शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य म्हणजे जनसामान्यांचा आरसा

By admin | Updated: June 15, 2014 00:53 IST

साने गुरुजी कथामाला : लक्ष्मीकमल गेडाम यांचे प्रतिपादन

सोलापूर : मानवी जीवनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव आणि त्यातून मिळणारा बोध हा लेखणीच्या माध्यमातून मांडला जातो. यातून निर्माण झालेले साहित्य म्हणजे पुढील पिढीतील जनसामान्यांचा आरसा असतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकमल गेडाम यांनी केले. सोलापूर जिल्हा साने गुरूजी कथामाला, सोलापूरच्या दशकपूर्ती व सानेगुरूजी पुण्यतिथीनिमित्त समाजकल्याण केंद्र येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी लक्ष्मीकमल गेडाम या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर साने गुरूजी कथामालेचे अध्यक्ष अवधूत म्हमाणे, कोषाध्यक्ष अशोक म्हमाणे, सूर्या प्रकाशनचे नागेश सुरवसे, बाबुराव मैंदर्गीकर, आरती काळे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अवधूत म्हमाणे लिखित ‘यशाची वाटचाल’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर ४२ साहित्यिकांचा सत्कार समारंभ पार पडला. कार्यक्रमादरम्यान बोलताना लक्ष्मीकमल गेडाम म्हणाल्या की, माणूस पैशाने कधीही श्रीमंत होत नसतो, तो आचार आणि विचाराने मोठा होत असतो. आजच्या युगात पैशासाठी मोठी धावपळ होताना दिसते, मात्र संपत्ती असलेला माणूस अंतर्मनातून कधीही सुखी नसतो. ‘यशाची वाटचाल’ या पुस्तकात लेखकाने माणसाच्या अनेक गोष्टींचा परामर्श घेतला आहे. माणसाच्या अंगी असलेला गर्व हा जास्त काळ चालत नाही तो केव्हा तरी गळून पडतो. त्यासाठी भक्तीचा मार्ग कसा लाभदायक आहे याचे चांगले सौदाहरण पुस्तकात आहे असे सांगत जीवनात शिस्त असली पाहिजे तरच मानवी मनावर चांगले संस्कार घडतात. अन्यथा भटकंतीला लागलेला जीवन प्रवास पुन्हा सद्मार्गाला जाण्यास वेळ लागतो. मनापासून परमेश्वराची प्रार्थना केल्यास शरीर निरोगी राहते, असेही यावेळी लक्ष्मीकमल गेडाम यांनी सांगितले. आभार उज्ज्वला साळुंके यांनी मानले. -----------------------------४२ साहित्यिकांचा सत्कारशहर-जिल्ह्यातील साहित्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या ज्येष्ठांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सत्काराने साहित्यिक भारावून गेले होते.