शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

अरणगावच्या घराघरात काचकामाचे कारागीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 12:35 IST

शेकडो तरुणांना मिळू लागला रोजगार; दररोज पाचशे ते हजार रुपयांपर्यंत मजुरी

ठळक मुद्देबार्शीपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या अरणगावातील जमीनही मुरमाड शेती व दुग्ध व्यवसाय हा गावाचा पारंपरिक व्यवसायकोणाच्याही घरी बांधकाम सुरु असताना तुम्ही गेलात आणि चौकशी केली तर सदरचा कारागीर हा मी अरणगावचा असल्याचे अभिमानाने सांगतो.

शहाजी फुरडे-पाटील

बार्शी : बार्शीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेले अरणगाव हे दीड हजार लोकवस्तीचे गाव. शेती, मोलमजुरी, वीटभट्टीला माती पुरविणे हा गावाचा पारंपरिक व्यवसाय; मात्र गावातील भाऊसाहेब बब्रुवान खराडे यांच्या अ‍ॅल्युमिनियम सेक्शनच्या व्यवसायाने गावातील तरुणांचे जीवनच बदलले. त्यांनी सुरू केलेल्या या व्यवसायामुळे आज गावातील प्रत्येक घरातील युवक या व्यवसायात स्थिरावला असून दररोज ५00 ते एक हजार रुपये रोजगार या तरुणांना मिळू लागला आहे. गावात शक्यतो असे घरच नाही त्यांचा मुलगा या व्यवसायात नाही. 

बार्शीपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या अरणगावातील जमीनही मुरमाड आहे. शेती व दुग्ध व्यवसाय हा गावाचा पारंपरिक व्यवसाय असून, गेल्या १५-२0 वर्षांपूर्वी आपल्या शेतातील वरील भागाची माती वीटभट्टी व्यावसायिकांना विकण्याचे व त्यावरच मोलमजुरी करून घर चालवायचे हेच या गावाचे वैशिष्ट्य होते; मात्र गावातील भाऊसाहेब बब्रुवान खराडे यांनी पुण्यामध्ये अ‍ॅल्युमिनियम सेक्शनच्या व्यवसायात काही दिवस काम केले व नंतर औरंगाबादमध्ये स्वत:चा व्यवसाय सुरु केला. त्यांनी त्या व्यवसायामध्ये गावातील काही मुले कामासाठी नेली. अनुभव मिळाल्यानंतर त्यातील काहीजणांनी गावाकडे व्यवसाय सुरु केला. आज बार्शी शहरात अरणगावातील आण्णा काजळे, गणेश काजळे, लालासाहेब विधाते, सचिन झोडगे, कृष्णा झोडगे, दादा झोडगे, मारुती शिंदे, शांतीलाल कदम या आठ जणांचा स्लाईडिंग विंडो व काच कामाचा व्यवसाय आहे. एकाचे बघून एक गावातील युवक या व्यवसायात कारागीर म्हणून स्थिरावले आहेत. 

कोणाच्याही घरी बांधकाम सुरु असताना तुम्ही गेलात आणि चौकशी केली तर सदरचा कारागीर हा मी अरणगावचा असल्याचे अभिमानाने सांगतो. काच काम व स्लाईडिंग विंडोबरोबरच लाईटची कामे करणारे अनंता खराडे, दामोदर मांडवे, हणमंत चापले, संतोष मिस्कीन तर प्लंबिंगचे काम करणारे सुयोग चापले, गोकुळ चापले व धीरज झोडगे तर दिनेश काजळे व सचिन झोडगे हे पीओपीचे काम करतात. गावामध्ये नोकरीमध्ये असणाºयांचे प्रमाण अत्यल्प असून शेती, काच काम व दुग्ध व्यवसाय हा गावाचा उत्पन्नाचा प्रमुख आधार बनला आहे. 

सर्वच क्षेत्रातील कारागीरगावामध्ये स्लाईडिंग विंडोचे काम करणारे ५0, लाईट फिटिंग करणारे १५ ते २0 व प्लंबिंग, गवंडी काम करणारे २५ कारागीर गावात आहेत. एकंदरीत घराचे पूर्ण काम करण्यासाठी लागणाºया सर्व क्षेत्रातील कारागीर या गावात असल्याचे लखन क्षीरसागर यांनी सांगितले. या कारागिरांना १५ ते ३० रुपये फुटावर मजुरी मिळते. एक कारागीर साधारणपणे ५० ते १०० फूट दररोज काम करतो. या कामातून त्यांना दिवसाला ५०० ते १००० रुपये रोजगार मिळतो. त्यामुळे या गावाची प्रगतीकडे वाटचाल सुरु आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूर