्हापूर जिल्हा बँकेला देण्यात येतील

आॅनलाइन लोकमत सोलापूरपंढरपूर दि १६  : नावाच्या घोळामुळे कोल्हापूरतील शिवसेनेचे आ़ प्रकाश आबिटकर यांचे नाव कर्जमाफीसाठीच्या यादीत आल्याचे स्पष्टीकरण सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज केले़सहकार मंत्री सुभाष देशमुख हे शनिवारी पंढरपुरात एका खाजगी कार्यक्रमानिमित्त आले होते. तेव्हा त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला.आ़ प्रकाश आबिटकर यांच्याबाबतची घटना ही तांत्रिक बाब असू शकते, असे सांगून सुभाष देशमुख म्हणाले, प्रकाश अबिटकर नावाच्या दोन व्यक्ती आहेत. पण दोघांचे खाते वेगवेगळया बँकेत आहेत. शिवाय प्रकाश सुतार नावाच्या व्यक्तीचे आधार कार्ड, खाते नंबर आणि इतर माहिती तांत्रिक कारणाने ट्रेस न झाल्याने आ़ आबिटकर यांचे नाव कर्जमाफी शेतकºयाच्या यादीत आले असावे, असे देशमुख यांनी सांगितले.आबिटकर या आडनावाचे एकूण ३७ अर्ज आहेत. तसेच प्रकाश आबिटकर या नावाने सुध्दा एक अर्ज आहे, पण तो आमदारांचा नाही़ अर्ज नसतानाही कोल्हापूर जिल्हा बँकेने आ. प्रकाश आबिटकर यांचे खाते या योजनेच्या लाभासाठी सरकारकडे पाठविले़ एक अर्ज प्रकाश सुतार या व्यक्तीच्या नावाने आहे़ प्रकाश आबिटकर आणि प्रकाश सुतार या दोघांचाही एकच कर्जखाते क्रमांक कोल्हापूर जिल्हा बँकेने दिला आहे. त्यामुळे आ. प्रकाश आबिटकर यांचे नाव यादीत आले. हे दोन्ही खाते १८ महिन्यांचे पीककर्ज घेतलेली खाती आहेत. दोघांनीही पूर्ण कर्ज परत केले आहे. शिवाय आमदार प्रकाश आबिटकर यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. आ. प्रकाश अबीटकर यांनी ही बाब लक्षात आणून दिल्याने ही चूक दुरूस्त करण्याच्या सूचना कोल्हापूर जिल्हा बँकेला देण्यात येतील, असे सुभाष देशमुख यांनी सांगितले़कर्जमाफी योजनेसाठी अर्ज भरलेल्या सर्व पात्र शेतकºयांची कर्जमाफी होणार आहे. त्यामुळे पात्र शेतकºयांनी गोंधळून जाऊ नये, असेही सुभाष देशमुख यांनी सांगितले़ एफआरपी देणे बंधनकारकजे साखर कारखाने एफआरपीप्रमाणे उसाला दर देणार नाहीत़ त्यांच्यावर कारवाई होणारच आहे़ एफआरपी देणे बंधनकारक आहे़ शिवाय आगामी काळात साखर कारखान्यातील वजन काटे आॅनलाईन करत आहोत, अशी माहिती ही सुभाष देशमुख यांनी दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुख