शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या दांडियात माळीनगरातील पारध्यांच्या टिपऱ्या, शोधला आत्मसन्मानाचा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 23:15 IST

पालावरचे जीवन जगणा-या पारध्यांच्या आयुष्याला सुखाची किनार कधी येईल, असा प्रश्न नेहमीच विचारला जात असला तरी सुखाच्या मृगजळाच्या मागे न धावता अकलूज तालुक्यातील माळीनगरमधील संग्रामनगर येथील नऊ पारधी कुटुंबांनी आत्मसन्मानाचा मार्ग शोधला आहे.

गोपालकृष्ण मांडवकरसोलापूर : पालावरचे जीवन जगणा-या पारध्यांच्या आयुष्याला सुखाची किनार कधी येईल, असा प्रश्न नेहमीच विचारला जात असला तरी सुखाच्या मृगजळाच्या मागे न धावता अकलूज तालुक्यातील माळीनगरमधील संग्रामनगर येथील नऊ पारधी कुटुंबांनी आत्मसन्मानाचा मार्ग शोधला आहे. नवरात्रात मुंबईतील गारबा आणि दांडियासाठी तिथे जाऊन टिपºया तयार करण्याचा आणि तो विकण्याचा अफलातून व्यवसाय या पारध्यांनी सुरू केला आहे.मुंबईतील दादर, व्हीटी, डोंबिवली, भायखळा या भागामध्ये या पारधी कुटुंबांचा व्यवसाय सध्या जोर धरत आहे. फूटपाथलगत किंवा एखाद्या इमारतीच्या आश्रयाने राहून तिथेच टिप-या तयार करण्याचा उद्योग ते करीत आहेत. फूटपाथवर किंवा स्टेशनवर या टिपºया विकून त्यातून पैसा कमविणाºया या पारध्यांची धडपड लक्षवेधी ठरावी, अशीच आहे.संग्रामनगरातील गौराबाई पवार, तिचा विवाहित मुलगा किसन पवार, सुरेश चव्हाण, दत्तू चव्हाण, बापू पवार, लाला चव्हाण, गोपाल पवार, अंबादास पवार आणि शिवा पवार या नऊ जणांचे कुटुंब गेल्या १५ दिवसांपासून गावातील घरांना कुलूप लावून मुंबईत राबत आहेत. हे कुटुंब मुंबईतील व्यापाºयाकडून ३०० ते ४०० रुपयात एक बंडल या भावाने बेलाच्या काठ्या विकत घेतात. चमकी, झिल्ली, पेस्ट खरेदी करून त्यापासून सुंदर टिपºया तयार करतात. नंतर त्यांची विक्री १० ते २० रुपये जोडी या भावाने करतात. या नऊ दिवसांच्या सीझनमध्ये एक कुटुंब २० ते २५ हजार रुपयांची कमाई करते. नवरात्र संपले की त्याच पैशातून मुंबईच्या ठोक बाजारातून फुगे, खेळणी खरेदी करायची आणि अकलूजमध्ये परत येऊन कुटुंबातील महिलांच्या माध्यमातून बाजाराच्या दिवशी परिसरातील खेड्यांमध्ये किंवा यात्रांमध्ये त्याची चिल्लर विक्री करायची, असा त्यांचा व्यवसाय आहे. मागील १५ वर्षांपासून या कुटुंबाचा हा व्यवसाय सुरू आहे.............................मिरची, लिंबाचाही व्यापारकेवळ दांडिया विकण्याचाच नव्हे; तर मुंबईत जाऊन लिंबू, मिरच्या विकण्याचा व्यवसायही हे पारधी कुटुंब करतात. अकलूजच्या बाजारातून दर गुरुवारी लिंबू-मिरचीची खरेदी करायची. शुक्रवारी रेल्वेने मुंबई गाठायची. दुस-या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी मुंबईच्या बाजारात त्याची विक्री करायची आणि त्याच रात्री किंवा सकाळी रेल्वेने परत यायचे. पुन्हा गुरुवारी तोच क्रम, अशी त्यांची व्यवसायाची पद्धत आहे. बेरोजगारीच्या नावाने सरकारला दोष देण्यापेक्षा किंवा कुणापुढे हात पसरण्यापेक्षा त्यांनी निवडलेला हा आत्मसन्मानाचा मार्ग कौतुकास्पद असाच आहे.