शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

साहित्य म्हणजे जनसामान्यांचा आरसा

By admin | Updated: June 15, 2014 00:53 IST

साने गुरुजी कथामाला : लक्ष्मीकमल गेडाम यांचे प्रतिपादन

सोलापूर : मानवी जीवनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव आणि त्यातून मिळणारा बोध हा लेखणीच्या माध्यमातून मांडला जातो. यातून निर्माण झालेले साहित्य म्हणजे पुढील पिढीतील जनसामान्यांचा आरसा असतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकमल गेडाम यांनी केले. सोलापूर जिल्हा साने गुरूजी कथामाला, सोलापूरच्या दशकपूर्ती व सानेगुरूजी पुण्यतिथीनिमित्त समाजकल्याण केंद्र येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी लक्ष्मीकमल गेडाम या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर साने गुरूजी कथामालेचे अध्यक्ष अवधूत म्हमाणे, कोषाध्यक्ष अशोक म्हमाणे, सूर्या प्रकाशनचे नागेश सुरवसे, बाबुराव मैंदर्गीकर, आरती काळे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अवधूत म्हमाणे लिखित ‘यशाची वाटचाल’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर ४२ साहित्यिकांचा सत्कार समारंभ पार पडला. कार्यक्रमादरम्यान बोलताना लक्ष्मीकमल गेडाम म्हणाल्या की, माणूस पैशाने कधीही श्रीमंत होत नसतो, तो आचार आणि विचाराने मोठा होत असतो. आजच्या युगात पैशासाठी मोठी धावपळ होताना दिसते, मात्र संपत्ती असलेला माणूस अंतर्मनातून कधीही सुखी नसतो. ‘यशाची वाटचाल’ या पुस्तकात लेखकाने माणसाच्या अनेक गोष्टींचा परामर्श घेतला आहे. माणसाच्या अंगी असलेला गर्व हा जास्त काळ चालत नाही तो केव्हा तरी गळून पडतो. त्यासाठी भक्तीचा मार्ग कसा लाभदायक आहे याचे चांगले सौदाहरण पुस्तकात आहे असे सांगत जीवनात शिस्त असली पाहिजे तरच मानवी मनावर चांगले संस्कार घडतात. अन्यथा भटकंतीला लागलेला जीवन प्रवास पुन्हा सद्मार्गाला जाण्यास वेळ लागतो. मनापासून परमेश्वराची प्रार्थना केल्यास शरीर निरोगी राहते, असेही यावेळी लक्ष्मीकमल गेडाम यांनी सांगितले. आभार उज्ज्वला साळुंके यांनी मानले. -----------------------------४२ साहित्यिकांचा सत्कारशहर-जिल्ह्यातील साहित्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या ज्येष्ठांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सत्काराने साहित्यिक भारावून गेले होते.