शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुढवी गावात दहा दिवसांपासून लाईट नाही; पंचनामे करण्यास प्रशासनाची टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 07:16 IST

वंचित बहुजन आघाडीचा आरोप; चोवीस तासाच्या आत आम्हास माहिती का दिली नाही; प्रशासनाकडून आडमुठी भूमिका

मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील मुढवी गावांमध्ये महापुराचे कारण देऊन महावितरणने दहा दिवसांपासून वीज पुरवठा बंद ठेवला आहे, गावात पिण्याच्या पाण्याबरोबरच वीज नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मोबाईल चार्जिंग नाहीत अशा परिस्थितीमध्ये प्रशासन झालेल्या नुकसानीचे मोबाईल मध्ये फोटो काढून पाठवा,पाण्यात वाहून गेलेल्या जनावरांची माहिती आम्हाला २४ तासाच्या आत का कळवली नाही असे म्हणून पंचनामे करण्यास टाळाटाळ करत असून या प्रशासनाच्या आडमुठेपणाच्या भूमिकेने निसर्गाशी लढता-लढता आम्हाला प्रशासनानाशीही लढावे लागत असल्याची खंत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष धनाजी सरवदे यांनी 'लोकमत' शी बोलताना व्यक्त केली

परतीच्या पावसाने मंगळवेढा तालुक्यात दाणादाण उडवली असून झालेल्या अतिवृष्टीत शेतकरी पूर्ण संपला आहे. त्यातच उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावांना अतिवृष्टी बरोबर या पुराच्या पाण्याचाही सामना करावा लागला, अशा परिस्थितीत स्वतःचा जीव वाचवण्या बरोबरच जनावरे वाचविण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान होते, त्यामध्ये अनेकांची जनावरेही या पुरात वाहून गेली असून आठ दिवसानंतर प्रशासनाने पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे मात्र या जनावरांचे पंचनामे करताना प्रशासनाकडून आम्हाला २४ तासात का कळविले नाही असे प्रश्न करून त्या जनावरांच्या पंचनाम्याची माहिती घेण्यास अधिकारी टाळाटाळ करीत आहेत, त्यामुळे हा प्रशासनाचा आडमुठेपणा दिसून येत असून त्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे प्रशासनाने करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर गेल्या दहा दिवसांपासून गावात लाईट नसल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे याची दखल लोकप्रतिनिधींनी तात्काळ घेऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना प्रशासनाला देणे गरजेचे असल्याचे प्रहार चे म्हणणे आहे.

 एका बाजूला शेतकरी सामान्य जनता निसर्गाशी झुंजत असताना दुसऱ्या बाजूला आमचे पंचनामे करा म्हणून प्रशासनाशीही झुंजायला लावू नये एवढीच सामान्य जनतेची अपेक्षा आहे तरी प्रशासनाने तात्काळ या जनतेला दिलासा देत नुकसान ग्रस्तांचे सर्व पंचनामे करणे गरजेचे असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष धनाजी सरवदे यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरmahavitaranमहावितरणfloodपूरRainपाऊस