शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

कत्तलीसाठी जाणाऱ्या २०५ जनावरांना जीवदान

By संताजी शिंदे | Updated: November 2, 2023 12:31 IST

संबंधितांवर वेळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संताजी शिंदे, सोलापूर : कत्तलीसाठी घेऊन जाण्यात येणाऱ्या २०५ जनावरांची गोरक्षकांनी सुटका केली असून, संबंधितांवर वेळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कत्तलीसाठी जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती सोलापुरातील गोरक्षकांना मिळाली होती. माहितीवरून गोरक्षकांनी वेळापूर येथे माहिती घेतली असता, बोरगाव रोडमार्गे गोवंशांची मोठ्या प्रमाणात तस्करी होते, अशी माहिती मिळाली. त्यानुसार अकलूज विभाग डीवायएसपी डॉ. सई भोरे-पाटील यांना माहिती दिली. सदर ठिकाणी छापा टाकण्यासाठी पोलिसांची मदत मागितली. रात्री एकच्या सुमारास वेळापूर येथे पोलिसांच्या मदतीने सदर ठिकाणी छापा टाकला. तेव्हा तीन चारचाकी वाहने उभी होती. आतमध्ये पाहणी केली असता, जर्सी खोंड, रेडे व अन्य जनावरे निर्दयीपणे कोंबून भरलेली निदर्शनास आली.

त्यामध्ये काही गोवंश मृतावस्थेत आढळले. त्याच ठिकाणी एका पत्रा शेडमध्ये तब्बल ७० ते ८० जर्सी खोंड, वासरे डांबून ठेवलेले निदर्शनास आले, असे एकूण तब्बल २०५ गोवंश कत्तलीसाठी वाहतूक होणार होती. घटनास्थळावर एक टेम्पो (एमएच १३ सीयू ३५११), ट्रक (एमएच ४५ एएफ ५५८६) व एक नंबर नसलेले पिकअप वाहन आढळून आले. तिन्ही वाहने वेळापूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहेत. जागेचा मालक व जनावराचे मालक यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदाअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कारवाई यशस्वी करण्यासाठी बजरंग दल सोलापूर जिल्हा गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी, बजरंग दल विभाग संयोजक सिद्राम चरकुपल्ली, पंढरपूर विभाग संयोजक आकाश धोत्रे आदी गोरक्षकांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Solapurसोलापूर