शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

विभागीय आयुक्तांच्या नाराजीनंतरही नमामि चंद्रभागा आराखड्यास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 12:41 IST

कशी होणार प्रदूषणमुक्ती : बैठकांचा नुसताच फार्स

ठळक मुद्देजिल्ह्यातील यंत्रणांकडून अहवाल मागविण्यात आले ३१ जुलैैपर्यंत ते आयुक्त कार्यालयात सादर करायचे आहेतलोकसहभाग वाढणार कसा असा प्रश्नही नेहमी उपस्थित

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाजत-गाजत जाहीर केलेल्या नमामि चंद्रभागा प्राधिकरणाचे घोडे कृती आराखड्याच्या घोळातच अडकले आहे. या अभियानासंदर्भात  विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सोलापूर, सातारा, पुणे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणांना २०२२ पर्यंतचा कृती आराखडा सादर करण्याचे आदेश दिले होते, परंतु यंत्रणांनी आराखडेच सादर न केल्याने विभागीय आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

भीमा आणि चंद्रभागा हा लाखो वारकºयांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. भीमा नदीच्या पाण्यावर पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील लाखो लोकांचे जीवनही अवलंबून आहे. भीमा नदीला उगमापासून संगमापर्यंत प्रदूषणमुक्त करण्यासाठी जून २०१६ मध्ये फडणवीस आणि मुनगंटीवार यांनी नमामि चंद्रभागा प्राधिकरणाची घोषणा केली होती.

गेल्या दोन वर्षांत या प्राधिकरणाकडून फारसे काम झालेले नाही. सहा महिन्यातून एकदाच बैठका होतात. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी २६ जून २०१८ रोजी सोलापूर, पुणे, सातारा जिल्ह्यातील यंत्रणांची बैठक घेतली होती. या समितीच्या पहिल्या बैठकीत  नमामि चंद्रभागा प्राधिकरणांतर्गत समाविष्ट असलेले जिल्हे, महानगरपालिका, नगरपालिकांनी वार्षिक कृती आराखडा सादर करावा आणि सन २०२२ पर्यंतचा कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना देण्यात आल्या होत्या; मात्र आराखडे सादर न झाल्याने आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली होती.

नमामि चंद्रभागा हा मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख कार्यक्रम आहे. त्यामुळे संबंधित जिल्हा प्रशासन कार्यालयांनी तातडीने आराखडे सादर करावेत, असे पत्रही त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयांना पाठविले होते, परंतु अद्यापही सोलापूर जिल्ह्याचा कृती आराखडा विभागीय आयुक्त कार्यालयाला सादर झालेला नाही. अहवाल आणि कृती आराखड्याच्या संथ कामांमुळे भीमा नदी २०२२ पर्यंत खरोखरच प्रदूषणमुक्त होणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

नियोजनाची अनास्थाच्गेल्या दोन वर्षांपासून नमामि चंद्रभागा प्राधिकरणाच्या कामाची चर्चा आहे, परंतु सर्वंकष आराखड्यावर कामच झालेले नाही. विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर जिल्हा नियोजन अधिकाºयांनी जिल्हा परिषद, पंढरपूर नगरपालिका, सामाजिक वनीकरण, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, वनविभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा कृषी अधीक्षक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, भीमा कालवा मंडळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला पत्रे पाठविली आहेत. नियोजन अधिकाºयांच्या माहितीनुसार यातील अनेक विभागांनी आराखडे सादर केलेले नाहीत. भीमा नदीला उगमापासून संगमापर्यंत प्रदूषणमुक्त करण्यासाठी या सर्व विभागांचा सहभाग आवश्यक आहे. लोकसहभागही महत्त्वाचा आहे. या अभियानांतर्गत नेमकी कोणती कामे सुरु आहेत याबद्दलची माहिती देण्यासही जिल्हा नियोजन अधिकारी अनास्था दाखवितात. त्यामुळे लोकसहभाग वाढणार कसा असा प्रश्नही नेहमी उपस्थित होतो. 

विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील यंत्रणांकडून अहवाल मागविण्यात आले आहेत. काही लोकांनी आराखडे दिलेत. काही लोकांकडून यायचे आहेत. ३१ जुलैैपर्यंत ते आयुक्त कार्यालयात सादर करायचे आहेत. सध्या वारीचे वातावरण आहे. सगळे त्याच कामात बिझी आहेत. त्यामुळे कदाचित त्यांच्या डोक्यात हा विषय आलेला नसावा. - सर्जेराव दराडे, सोलापूर जिल्हा नियोजन अधिकारी 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयPandharpurपंढरपूरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा