शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
3
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
4
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
5
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
6
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
7
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
8
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
9
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
10
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
11
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
12
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
13
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
14
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
15
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
16
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
17
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
18
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
19
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
20
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

साहित्य म्हणजे जनसामान्यांचा आरसा

By admin | Updated: June 15, 2014 00:53 IST

साने गुरुजी कथामाला : लक्ष्मीकमल गेडाम यांचे प्रतिपादन

सोलापूर : मानवी जीवनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव आणि त्यातून मिळणारा बोध हा लेखणीच्या माध्यमातून मांडला जातो. यातून निर्माण झालेले साहित्य म्हणजे पुढील पिढीतील जनसामान्यांचा आरसा असतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकमल गेडाम यांनी केले. सोलापूर जिल्हा साने गुरूजी कथामाला, सोलापूरच्या दशकपूर्ती व सानेगुरूजी पुण्यतिथीनिमित्त समाजकल्याण केंद्र येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी लक्ष्मीकमल गेडाम या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर साने गुरूजी कथामालेचे अध्यक्ष अवधूत म्हमाणे, कोषाध्यक्ष अशोक म्हमाणे, सूर्या प्रकाशनचे नागेश सुरवसे, बाबुराव मैंदर्गीकर, आरती काळे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अवधूत म्हमाणे लिखित ‘यशाची वाटचाल’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर ४२ साहित्यिकांचा सत्कार समारंभ पार पडला. कार्यक्रमादरम्यान बोलताना लक्ष्मीकमल गेडाम म्हणाल्या की, माणूस पैशाने कधीही श्रीमंत होत नसतो, तो आचार आणि विचाराने मोठा होत असतो. आजच्या युगात पैशासाठी मोठी धावपळ होताना दिसते, मात्र संपत्ती असलेला माणूस अंतर्मनातून कधीही सुखी नसतो. ‘यशाची वाटचाल’ या पुस्तकात लेखकाने माणसाच्या अनेक गोष्टींचा परामर्श घेतला आहे. माणसाच्या अंगी असलेला गर्व हा जास्त काळ चालत नाही तो केव्हा तरी गळून पडतो. त्यासाठी भक्तीचा मार्ग कसा लाभदायक आहे याचे चांगले सौदाहरण पुस्तकात आहे असे सांगत जीवनात शिस्त असली पाहिजे तरच मानवी मनावर चांगले संस्कार घडतात. अन्यथा भटकंतीला लागलेला जीवन प्रवास पुन्हा सद्मार्गाला जाण्यास वेळ लागतो. मनापासून परमेश्वराची प्रार्थना केल्यास शरीर निरोगी राहते, असेही यावेळी लक्ष्मीकमल गेडाम यांनी सांगितले. आभार उज्ज्वला साळुंके यांनी मानले. -----------------------------४२ साहित्यिकांचा सत्कारशहर-जिल्ह्यातील साहित्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या ज्येष्ठांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सत्काराने साहित्यिक भारावून गेले होते.