शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल टॉवर झाले आता पक्ष्यांच्या सवयीचे; परदेशी बोरड्यासह सर्वच स्थिरावतात आरामात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 12:56 IST

मोबाईलच्या रेडिएशनची आता भीती नाही उरली;  सोलापूर शहरातील मोबाईल टॉवरवर चिमण्यांसह सर्वच पक्ष्यांनी थाटली घरटी.

ठळक मुद्देसोलापूरच्या कन्ना चौकातील मोबाईल टॉवरवर शेकडो पक्षी बसल्याचे सकारात्मक चित्रचिमण्यांसह सर्वच पक्ष्यांच्या वस्तुस्थितीवर ‘लोकमत’ने नुकताच धांडोळा घेत काढलेला हा निष्कर्षसन २००७ -२०१५ दरम्यानच्या कालावधीत मोबाईल टॉवरच्या रेडिएशनचा परिणाम म्हणून पक्ष्यांची संख्या घटत गेली

यशवंत सादूल

सोलापूर : मोबाईलच्या रेडिएशनचा परिणाम होऊन मागील काही वर्षे चिमण्यांची संख्या घटली होती़ त्यासोबत वाढत्या काँक्रिटीकरणामुळे त्यांची वस्तीस्थाने नष्ट झाली होती़ पण अलीकडे चिमण्यांसोबत मानवी वस्तीशी सलगी करून राहणाºया सर्वच पक्ष्यांच्या प्रजातींनी मोबाईल टॉवरच्या रेडिएशनची सवय करून घेतल्याने त्यांच्या संख्येत भर पडली आहे. काही पक्ष्यांनी टॉवरवरच घरटी बांधली आहेत. सोलापूरच्या कन्ना चौकातील मोबाईल टॉवरवर शेकडो पक्षी बसल्याचे सकारात्मक चित्र नुकतेच दिसून आले. चिमण्यांसह सर्वच पक्ष्यांच्या वस्तुस्थितीवर ‘लोकमत’ने नुकताच धांडोळा घेत काढलेला हा निष्कर्ष आहे.

सन २००७ -२०१५ दरम्यानच्या कालावधीत मोबाईल टॉवरच्या रेडिएशनचा परिणाम म्हणून पक्ष्यांची संख्या घटत गेली, अशी सर्वसामान्य समजूत होती़ अनेक पक्षीमित्रांनीही असे मत मांडले होते़ पण ही समजूत चुकीची ठरली आहे.

आता मोबाईल टॉवरवरच पक्षी बसत आहेत. अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय असलेला मोबाईल टॉवर व त्यामुळे रोडावणारी पक्ष्यांची संख्या. पण ती संख्या कमी होण्यामागे अनेक कारणांपैकी एक कारण आहे.

अलीकडे अनेक पक्ष्यांनी टॉवरवर घरटे बांधल्याचे दिसून येते. सोलापुरातील अनेक ठिकाणी बोरड्या या स्थलांतरित पक्ष्यांचे थवे चक्क टॉवरवर बसलेले दिसून येतात. डिसेंबर ते एप्रिल या चार-पाच महिन्यांकरिता हे पक्षी टॉवर रेडिएशनच्या संपर्कात येतात, त्यामुळे त्याची तीव्रता कमी भासते, स्थानिक पक्ष्यांनीही रेडिएशनची सवय करून घेतल्याने त्यांची संख्या वाढत आहे. टॉवर उंच असल्याने पक्ष्यांना बसणे सोपे होते म्हणून त्यावर बसतात- सिद्राम पुराणिक, पक्षीमित्र 

मोबाईल टॉवरच्या रेडिएशनचा पक्ष्यांवर परिणाम होतो, असा काढलेला निष्कर्ष अर्धवट अभ्यासावर आधारित होता. सध्या तरी टॉवरचा कोणताच परिणाम पक्ष्यांवर होत नाही, असे दिसून येते. मागील काही वर्षांत चिमण्या कमी झाल्या ते त्यांच्या वस्ती नष्ट झाल्यामुळे. पण सध्या बांधण्यात येणाºया उड्डाण पुलामुळे सर्वच पक्ष्यांना राहण्याची सोय होत आहे. त्यामुळे सर्वच पक्ष्यांची संख्या वाढत आहे़ - भरत छेडावन्यजीव मित्र 

कबुतर, बुलबुल, रॉबिन, सूर्यपक्षी, साळुंकी, कावळा, चिमणी अशा मानवी वस्तीशी सलगी करून राहणाºया पक्ष्यांवर सुरुवातीला रेडिएशनचा परिणाम झाला, असे म्हणतात़ पण त्याला ठोस पुरावा नाही. मोबाईल कंपन्यांनी टॉवरची संख्या वाढविल्याने रेडिएशनची विभागणी केली़ त्यामुळे त्याची तीव्रता कमी झाली असावी. पक्ष्यांच्या अन्न-पाण्याची, राहण्याची सोय होऊ लागल्याने पक्ष्यांची वाढ होऊ लागली़ त्यांना असलेल्या रेडिएशनची सवय झाली आह़े-नागेश राव,पक्षीमित्र 

टॅग्स :SolapurसोलापूरMobileमोबाइलMobiKwikमोबिक्विक