शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
5
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
6
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
7
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
8
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
9
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
10
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
11
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
12
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
13
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
14
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
15
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
16
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
17
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
18
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
19
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
20
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती

आंबा खवैय्यांची झाली ब्रह्मनिराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:14 IST

अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. दोन दिवस असलेले ढगाळ वातावरण आणि बुधवारी (दि. १७) पडलेल्या अवकाळी पावसामुळे ...

अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. दोन दिवस असलेले ढगाळ वातावरण आणि बुधवारी (दि. १७) पडलेल्या अवकाळी पावसामुळे माळशिरस तालुक्यात आंबा उत्पादक मात्र चांगलेच धास्तावले आहेत. वातावरण पूर्ववत झाले नाही तर नुकसानीच्या शक्यतेने त्यांना ग्रासले आहे. रब्बीचे पीकही या वातावरणामुळे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बुधवारी रात्री अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. यात रब्बी पिकांना मोठा फटका बसला. ज्वारी, गहू, हरभरा या महत्त्वाच्या पिकांसोबतच आंबे, द्राक्ष, डाळिंब, आदी फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. माळशिरस तालुक्यात अकलूज, माळीनगर, श्रीपूर, आदी भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे या भागातील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.

कैऱ्या मिसळल्या मातीत

या वर्षी कलमी आंब्यांपेक्षा गावठी आंब्यांना मोहोर मोठ्या प्रमाणात भरला होता. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्यामुळे आंबा फळझाडांची फुले गळली असून आंब्याचा मोहोर गळला आहे. काही ठिकाणी लहान कैऱ्या मातीत मिसळल्या. रब्बी पीक आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. पिके ऐन काढणीत असताना अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे आंबा परत एकदा महाग होईल की काय, अशी चिंता लागली आहे.