शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

मोहिनी एकादशी: विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाख भाविक पंढरीत फुलला विठ्ठल भक्तांचा मळा

By admin | Updated: May 11, 2014 00:11 IST

पंढरपूर : वैशाख महिन्यात शुक्ल पक्षातील मोहिनी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले होते.

पंढरपूर : वैशाख महिन्यात शुक्ल पक्षातील मोहिनी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले होते. मोहिनी एकादशीनिमित्त महाराष्टÑाच्या कानाकोपर्‍यांतून पंढरीत भाविक दाखल झाले होते. यामध्ये भाविकांनी रेल्वेने पंढरपूरला येणे पसंत केले होते. यामुळे रेल्वे स्टेशनकडून विठ्ठल मंदिराकडे भाविक जादा संख्येने येत होते. दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी झाली होती. दुपारी दर्शन मंडपाचे आठ गाळे भरुन धोंडोपंतदादा मठापर्यंत रांग पोहचली होती. विठ्ठलाला नेहमीप्रमाणे सर्व नित्योपचार करण्यात आले. विठ्ठलाच्या दर्शनासाठी होत असलेली वाढती गर्दी पाहून स्टेशन रोड व प्रदक्षिणा मार्गावर किरकोळ व्यापार्‍यांनी दुकाने थाटली होती. जादा गर्दी असणार्‍या चौफाळा चौकात मागील तीन दिवसांपासून पोलीस चौकीचे बनकर पडल्याने भाविकांना मंदिराकडे ये-जा करताना अडथळा निर्माण होत होता. मोहिनी एकादशीनिमित्त ४,५०० भाविकांनी आॅनलाईन विठ्ठलाच्या दर्शनासाठी बुकिंग केले होते. यामध्ये १२०० भाविकांनी शुक्रवारी तर २७५० भाविकांनी त्यापूर्वी आॅनलाईन दर्शन बुकिंग केले होते. विठ्ठलाचे दर्शन घेऊन आलेल्या छोट्या दिंड्या प्रदक्षिणा मार्गावरुन फेरी मारुन जात होत्या. त्यामधील वारकरी जागोजागी भजन, कीर्तन केले जात होते. (प्रतिनिधी)

----------------------------------------

मोहिनी एकादशीचे महत्त्व

पूर्वी सरस्वती नदीकाठच्या भद्रावती नावाच्या नगरीवर ध्रुतिमान नावाच्या राजाचे राज्य होते. त्या नगरीत धनपाळ नावाचा धार्मिक सधन व्यापारी होता. त्याने जनकल्याणासाठी विहिरी, तलाव बांधले. त्याचबरोबर अनेक कामे केली. त्याला पाच मुले होती. त्यामधील चार मुले वडिलांप्रमाणे धर्म, नीती मानून वागणारी होती. तर पाचवा दुराचारी निघाला. व्यापार्‍याने त्याला घरातून हाकलून दिले. तो चोर्‍या करु लागला. त्याला अनेक वेळा राजसेवकांनी पकडले. परंतु त्याला व्यापार्‍याच्या चांगल्या वागणुकीमुळे सोडण्यात आले. परत त्याने मोठी चोरी केल्यामुळे त्याला राज्याबाहेर काढले. तो जंगलात गेला तेव्हा त्याला कष्टी जीवन जगावे लागले. त्याला पश्चाताप झाला. आपले आई-वडील, भाऊ ताठ मानेने जगतात, तसे आपण जगावे असे त्याला वाटले. याचवेळी त्याला अरण्यात कौंडिल्य ऋषी दिसले. त्याने त्यांच्यासमोर प्रांजळपणे सर्व अपराधाची कबुली दिली. तेव्हा ऋषी म्हणाले, मुला तू वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील मोहिनी एकादशी व्रत कर, तुझ्या पापांचा नाश होईल. त्याने एकादशी व्रत केल्याने त्याच्या पापांचा नाश झाला, अशी दंतकथा सांगितले जाते.