शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण चुकीचे : सुशिलकुमार शिंदे

By appasaheb.dilip.patil | Updated: July 29, 2017 11:08 IST

सोलापूर दि २९ : परराष्ट्र धोरण म्हणजे गल्लीतील भांडणं नव्हेत. परराष्ट्र धोरणावर पंतप्रधान मोदी यांचे सरकार काहीच काम करत नाही. प्रत्युत्तराची भाषा वापरली जाते. सीमा ा्रश्न सोडविण्यासाठी शेजारच्या देशांसोबत सलोख्याचे संबंध आवश्यक आहेत.

ठळक मुद्देनितीशकुमार हे खूप दिवसांपासून भाजपच्या संपर्कात होतेकाँग्रेसला टार्गेट करण्याचा प्रयत्नआरटीओचा दंड, भीती वाटली दंड करण्याचा अधिकार आरटीओला नाही

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २९ : परराष्ट्र धोरण म्हणजे गल्लीतील भांडणं नव्हेत. परराष्ट्र धोरणावर पंतप्रधान मोदी यांचे सरकार काहीच काम करत नाही. प्रत्युत्तराची भाषा वापरली जाते. सीमा ा्रश्न सोडविण्यासाठी शेजारच्या देशांसोबत सलोख्याचे संबंध आवश्यक आहेत. अमेरिका, पाकिस्तान येथे जाऊन तेथील पंतप्रधानांची गळाभेट घेण्यापेक्षा भारत-चीन सीमावाद निवळण्यासाठी ठोस प्रयत्न आवश्यक आहेत. सद्यस्थितीत चीनसोबत युद्ध झाल्यास हा खर्च देशाला परवडणारा नाही. त्यामुळे केंद्र सरकारचे परराष्ट्र धोरण चुकत आहे, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी मांडले.माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरच्या दौºयावर आहेत. काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी देशातील घडामोडींकडे लक्ष वेधले. देशातील काँग्रेस नेत्यांच्या उद्योगांवर व घरावर सीबीआयच्या धाडी पडत आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर अशा धाडी पडत असल्याने काँग्रेसला टार्गेट करण्याचा प्रयत्न होत असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार राजीनामा देऊन लगेच एनडीएसोबत गेले. या सर्व घडामोडी ज्या वेगवान पद्धतीने घडल्या आहेत त्या अर्थी नितीशकुमार हे खूप दिवसांपासून भाजपच्या संपर्कात होते. यापूर्वीही नितीशकुमार यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केले आहे. त्यामुळे भाजपचा घरोबा त्यांना नवीन नाही. आजपर्यंत ते करत असलेला धर्मनिरपेक्षपणाचा दावा आता फोल ठरल्याचे शिंदे यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्यापेक्षा प्रियांका गांधी यांच्याबद्दल सोशल मीडियावरून नेतृत्वाच्या अपेक्षा व्यक्त होत आहेत. याबद्दल शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, यापूर्वी इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया नावाने हिणवले जात होते. त्यांनी बांगला देशाची निर्मिती केल्यानंतर त्यांचा उल्लेख आयर्न लेडी असा झाला. राजीव गांधी यांच्याबाबतीतही असेच घडले होते. हवाई जहाज चलानेवाला देश क्या चलऐगा, अशी टीका होत होती. त्यांनी देशात माहिती प्रसारण क्षेत्रात क्रांती घडवून दाखविली. राहुल गांधी यांना देखील व्हिजन आहे. ते देखील या पद्धतीनेच आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवतील, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली. प्रियांका गांधी या तूर्तास राजकारणात येण्याची शक्यता वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार व प्रदेश सरचिटणीस प्रकाश यलगुलवार, धर्मा भोसले, गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, बाळासाहेब शेळके आदी उपस्थित होते.--------------------आरटीओचा दंड, भीती वाटलीआरटीओने मला दंड केला हे ऐकून भीती वाटली, असे मिश्कील उत्तर शिंदे यांनी यावेळी दिले. दंड करण्याचा अधिकार आरटीओला नाही. त्यांनी विलंब शुल्क घेतले आहे, असे स्पष्टीकरण करताना शिंदे यांनी वाहन परवाना नूतनीकरणामागचे कारण सांगितले. राज्याचे महाअभियोक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्या वडिलांच्या फियाटमधून मी १९६४ मध्ये वाहन परवाना काढला. त्यानंतर वेळोवेळी त्याचे नूतनीकरण केले. गेल्या पाच वर्षात मी केंद्र सरकारमध्ये असल्याने दिल्लीत होतो. त्यामुळे वाहन परवाना नूतनीकरणाची जबाबदारी एका मित्रावर दिली होती, पण तो विसरला. नूतनीकरणाची मुदत संपून पाच वर्षे होत असल्याने परवाना रद्द होईल म्हणून मी गुरुवारी आरटीओ कार्यालयात जाऊन नूतनीकरण केले.