शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
9
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
10
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
11
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
12
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
13
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
14
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
15
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
16
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
17
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
18
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
19
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
20
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 

आंबा महोत्सवाचे उदघाटन, राज्यातील आंबा उत्पादक सोलापूरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 11:45 IST

मंद्रुप येथे निर्यात सुविधा केंद्राचा प्रस्ताव सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची माहिती

ठळक मुद्देदेशात अडीच लाख मेट्रिक टन आंब्याचे उत्पादनमध्यप्रदेशातील भोपाळ व इंदूरमध्येही आंबा महोत्सवाचे आयोजन

सोलापूर: दर्जेदार आंबा खायला मिळावा या संकल्पनेतून आंबा महोत्सवाची कल्पना पुढे आली असून, सोलापुरात डाळिंब निर्यात सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी मंद्रुप येथील जागेचा प्रस्ताव असल्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.

महाराष्टÑ राज्य कृषी पणन मंडळ व सोलापूर बाजार समितीच्या वतीने आयोजित आंबा महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. सोलापूरला नावारुपाला आणायचे आहे, सोलापूरकरांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन सहकार मंत्र्यांनी केले. शेतकºयांच्या मालाला थेट बाजारपेठ मिळावी यासाठी राज्यात १३५ आठवडा बाजार केंद्रे सुरू करण्यात आली असून, हमीभावापेक्षा कमी भावाने तूर खरेदी करणाºयांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

मार्च २०१८ पर्यंत मागणी असलेल्या सर्व शेतकºयांना वीज कनेक्शन देण्याचा निर्णयही शासनाने घेतला असल्याचे सहकार मंत्र्यांनी सांगितले. उसाचे क्षेत्र वाढल्याने पुढील वर्षी आॅक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचा तसेच कच्ची साखर व थेट इथेनॉल तयार करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. मंद्रुप येथे निर्यात सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी पाटबंधारे खात्याच्या साडेतीन एकर जमिनीचा प्रस्ताव असून, जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांनी ती जागा मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवावा, असे सहकार मंत्री देशमुख यांनी आवाहन केले.

शेतकºयांचे उत्पादन वाढण्यासाठी जलयुक्त शिवार योजना प्रभावी ठरली असून, जलयुक्त कामांमुळे जिल्ह्यात पाण्याचा साठा वाढल्याने उजनी धरणाचे पाणी शिल्लक असल्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले. स्थानिकांच्याही आंब्याला स्थान देण्यात यावे, असे सांगत निर्यात केंद्रासाठी मंद्रुपच्या जागेचा प्रस्ताव पाठविण्याची सूचना जिल्हाधिकाºयांना केली. जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी बाजारात अपेक्षेप्रमाणे गुणवत्तेचा आंबा मिळण्याची खात्री नसल्याने आंबा महोत्सवाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महापौर शोभाताई बनशेट्टी यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, राज्य बँकेचे संचालक अविनाश महागावकर, पणनचे दिलीप नाईक, अशोक गार्डी, जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, बाजार समितीचे प्रशासक सुरेश काकडे, सचिव मोहन निंबाळकर, मनपा महिला व बालकल्याण सभापती अश्विनी चव्हाण, नगरसेविका संगीता जाधव, काशिनाथ कदम, गणेश चिवटे, श्रीकांत देशमुख, पं.स. सदस्य हरिदास शिंदे, संभाजी भडकुंबे, वैजिनाथ साबळे, श्रीमंत बंडगर, केदार उंबरजे, प्रभुराज विभुते आदी उपस्थित होते.

 मध्यप्रदेशातही आंबा महोत्सव- देशात अडीच लाख मेट्रिक टन आंब्याचे उत्पादन होते, नैसर्गिकरित्या पिकविलेला आंबा खायला मिळावा यासाठी आंबा महोत्सवाचे आयोजन केले जात असून, थेट आंब्याच्या विक्रीतून शेतकºयांना निर्यातीएवढेच पैसे मिळतात, मध्यप्रदेशातील भोपाळ व इंदूरमध्येही आंबा महोत्सवाचे आयोजन केले जाणार असल्याचे महाराष्टÑ राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरMarketबाजारMangoआंबा