शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुंडेंना कार्तिकीला पहिल्यांदा महापूजेचा मान

By admin | Updated: June 4, 2014 00:41 IST

शासकीय पूजा; आषाढीप्रमाणे कार्तिकीला उपमुख्यमंत्र्यांना मान

पंढरपूर: कर कटेवर ठेवून युगे अठ्ठावीस विटेवर उभा असलेल्या सावळ्या, लेकुरवाळ्या विठ्ठलाची आषाढीला परंपरेप्रमाणे पूजा केली जायची. १९८५ साली विठ्ठल मंदिर राज्य शासनाच्या ताब्यात गेल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी आषाढीला शासकीय पहिली महापूजा केली होती. १९९५ साली युती शासनाच्या काळात गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर कार्तिकीला महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची परंपरा सुरू झाली आणि पहिल्या शासकीय महापूजेचा मान उपमुख्यमंत्री या नात्याने मुंडे यांना मिळाला. वारकरी सांप्रदायात आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री वारीला फार मोठा मान आहे. या चारही वार्‍या चुकल्यानंतर राज्यासह परराज्यांतील भाविक महिना व पंधरा दिवसांच्या एकादशीला पंढरीला हजेरी लावून चंद्रभागा स्रान आणि विठ्ठलाचे दर्शन घेऊन पुनित होतात. पंढरीच्या विठ्ठल मंदिराच्या निर्मितीपासून प्रत्येक वारीला म्हणजे एकादशीला मान आहे. पूर्वी आषाढीला जिल्ह्याचे प्रमुख या नात्याने जिल्हाधिकारी किंवा त्यांच्या अनुपस्थितीत प्रांताधिकार्‍यांच्या हस्ते पूजा केली जायची. ते उपलब्ध नसल्यास मंत्री किंवा तत्सम अधिकारी पूजा करायचे. वारी ही वारकर्‍यांची असल्याने या परंपरेला छेद देण्यासाठी १९७२ साली अशा पूजेला विरोध झाला आणि शासकीय महापूजा बंद पडली. दरम्यान १९७२ साली राज्यात मोठा दुष्काळ पडल्यानंतर वारकर्‍यांमधून पूजा बंद केल्याने हा कोप झाल्याचा सूर निघाला. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांनी पुढाकार घेत ही पूजा सुरू केली. दरम्यान १९८५ साली विठ्ठल-रूक्मिणी मंदिर बडवे, उत्पातांचे अधिकार त्यांच्याकडेच ठेवत राज्य शासनाने ताब्यात घेतले. तेव्हा आषाढीला पहिली शासकीय महापूजा करण्याचा मान मुख्यमंत्री या नात्याने वसंतदादा पाटील यांना मिळाला. ही परंपरा आजतागायत अखंडित सुरू आहे. १९९५ साली राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजप-शिवसेना पुरस्कृत युतीची सत्ता आली आणि गोपीनाथ मुंडे यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ पडली. त्यानंतर आषाढीप्रमाणे कार्तिकीलाही शासकीय महापूजा करण्याचा मान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना देण्यात आला. गोपीनाथ मुंडे यांच्यापासून १९९५ साली सुरू झालेली ही परंपरा आजही सुरूच आहे. पण २०१२ मध्ये राज्यात उपमुख्यमंत्रीपद रिक्त असल्याने ही पूजा तत्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी केली. तर २०१३ साली अजित पवार उपमुख्यमंत्री पदावर असताना ऊसदराचा लढा व आंदोलन सुरू असल्याने ते पंढरीला येऊ शकले नाहीत. यामुळे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप सोपल यांनी ही पूजा केली. कार्तिकीच्या शासकीय महापूजेसाठी गोपीनाथ मुंडे हे १९९५ पासून १९९९ पर्यंत पंढरीला यायचे. १२ मे २०१४ रोजी त्यांनी पंढरीत वास्तव्य करून सपत्नीक विठ्ठलाचे दर्शन घेऊन देशात भाजप बहुमत स्पष्ट करेल, असा विश्वास व्यक्त केला होता, तो खराही ठरला.