शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

वडिलांनीच दिली आयुष्याला यशस्वी कलाटणी ! : मनोज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 13:21 IST

गुरूपोर्णिमा विशेष...;

ठळक मुद्दे‘माझे प्रथम गुरू म्हणून वडिलांचा नेहमीच अभिमान वाटत राहिला आहे - मनोज पाटीलअगदी सैनिकी स्कूलमध्ये शिकण्यापासून पुढे इंजिनिअरिंग आणि अध्यापन क्षेत्रात शिकताना त्यांनी पदोपदी दिशा दिली - मनोज पाटीलअगदी आता ज्या क्षेत्रात मी आहे त्या पोलीस प्रशासन क्षेत्रात जाण्याचा सल्लाही त्यांचाच - मनोज पाटील

विलास जळकोटकर

प्रत्येकाच्या आयुष्यात यशस्वी वाटचाल करताना गुरूचा वरदहस्त.. त्यांची शिकवण कायम सोबत असते. अगदी असंच काहीसं प्रत्येकाच्या बाबतीत थोड्याफार फरकानं असतं. माझ्या आयुष्यातही वडील अन् त्यांच्या पश्चात वडीलबंधू महेश हे कायम गुरूस्थानी राहिले आहेत. त्यांनीच आपल्या आयुष्याला कलाटणी दिली. ‘अन्याय सहन करू नका, अगदी शांत मार्गाने आपल्या भूमिकेवर ठाम राहा’ ही शिकवण कायम आपल्यासोबत असल्याची प्रांजळ भावना सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांंनी गुरूपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. 

गुरूपौर्णिमेच्या औचित्याने ‘लोकमत’शी मुक्तसंवाद साधताना ते म्हणाले, दैनंदिन जीवनामध्ये सोशल अंगाने पाहण्याचा जो दृष्टिकोन असायला हवा तो माझे वडील आणि २००७ ला ते गेल्यानंतर वडील बंधू महेश यांच्याकडूनच मिळाला. वडील कृषी खात्यामध्ये सेवेत होते. मी आयुष्याच्या वाटेवर जे प्रगतीचे टप्पे पार केले ते वडिलांनी जे संस्कार, मार्गदर्शन केले त्यामुळेच शक्य झाले, असं मी मानतो. ते कृषी खात्यामध्ये कार्यरत होते. त्यांनी नेहमीच आम्हाला सांगितलेलं आजही आठवतं.. ‘वरिष्ठांपेक्षा तुम्ही आपल्या कनिष्ठ सहकाºयांच्या अडचणी कशा सोडविता, त्यांच्याशी रिलेशनशिप कशी ठेवता, जे खºया अर्थाने तुमचं काम पाहत असतात’ हे तत्त्व आजतागायत आपण जपलेलं आहे. 

‘माझे प्रथम गुरू म्हणून वडिलांचा नेहमीच अभिमान वाटत राहिला आहे. अगदी सैनिकी स्कूलमध्ये शिकण्यापासून पुढे इंजिनिअरिंग आणि अध्यापन क्षेत्रात शिकताना त्यांनी पदोपदी दिशा दिली. अगदी आता ज्या क्षेत्रात मी आहे त्या पोलीस प्रशासन क्षेत्रात जाण्याचा सल्लाही त्यांचाच. त्यांच्यामुळेच जीवनाकडे  विशाल दृष्टिकोन ठेवून कसं राहिलं पाहिजे, हे त्यांच्याकडूनच शिकलो. गुरूपौर्णिमेच्या निमित्तानं त्यांना त्रिवार वंदन’ अशा शब्दांत त्यांनी गुरूबद्दलचा आदर व्यक्त केला.

अन्याय सहन करू नकाआदर्श गुरू म्हणून आपल्या वडिलांबद्दलची आठवण सांगताना पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले, ‘एकदा मैदानावर खेळायला गेलो होतो. सोबत भाऊही होता. तेथे काही मुलं आली. ती दादागिरी करून खेळू लागली. आम्ही त्यांच्याशी वितंडवाद नको म्हणून घरी निघून आलो. वडिलांना सारा प्रकार सांगितला. वडील म्हणाले ‘हे बरोबर नाही केलं तुम्ही, अन्याय सहन नाही करायचा. तुम्ही जावा तेथे भांडू नका, त्यांना जाणीव करून द्या’ आम्ही गेलो अन् त्या मुलांना सुनावले तेव्हा ती निघून गेली’ ही बाब तशी छोटीशी होती; पण त्यामागचा विचार फार मोठा होता. हे कायम मनावर कोरलं गेल्याचं ते म्हणाले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसGuru Purnimaगुरु पौर्णिमा