शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

महाराष्ट्राची हातभट्टी रातोरात कर्नाटकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:23 IST

अक्कलकोट : अक्कलकोट शहर व तालुक्यात तब्बल ८० ठिकाणी रासायनिक युक्त अवैध हातभट्टी दारू निर्मिती केंद्र सुरू आहेत. या ...

अक्कलकोट : अक्कलकोट शहर व तालुक्यात तब्बल ८० ठिकाणी रासायनिक युक्त अवैध हातभट्टी दारू निर्मिती केंद्र सुरू आहेत. या माध्यमातून तयार झालेली दारू तालुक्यासह शेजारच्या कर्नाटक राज्याला सुद्धा पुरवठा केली जात आहे. सध्या देशी दारू दुकाने बंद असल्याने हातभट्टीला मागणी वाढली आहे.

अक्कलकोट तालुक्यात पूर्वीपासूनच हातभट्टी दारू मोठ्या प्रमाणात तयार केली जाते. मध्यंतरी तत्कालीन डीवायएसपी उपाध्ये यांनी या विरोधात कडक धोरण घेतले होते. यामुळे हा प्रकार कंट्रोलमध्ये आला होता. त्यानंतर पुन्हा जोमाने सुरू झालेले अवैध हातभट्टी दारू आजही तेवढ्याच गतीने सुरु आहे. याला पोलीस खात्याकडून प्रतिबंध होत नसल्याची ओरड तालुक्यातील जनतेतून होत आहे.

दररोज लाखो लिटर हातभट्टी दारूची निर्मिती होते. याचे वितरण शेजारील कर्नाटकातील आळंद तालुका, मादन हिप्परगा, अफझलपूर, इंडी, कब्बण करजगी, आलमेल येथे रात्रीतून पाठविले जाते. याकडे महाराष्ट्र पोलिसांचे लक्ष नसल्यानेच हा प्रकार सर्रास सुरु असल्याची ओरड होत आहे.

सध्या कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी असल्याने हातभट्टी दारूला विशेषतः सीमावर्ती भागासह अक्कलकोट तालुक्यात मोठी मागणी वाढली आहे. दर सुद्धा नेहमीपेक्षा वाढवले आहेत. अक्कलकोट तालुक्यात चप्पळगाव, चुंगी, दहिटणेवाडी, शिरवळ, सांगवी, वागदरी, भुरीकवटे, गोगाव, खैराट, सलगर, चिक्केहळळी, निमगाव, बोरी उमरगे, मिरजगी, मैंदर्गी, दुधनी, सिंनुर, बिंजगेर, बबलाद, बोरोटी, तडवळ, करजगी, मंगरुळ, सुलेरजवळगे, हंजगी, बॅगेहळळी, जेऊर, अक्कलकोट स्टेशन, नागणसुर, नाविदगी, हैद्रा, आदी भागात दारू रातोरात पाठवले जाते.

----

या ठिकाणी आहेत हातभट्टी अड्डे

दक्षिण पोलीस ठाणे हद्दीतील नागूर तांडा-२०, भोसगे तांडा- ७, कलकर्जाळ -७, सुलेजवळगे -३, मुंढेवाडी -१, हिळळी -१, तडवळ -१, खानापूर -१, अक्कलकोट स्टेशन -२ अशा ३६ ठिकाणी तर

उत्तर पोलीस ठाणे हद्दीत अक्कलकोट शिवाजी नगर तांडा -३० ठिकाणी, बॅगेहळळी रोड -३, मार्केट यार्ड समोर -४, किणीमोड तांडा -७, अशा ४४ ठिकाणी अशा एकंदरीत ८० विविध ठिकाणी हातभट्टी दारू गाळली जात आहे. पोलीस खात्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी होत आहे. .

----

पोलिसांवर झाला होता हल्ला

मागील वर्षी कोरोना काळात भर उन्हाळ्यात दक्षिण पोलीस ठाण्याचे हद्दीतील पोलीस नागुरे तांडा येथे कारवाईसाठी गेले होते. त्यावेळी पोलिसांना दारू निर्मिती तस्करांकडून रात्रीच्या वेळी हल्ला केला होता. कसेबसे पोलीस बालंबाल बचावले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मोठा पोलीस फौजफाटा घेऊन जाऊन गुन्हा दाखल झालेल्या लोकांना अटक करण्यासाठी पळापळ केले. तेथील घटना संपूर्ण राज्यभर गाजली. त्यानंतर त्या ठिकाणचे दारू निर्मिती पूर्णपणे बंद होणे आवश्यक असताना आजही मोठ्या प्रमाणात दारु गाळण होत असते. हे पोलिसांचे अपयश म्हणावे काय? असाही सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

----

अड्डे उद्धवस्त करु: गायकवाड

उत्तर पोलीस ठाण्याचा पदभार मंगळवारी पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी स्वीकारला आहे. निवडणुकीच्या कामामुळे कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी होती. आता नियोजन करुन तालुक्यातील हातभट्टी अड्डे उद्धवस्त करण्यासाठी मोहीम आखली जाईल. शिवाय कोरोनाचा काळ असल्याने हातभट्टी तयार करताना एकत्रित येणाऱ्या लोकांची संख्याही अधिक असते. ती होऊ नये यासाठी खबदारी घेण्याची ग्वाही उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांनी दिली.