शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

मुंबईच्या दांडियात माळीनगरातील पारध्यांच्या टिपऱ्या, शोधला आत्मसन्मानाचा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 23:15 IST

पालावरचे जीवन जगणा-या पारध्यांच्या आयुष्याला सुखाची किनार कधी येईल, असा प्रश्न नेहमीच विचारला जात असला तरी सुखाच्या मृगजळाच्या मागे न धावता अकलूज तालुक्यातील माळीनगरमधील संग्रामनगर येथील नऊ पारधी कुटुंबांनी आत्मसन्मानाचा मार्ग शोधला आहे.

गोपालकृष्ण मांडवकरसोलापूर : पालावरचे जीवन जगणा-या पारध्यांच्या आयुष्याला सुखाची किनार कधी येईल, असा प्रश्न नेहमीच विचारला जात असला तरी सुखाच्या मृगजळाच्या मागे न धावता अकलूज तालुक्यातील माळीनगरमधील संग्रामनगर येथील नऊ पारधी कुटुंबांनी आत्मसन्मानाचा मार्ग शोधला आहे. नवरात्रात मुंबईतील गारबा आणि दांडियासाठी तिथे जाऊन टिपºया तयार करण्याचा आणि तो विकण्याचा अफलातून व्यवसाय या पारध्यांनी सुरू केला आहे.मुंबईतील दादर, व्हीटी, डोंबिवली, भायखळा या भागामध्ये या पारधी कुटुंबांचा व्यवसाय सध्या जोर धरत आहे. फूटपाथलगत किंवा एखाद्या इमारतीच्या आश्रयाने राहून तिथेच टिप-या तयार करण्याचा उद्योग ते करीत आहेत. फूटपाथवर किंवा स्टेशनवर या टिपºया विकून त्यातून पैसा कमविणाºया या पारध्यांची धडपड लक्षवेधी ठरावी, अशीच आहे.संग्रामनगरातील गौराबाई पवार, तिचा विवाहित मुलगा किसन पवार, सुरेश चव्हाण, दत्तू चव्हाण, बापू पवार, लाला चव्हाण, गोपाल पवार, अंबादास पवार आणि शिवा पवार या नऊ जणांचे कुटुंब गेल्या १५ दिवसांपासून गावातील घरांना कुलूप लावून मुंबईत राबत आहेत. हे कुटुंब मुंबईतील व्यापाºयाकडून ३०० ते ४०० रुपयात एक बंडल या भावाने बेलाच्या काठ्या विकत घेतात. चमकी, झिल्ली, पेस्ट खरेदी करून त्यापासून सुंदर टिपºया तयार करतात. नंतर त्यांची विक्री १० ते २० रुपये जोडी या भावाने करतात. या नऊ दिवसांच्या सीझनमध्ये एक कुटुंब २० ते २५ हजार रुपयांची कमाई करते. नवरात्र संपले की त्याच पैशातून मुंबईच्या ठोक बाजारातून फुगे, खेळणी खरेदी करायची आणि अकलूजमध्ये परत येऊन कुटुंबातील महिलांच्या माध्यमातून बाजाराच्या दिवशी परिसरातील खेड्यांमध्ये किंवा यात्रांमध्ये त्याची चिल्लर विक्री करायची, असा त्यांचा व्यवसाय आहे. मागील १५ वर्षांपासून या कुटुंबाचा हा व्यवसाय सुरू आहे.............................मिरची, लिंबाचाही व्यापारकेवळ दांडिया विकण्याचाच नव्हे; तर मुंबईत जाऊन लिंबू, मिरच्या विकण्याचा व्यवसायही हे पारधी कुटुंब करतात. अकलूजच्या बाजारातून दर गुरुवारी लिंबू-मिरचीची खरेदी करायची. शुक्रवारी रेल्वेने मुंबई गाठायची. दुस-या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी मुंबईच्या बाजारात त्याची विक्री करायची आणि त्याच रात्री किंवा सकाळी रेल्वेने परत यायचे. पुन्हा गुरुवारी तोच क्रम, अशी त्यांची व्यवसायाची पद्धत आहे. बेरोजगारीच्या नावाने सरकारला दोष देण्यापेक्षा किंवा कुणापुढे हात पसरण्यापेक्षा त्यांनी निवडलेला हा आत्मसन्मानाचा मार्ग कौतुकास्पद असाच आहे.