शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

आंबा खवैय्यांची झाली ब्रह्मनिराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:14 IST

अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. दोन दिवस असलेले ढगाळ वातावरण आणि बुधवारी (दि. १७) पडलेल्या अवकाळी पावसामुळे ...

अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. दोन दिवस असलेले ढगाळ वातावरण आणि बुधवारी (दि. १७) पडलेल्या अवकाळी पावसामुळे माळशिरस तालुक्यात आंबा उत्पादक मात्र चांगलेच धास्तावले आहेत. वातावरण पूर्ववत झाले नाही तर नुकसानीच्या शक्यतेने त्यांना ग्रासले आहे. रब्बीचे पीकही या वातावरणामुळे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बुधवारी रात्री अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. यात रब्बी पिकांना मोठा फटका बसला. ज्वारी, गहू, हरभरा या महत्त्वाच्या पिकांसोबतच आंबे, द्राक्ष, डाळिंब, आदी फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. माळशिरस तालुक्यात अकलूज, माळीनगर, श्रीपूर, आदी भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे या भागातील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.

कैऱ्या मिसळल्या मातीत

या वर्षी कलमी आंब्यांपेक्षा गावठी आंब्यांना मोहोर मोठ्या प्रमाणात भरला होता. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्यामुळे आंबा फळझाडांची फुले गळली असून आंब्याचा मोहोर गळला आहे. काही ठिकाणी लहान कैऱ्या मातीत मिसळल्या. रब्बी पीक आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. पिके ऐन काढणीत असताना अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे आंबा परत एकदा महाग होईल की काय, अशी चिंता लागली आहे.