शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

आगळगाव, कांदलगाव परिसरात मुसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:22 IST

बार्शी : बार्शी तालुक्यासाठी यंदाचा पावसाळा हा नुकसानकारक ठरत आहे. मुळात पहिल्या तीन महिन्यांत सरासरीच्या १२५ टक्के पाऊस झाला ...

बार्शी : बार्शी तालुक्यासाठी यंदाचा पावसाळा हा नुकसानकारक ठरत आहे. मुळात पहिल्या तीन महिन्यांत सरासरीच्या १२५ टक्के पाऊस झाला असताना आज तीन-चार दिवसांच्या विश्रांतीनंतर ग्रामीण भागातील कांदलगाव,देवगाव, आगळगाव, शेलगाव, धस पिंपळगाव, खडकलगाव आदी भागात शनिवारी रात्री पावणेआठ ते नऊच्या दरम्यान मेघगर्जना व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला.

या पावसामुळे खरीप हंगामातील कांदा, सोयाबीन या पिकांसह काढणीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या उडीद पिकाला मोठा फटका बसला आहे. मागील आठवड्यातही आगळगाव मंडळात सर्वाधिक ७० मिमी पाऊस एका रात्रीत पडला होता. त्यामुळे चांदणी नदीला महापूर आला होता. आता कुठे पाणी कमी झाले होते. तोवर आणखी पाऊस सुरू झाला. या पावसामुळे उडीद उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कित्येक शेतकऱ्यांच्या उडदाला कोंब आले आहेत. शेतात मळणीसाठी यंत्रही चिखल असल्याने घेऊन जाता येत नाही.

---

चांदणी नदी तुडुंब

चांदणी नदी तुडुंब भरून वाहत असल्याने धस पिंपळगाव, कंदलगाव, चुंब आदी गावातील पूल पाण्याखाली जात असल्याने नागरिकांचीही मोठी अडचण होत आहे. त्यात वरील बाजूचा बाभूळगाव मध्यम आणि कळंबवाडी लघु पाटबंधारे प्रकल्प ही भरले आहेत. त्यामुळे पाणी आणखीन वाढण्याची शक्यता आहे.