शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
3
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
4
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
5
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
6
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
7
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
8
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
9
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
11
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
12
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
13
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
14
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
15
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
16
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
17
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
18
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
19
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
20
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा

आंबा खवैय्यांची झाली ब्रह्मनिराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:14 IST

अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. दोन दिवस असलेले ढगाळ वातावरण आणि बुधवारी (दि. १७) पडलेल्या अवकाळी पावसामुळे ...

अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. दोन दिवस असलेले ढगाळ वातावरण आणि बुधवारी (दि. १७) पडलेल्या अवकाळी पावसामुळे माळशिरस तालुक्यात आंबा उत्पादक मात्र चांगलेच धास्तावले आहेत. वातावरण पूर्ववत झाले नाही तर नुकसानीच्या शक्यतेने त्यांना ग्रासले आहे. रब्बीचे पीकही या वातावरणामुळे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बुधवारी रात्री अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. यात रब्बी पिकांना मोठा फटका बसला. ज्वारी, गहू, हरभरा या महत्त्वाच्या पिकांसोबतच आंबे, द्राक्ष, डाळिंब, आदी फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. माळशिरस तालुक्यात अकलूज, माळीनगर, श्रीपूर, आदी भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे या भागातील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.

कैऱ्या मिसळल्या मातीत

या वर्षी कलमी आंब्यांपेक्षा गावठी आंब्यांना मोहोर मोठ्या प्रमाणात भरला होता. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्यामुळे आंबा फळझाडांची फुले गळली असून आंब्याचा मोहोर गळला आहे. काही ठिकाणी लहान कैऱ्या मातीत मिसळल्या. रब्बी पीक आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. पिके ऐन काढणीत असताना अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे आंबा परत एकदा महाग होईल की काय, अशी चिंता लागली आहे.