शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

लोका सांगे ब्रह्मज्ञान...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 11:04 IST

आज समाजात शहाणपण शिकवणाºयांचा दुष्काळ नाही तर शहाणपणाने वागणाºयांचा दुष्काळ आहे. शहाणपणा करणारे अर्धवट हळकुंडाने पिवळे झालेले असतात. कोणतीही ...

ठळक मुद्देलोकांना शहाणपणा यावा, असं खरंच वाटंत असेल तर स्वत: तसं वागावंच लागेलआज समाजात शहाणपण शिकवणाºयांचा दुष्काळ नाही तर शहाणपणाने वागणाºयांचा दुष्काळ आहे

आज समाजात शहाणपण शिकवणाºयांचा दुष्काळ नाही तर शहाणपणाने वागणाºयांचा दुष्काळ आहे. शहाणपणा करणारे अर्धवट हळकुंडाने पिवळे झालेले असतात. कोणतीही नवीन गोष्ट आम्हाला माहिती झाली की, आम्ही ती लगेच लोकांना सांगून मोकळे होतो. लोकांनी कसे वागावे, हे आपण अचूक सांगतो; पण तोच शहाणपणा आपल्यावर, वेळ आल्यानंतर आपण करतो का? हाच खरा प्रश्न आहे. सारं जग आम्हाला कळलं, असं उगीच वाटत राहतं. तसं आपण, मला सगळं माहिती आहे, असं बºयाचदा बोलतोही. खरं आहे ज्ञान मुकं असतं तर अज्ञान खूप बोलकं असतं. मला काही कळत नाही, हे एकदा कळलं की, काहीतरी कळायला सुरुवात होते, असं म्हणतात. हे समजून घ्यायचं आज गरज आहे.

अज्ञ माणसं तज्ज्ञापणानं शिकवू लागल्यामुळं सुज्ञपणात काही परिवर्तन होताना दिसत नाही. शिक्षणक्षेत्रात हे नेहमी घडतं. शाळेतील पोरांपुढे उभं न राहणारी अनेक तज्ज्ञ मंडळी अभ्यासक्रम व शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठीचे प्रशिक्षण देताना दिसतात. शेतीच्या वास्तवाचे ज्ञान अनुभव नसणारी माणसं पीकपाण्याच्या नियोजनाचा सल्ला देताना दिसतात. खोटं बोलण्याचं अलिखित अभिवचन देत सर्वच पक्ष आपले जाहिरनामे केवळ छापतात. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतानाही लोका सांगे ब्रह्मज्ञाऩ़़ अशीच गत होते त्यांची. उक्ती आणि कृतीत आज प्रत्येकात फार मोठा फरक दिसतो. व्यायाम, योगा,योगासने, आरोग्य, मन:शांती, चालणे, फिरणे आदींबाबत तर कोण ? काय ? सांगेल याचा नेम नाही; पण सांंगणाºयांनी खरंच आपण तसं वागतो, करतो का? याचा स्वत:शी प्रामाणिक राहून, पडताळून पाहिलं तर लेख शीर्षक रास्तच वाटेल.

लोकांना शहाणपणा यावा, असं खरंच वाटंत असेल तर स्वत: तसं वागावंच लागेल. मग तुम्ही काही न सांगताही लोक सुधारतील, कारण विचाराला कर्तृत्वाची जोड असल्याशिवाय शब्दाला वजन, उंची येत नाही. लोकांना काही सांगण्याची घाई करु नये. ऊठसूट सल्ले देऊ नयेत़ विचारल्याविना कोणा काही सांगू नये. सांगण्यापूर्वी त्यांच्या साºया परिस्थितीचा सारासार विचार करून माझ्यावर ती वेळ आली तर मी त्यावेळी काय करु शकतो, याचा विचार करावा. आपलं आचरण शुद्ध असलंच पाहिजे, विचार सुंदर असायला हवेत, जगणं निर्मळ असायलाच हवं, तरच लोकांना काही बोध करावा, अन्यथा संयम राखावा.

जाणत्यांनी जरुर मार्गदर्शन करायलाच हवं, कारण तो त्यांचा अधिकार असतो. पण जाणती माणसं या स्वयंसिद्ध ब्रह्मज्ञानी लोकांच्या गर्दीपासून कायम दूर राहतात. यामुळे ज्ञानापेक्षा संभ्रम जास्त निर्माण होतो. त्यामुळे दिशाहीन समाज निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. आजही समाजामध्ये अनेक गोष्टी आम्हाला अट्टाहासाने कराव्या लागतील. अशांतता, अस्वस्थता मिटविण्यासाठी आचरणहीन शब्दांचे बुडबुडे हवेत सोडून देणं बंद करावं लागेल. माणसाने माणसाशी माणसासारखे वागणं शिकल्याशिवाय आम्ही स्वस्थ व शांत जीवन जगूच शकत नाही. आजही आम्ही बुवाबाजी, जादूटोण्यावर श्रद्धा ठेवत राहतो. अगदी नरबळीपर्यंत आमची मजल जात आहे. याचं समूळ उच्चाटन व्हायला हवं. ते जाणिवपूर्वक घडायला हवं.. उघड्यावरचे, बाहेरचे पदार्थ खाऊ नयेत हे माहीत असतानाही आम्ही खात राहतो.

मुलांनी जसं वागायला हवं वाटतं तसं अगोदर आपणास वागावं लागेल. कारण मुलं आपल्या शब्दापेक्षा कृतीतून अधिक शिकत असतात. म्हणून केवळ तोंडी ब्रह्मज्ञानाचे डोस पाजण्यापेक्षा कडव्या तत्त्वज्ञानाचे आचरण आपण स्वत: करावे, त्याशिवाय मुलांमध्ये अपेक्षित बदल घडताना दिसून येणार नाहीत. वैयक्तिक, सामाजिक, सर्वच पातळीवर माणुसकी हीच जात व मानवता हाच खरा. या न्यायानं वागलं तर काहीतरी सात्विक वर्तनाबद्दल घडू शकेल.

प्रत्येकाने आपला परीघ सुंदर करावा. जीवन कसं असावं याचा वस्तुपाठ बनवावा. तरच आपण चार लोकांना दोन गोष्टी सांगण्याचा नैतिक अधिकार प्राप्त करु शकू, अन्यथा सारं पालथ्या घागरीवर पाणी. तेव्हा लोकांना ब्रह्मज्ञान शिकविणे, सांगण्यापूर्वी विचार करा. नाही तर लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडा पाषाण, अशी गत आपली होईल.तेव्हा विचार करु या..- रवींद्र देशमुख, (लेखक शिक्षक आहेत)

टॅग्स :Solapurसोलापूरchildren's dayबालदिन