शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

मोहिनी एकादशी: विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाख भाविक पंढरीत फुलला विठ्ठल भक्तांचा मळा

By admin | Updated: May 11, 2014 00:11 IST

पंढरपूर : वैशाख महिन्यात शुक्ल पक्षातील मोहिनी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले होते.

पंढरपूर : वैशाख महिन्यात शुक्ल पक्षातील मोहिनी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले होते. मोहिनी एकादशीनिमित्त महाराष्टÑाच्या कानाकोपर्‍यांतून पंढरीत भाविक दाखल झाले होते. यामध्ये भाविकांनी रेल्वेने पंढरपूरला येणे पसंत केले होते. यामुळे रेल्वे स्टेशनकडून विठ्ठल मंदिराकडे भाविक जादा संख्येने येत होते. दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी झाली होती. दुपारी दर्शन मंडपाचे आठ गाळे भरुन धोंडोपंतदादा मठापर्यंत रांग पोहचली होती. विठ्ठलाला नेहमीप्रमाणे सर्व नित्योपचार करण्यात आले. विठ्ठलाच्या दर्शनासाठी होत असलेली वाढती गर्दी पाहून स्टेशन रोड व प्रदक्षिणा मार्गावर किरकोळ व्यापार्‍यांनी दुकाने थाटली होती. जादा गर्दी असणार्‍या चौफाळा चौकात मागील तीन दिवसांपासून पोलीस चौकीचे बनकर पडल्याने भाविकांना मंदिराकडे ये-जा करताना अडथळा निर्माण होत होता. मोहिनी एकादशीनिमित्त ४,५०० भाविकांनी आॅनलाईन विठ्ठलाच्या दर्शनासाठी बुकिंग केले होते. यामध्ये १२०० भाविकांनी शुक्रवारी तर २७५० भाविकांनी त्यापूर्वी आॅनलाईन दर्शन बुकिंग केले होते. विठ्ठलाचे दर्शन घेऊन आलेल्या छोट्या दिंड्या प्रदक्षिणा मार्गावरुन फेरी मारुन जात होत्या. त्यामधील वारकरी जागोजागी भजन, कीर्तन केले जात होते. (प्रतिनिधी)

----------------------------------------

मोहिनी एकादशीचे महत्त्व

पूर्वी सरस्वती नदीकाठच्या भद्रावती नावाच्या नगरीवर ध्रुतिमान नावाच्या राजाचे राज्य होते. त्या नगरीत धनपाळ नावाचा धार्मिक सधन व्यापारी होता. त्याने जनकल्याणासाठी विहिरी, तलाव बांधले. त्याचबरोबर अनेक कामे केली. त्याला पाच मुले होती. त्यामधील चार मुले वडिलांप्रमाणे धर्म, नीती मानून वागणारी होती. तर पाचवा दुराचारी निघाला. व्यापार्‍याने त्याला घरातून हाकलून दिले. तो चोर्‍या करु लागला. त्याला अनेक वेळा राजसेवकांनी पकडले. परंतु त्याला व्यापार्‍याच्या चांगल्या वागणुकीमुळे सोडण्यात आले. परत त्याने मोठी चोरी केल्यामुळे त्याला राज्याबाहेर काढले. तो जंगलात गेला तेव्हा त्याला कष्टी जीवन जगावे लागले. त्याला पश्चाताप झाला. आपले आई-वडील, भाऊ ताठ मानेने जगतात, तसे आपण जगावे असे त्याला वाटले. याचवेळी त्याला अरण्यात कौंडिल्य ऋषी दिसले. त्याने त्यांच्यासमोर प्रांजळपणे सर्व अपराधाची कबुली दिली. तेव्हा ऋषी म्हणाले, मुला तू वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील मोहिनी एकादशी व्रत कर, तुझ्या पापांचा नाश होईल. त्याने एकादशी व्रत केल्याने त्याच्या पापांचा नाश झाला, अशी दंतकथा सांगितले जाते.