शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण चुकीचे : सुशिलकुमार शिंदे

By appasaheb.dilip.patil | Updated: July 29, 2017 11:08 IST

सोलापूर दि २९ : परराष्ट्र धोरण म्हणजे गल्लीतील भांडणं नव्हेत. परराष्ट्र धोरणावर पंतप्रधान मोदी यांचे सरकार काहीच काम करत नाही. प्रत्युत्तराची भाषा वापरली जाते. सीमा ा्रश्न सोडविण्यासाठी शेजारच्या देशांसोबत सलोख्याचे संबंध आवश्यक आहेत.

ठळक मुद्देनितीशकुमार हे खूप दिवसांपासून भाजपच्या संपर्कात होतेकाँग्रेसला टार्गेट करण्याचा प्रयत्नआरटीओचा दंड, भीती वाटली दंड करण्याचा अधिकार आरटीओला नाही

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २९ : परराष्ट्र धोरण म्हणजे गल्लीतील भांडणं नव्हेत. परराष्ट्र धोरणावर पंतप्रधान मोदी यांचे सरकार काहीच काम करत नाही. प्रत्युत्तराची भाषा वापरली जाते. सीमा ा्रश्न सोडविण्यासाठी शेजारच्या देशांसोबत सलोख्याचे संबंध आवश्यक आहेत. अमेरिका, पाकिस्तान येथे जाऊन तेथील पंतप्रधानांची गळाभेट घेण्यापेक्षा भारत-चीन सीमावाद निवळण्यासाठी ठोस प्रयत्न आवश्यक आहेत. सद्यस्थितीत चीनसोबत युद्ध झाल्यास हा खर्च देशाला परवडणारा नाही. त्यामुळे केंद्र सरकारचे परराष्ट्र धोरण चुकत आहे, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी मांडले.माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरच्या दौºयावर आहेत. काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी देशातील घडामोडींकडे लक्ष वेधले. देशातील काँग्रेस नेत्यांच्या उद्योगांवर व घरावर सीबीआयच्या धाडी पडत आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर अशा धाडी पडत असल्याने काँग्रेसला टार्गेट करण्याचा प्रयत्न होत असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार राजीनामा देऊन लगेच एनडीएसोबत गेले. या सर्व घडामोडी ज्या वेगवान पद्धतीने घडल्या आहेत त्या अर्थी नितीशकुमार हे खूप दिवसांपासून भाजपच्या संपर्कात होते. यापूर्वीही नितीशकुमार यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केले आहे. त्यामुळे भाजपचा घरोबा त्यांना नवीन नाही. आजपर्यंत ते करत असलेला धर्मनिरपेक्षपणाचा दावा आता फोल ठरल्याचे शिंदे यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्यापेक्षा प्रियांका गांधी यांच्याबद्दल सोशल मीडियावरून नेतृत्वाच्या अपेक्षा व्यक्त होत आहेत. याबद्दल शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, यापूर्वी इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया नावाने हिणवले जात होते. त्यांनी बांगला देशाची निर्मिती केल्यानंतर त्यांचा उल्लेख आयर्न लेडी असा झाला. राजीव गांधी यांच्याबाबतीतही असेच घडले होते. हवाई जहाज चलानेवाला देश क्या चलऐगा, अशी टीका होत होती. त्यांनी देशात माहिती प्रसारण क्षेत्रात क्रांती घडवून दाखविली. राहुल गांधी यांना देखील व्हिजन आहे. ते देखील या पद्धतीनेच आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवतील, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली. प्रियांका गांधी या तूर्तास राजकारणात येण्याची शक्यता वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार व प्रदेश सरचिटणीस प्रकाश यलगुलवार, धर्मा भोसले, गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, बाळासाहेब शेळके आदी उपस्थित होते.--------------------आरटीओचा दंड, भीती वाटलीआरटीओने मला दंड केला हे ऐकून भीती वाटली, असे मिश्कील उत्तर शिंदे यांनी यावेळी दिले. दंड करण्याचा अधिकार आरटीओला नाही. त्यांनी विलंब शुल्क घेतले आहे, असे स्पष्टीकरण करताना शिंदे यांनी वाहन परवाना नूतनीकरणामागचे कारण सांगितले. राज्याचे महाअभियोक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्या वडिलांच्या फियाटमधून मी १९६४ मध्ये वाहन परवाना काढला. त्यानंतर वेळोवेळी त्याचे नूतनीकरण केले. गेल्या पाच वर्षात मी केंद्र सरकारमध्ये असल्याने दिल्लीत होतो. त्यामुळे वाहन परवाना नूतनीकरणाची जबाबदारी एका मित्रावर दिली होती, पण तो विसरला. नूतनीकरणाची मुदत संपून पाच वर्षे होत असल्याने परवाना रद्द होईल म्हणून मी गुरुवारी आरटीओ कार्यालयात जाऊन नूतनीकरण केले.