शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

मुंडेंना कार्तिकीला पहिल्यांदा महापूजेचा मान

By admin | Updated: June 4, 2014 00:41 IST

शासकीय पूजा; आषाढीप्रमाणे कार्तिकीला उपमुख्यमंत्र्यांना मान

पंढरपूर: कर कटेवर ठेवून युगे अठ्ठावीस विटेवर उभा असलेल्या सावळ्या, लेकुरवाळ्या विठ्ठलाची आषाढीला परंपरेप्रमाणे पूजा केली जायची. १९८५ साली विठ्ठल मंदिर राज्य शासनाच्या ताब्यात गेल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी आषाढीला शासकीय पहिली महापूजा केली होती. १९९५ साली युती शासनाच्या काळात गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर कार्तिकीला महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची परंपरा सुरू झाली आणि पहिल्या शासकीय महापूजेचा मान उपमुख्यमंत्री या नात्याने मुंडे यांना मिळाला. वारकरी सांप्रदायात आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री वारीला फार मोठा मान आहे. या चारही वार्‍या चुकल्यानंतर राज्यासह परराज्यांतील भाविक महिना व पंधरा दिवसांच्या एकादशीला पंढरीला हजेरी लावून चंद्रभागा स्रान आणि विठ्ठलाचे दर्शन घेऊन पुनित होतात. पंढरीच्या विठ्ठल मंदिराच्या निर्मितीपासून प्रत्येक वारीला म्हणजे एकादशीला मान आहे. पूर्वी आषाढीला जिल्ह्याचे प्रमुख या नात्याने जिल्हाधिकारी किंवा त्यांच्या अनुपस्थितीत प्रांताधिकार्‍यांच्या हस्ते पूजा केली जायची. ते उपलब्ध नसल्यास मंत्री किंवा तत्सम अधिकारी पूजा करायचे. वारी ही वारकर्‍यांची असल्याने या परंपरेला छेद देण्यासाठी १९७२ साली अशा पूजेला विरोध झाला आणि शासकीय महापूजा बंद पडली. दरम्यान १९७२ साली राज्यात मोठा दुष्काळ पडल्यानंतर वारकर्‍यांमधून पूजा बंद केल्याने हा कोप झाल्याचा सूर निघाला. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांनी पुढाकार घेत ही पूजा सुरू केली. दरम्यान १९८५ साली विठ्ठल-रूक्मिणी मंदिर बडवे, उत्पातांचे अधिकार त्यांच्याकडेच ठेवत राज्य शासनाने ताब्यात घेतले. तेव्हा आषाढीला पहिली शासकीय महापूजा करण्याचा मान मुख्यमंत्री या नात्याने वसंतदादा पाटील यांना मिळाला. ही परंपरा आजतागायत अखंडित सुरू आहे. १९९५ साली राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजप-शिवसेना पुरस्कृत युतीची सत्ता आली आणि गोपीनाथ मुंडे यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ पडली. त्यानंतर आषाढीप्रमाणे कार्तिकीलाही शासकीय महापूजा करण्याचा मान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना देण्यात आला. गोपीनाथ मुंडे यांच्यापासून १९९५ साली सुरू झालेली ही परंपरा आजही सुरूच आहे. पण २०१२ मध्ये राज्यात उपमुख्यमंत्रीपद रिक्त असल्याने ही पूजा तत्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी केली. तर २०१३ साली अजित पवार उपमुख्यमंत्री पदावर असताना ऊसदराचा लढा व आंदोलन सुरू असल्याने ते पंढरीला येऊ शकले नाहीत. यामुळे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप सोपल यांनी ही पूजा केली. कार्तिकीच्या शासकीय महापूजेसाठी गोपीनाथ मुंडे हे १९९५ पासून १९९९ पर्यंत पंढरीला यायचे. १२ मे २०१४ रोजी त्यांनी पंढरीत वास्तव्य करून सपत्नीक विठ्ठलाचे दर्शन घेऊन देशात भाजप बहुमत स्पष्ट करेल, असा विश्वास व्यक्त केला होता, तो खराही ठरला.