शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

मुढवी गावात दहा दिवसांपासून लाईट नाही; पंचनामे करण्यास प्रशासनाची टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 07:16 IST

वंचित बहुजन आघाडीचा आरोप; चोवीस तासाच्या आत आम्हास माहिती का दिली नाही; प्रशासनाकडून आडमुठी भूमिका

मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील मुढवी गावांमध्ये महापुराचे कारण देऊन महावितरणने दहा दिवसांपासून वीज पुरवठा बंद ठेवला आहे, गावात पिण्याच्या पाण्याबरोबरच वीज नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मोबाईल चार्जिंग नाहीत अशा परिस्थितीमध्ये प्रशासन झालेल्या नुकसानीचे मोबाईल मध्ये फोटो काढून पाठवा,पाण्यात वाहून गेलेल्या जनावरांची माहिती आम्हाला २४ तासाच्या आत का कळवली नाही असे म्हणून पंचनामे करण्यास टाळाटाळ करत असून या प्रशासनाच्या आडमुठेपणाच्या भूमिकेने निसर्गाशी लढता-लढता आम्हाला प्रशासनानाशीही लढावे लागत असल्याची खंत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष धनाजी सरवदे यांनी 'लोकमत' शी बोलताना व्यक्त केली

परतीच्या पावसाने मंगळवेढा तालुक्यात दाणादाण उडवली असून झालेल्या अतिवृष्टीत शेतकरी पूर्ण संपला आहे. त्यातच उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावांना अतिवृष्टी बरोबर या पुराच्या पाण्याचाही सामना करावा लागला, अशा परिस्थितीत स्वतःचा जीव वाचवण्या बरोबरच जनावरे वाचविण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान होते, त्यामध्ये अनेकांची जनावरेही या पुरात वाहून गेली असून आठ दिवसानंतर प्रशासनाने पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे मात्र या जनावरांचे पंचनामे करताना प्रशासनाकडून आम्हाला २४ तासात का कळविले नाही असे प्रश्न करून त्या जनावरांच्या पंचनाम्याची माहिती घेण्यास अधिकारी टाळाटाळ करीत आहेत, त्यामुळे हा प्रशासनाचा आडमुठेपणा दिसून येत असून त्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे प्रशासनाने करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर गेल्या दहा दिवसांपासून गावात लाईट नसल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे याची दखल लोकप्रतिनिधींनी तात्काळ घेऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना प्रशासनाला देणे गरजेचे असल्याचे प्रहार चे म्हणणे आहे.

 एका बाजूला शेतकरी सामान्य जनता निसर्गाशी झुंजत असताना दुसऱ्या बाजूला आमचे पंचनामे करा म्हणून प्रशासनाशीही झुंजायला लावू नये एवढीच सामान्य जनतेची अपेक्षा आहे तरी प्रशासनाने तात्काळ या जनतेला दिलासा देत नुकसान ग्रस्तांचे सर्व पंचनामे करणे गरजेचे असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष धनाजी सरवदे यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरmahavitaranमहावितरणfloodपूरRainपाऊस