शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या दांडियात माळीनगरातील पारध्यांच्या टिपऱ्या, शोधला आत्मसन्मानाचा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 23:15 IST

पालावरचे जीवन जगणा-या पारध्यांच्या आयुष्याला सुखाची किनार कधी येईल, असा प्रश्न नेहमीच विचारला जात असला तरी सुखाच्या मृगजळाच्या मागे न धावता अकलूज तालुक्यातील माळीनगरमधील संग्रामनगर येथील नऊ पारधी कुटुंबांनी आत्मसन्मानाचा मार्ग शोधला आहे.

गोपालकृष्ण मांडवकरसोलापूर : पालावरचे जीवन जगणा-या पारध्यांच्या आयुष्याला सुखाची किनार कधी येईल, असा प्रश्न नेहमीच विचारला जात असला तरी सुखाच्या मृगजळाच्या मागे न धावता अकलूज तालुक्यातील माळीनगरमधील संग्रामनगर येथील नऊ पारधी कुटुंबांनी आत्मसन्मानाचा मार्ग शोधला आहे. नवरात्रात मुंबईतील गारबा आणि दांडियासाठी तिथे जाऊन टिपºया तयार करण्याचा आणि तो विकण्याचा अफलातून व्यवसाय या पारध्यांनी सुरू केला आहे.मुंबईतील दादर, व्हीटी, डोंबिवली, भायखळा या भागामध्ये या पारधी कुटुंबांचा व्यवसाय सध्या जोर धरत आहे. फूटपाथलगत किंवा एखाद्या इमारतीच्या आश्रयाने राहून तिथेच टिप-या तयार करण्याचा उद्योग ते करीत आहेत. फूटपाथवर किंवा स्टेशनवर या टिपºया विकून त्यातून पैसा कमविणाºया या पारध्यांची धडपड लक्षवेधी ठरावी, अशीच आहे.संग्रामनगरातील गौराबाई पवार, तिचा विवाहित मुलगा किसन पवार, सुरेश चव्हाण, दत्तू चव्हाण, बापू पवार, लाला चव्हाण, गोपाल पवार, अंबादास पवार आणि शिवा पवार या नऊ जणांचे कुटुंब गेल्या १५ दिवसांपासून गावातील घरांना कुलूप लावून मुंबईत राबत आहेत. हे कुटुंब मुंबईतील व्यापाºयाकडून ३०० ते ४०० रुपयात एक बंडल या भावाने बेलाच्या काठ्या विकत घेतात. चमकी, झिल्ली, पेस्ट खरेदी करून त्यापासून सुंदर टिपºया तयार करतात. नंतर त्यांची विक्री १० ते २० रुपये जोडी या भावाने करतात. या नऊ दिवसांच्या सीझनमध्ये एक कुटुंब २० ते २५ हजार रुपयांची कमाई करते. नवरात्र संपले की त्याच पैशातून मुंबईच्या ठोक बाजारातून फुगे, खेळणी खरेदी करायची आणि अकलूजमध्ये परत येऊन कुटुंबातील महिलांच्या माध्यमातून बाजाराच्या दिवशी परिसरातील खेड्यांमध्ये किंवा यात्रांमध्ये त्याची चिल्लर विक्री करायची, असा त्यांचा व्यवसाय आहे. मागील १५ वर्षांपासून या कुटुंबाचा हा व्यवसाय सुरू आहे.............................मिरची, लिंबाचाही व्यापारकेवळ दांडिया विकण्याचाच नव्हे; तर मुंबईत जाऊन लिंबू, मिरच्या विकण्याचा व्यवसायही हे पारधी कुटुंब करतात. अकलूजच्या बाजारातून दर गुरुवारी लिंबू-मिरचीची खरेदी करायची. शुक्रवारी रेल्वेने मुंबई गाठायची. दुस-या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी मुंबईच्या बाजारात त्याची विक्री करायची आणि त्याच रात्री किंवा सकाळी रेल्वेने परत यायचे. पुन्हा गुरुवारी तोच क्रम, अशी त्यांची व्यवसायाची पद्धत आहे. बेरोजगारीच्या नावाने सरकारला दोष देण्यापेक्षा किंवा कुणापुढे हात पसरण्यापेक्षा त्यांनी निवडलेला हा आत्मसन्मानाचा मार्ग कौतुकास्पद असाच आहे.