शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

संथ गतीने सुरू असलेल्या संत विद्यापीठाचे काम जलद करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:21 IST

पंढरपूर : भारताला मोठा आध्यात्मिक वारसा आहे. तो वारसा पुढे जतन राहावा व पुढे चालवा यासाठी संत विद्यापीठ महत्त्वाचे ...

पंढरपूर : भारताला मोठा आध्यात्मिक वारसा आहे. तो वारसा पुढे जतन राहावा व पुढे चालवा यासाठी संत विद्यापीठ महत्त्वाचे आहे. परंतु पंढरपुरातील संत विद्यापीठाचे काम संथ गतीने सुरू आहे ते जलद करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. जुहू मुंबई येथे आयोजित वारकरी साहित्य परिषदेच्या नवव्या संत साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पद्मविभूषण डॉक्टर डी. वाय. पाटील, साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, ह.भ.प. माधव महाराज शिवणीकर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे यांच्यासह वारकरी उपस्थित होते. २१ आणि २२ डिसेंबर असे दोन दिवस चालणाऱ्या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद पंढरपूरचे जिल्हा सत्र न्यायाधीश ह.भ.प. चकोर महाराज बाविस्कर यांनी भूषविले.

दिंडी काढून संमेलनाची सुरुवात

राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्राथमिक स्वरूपात आलेल्या वारकरी दिंडीकरी, फडकरी मंडळाच्या प्रतिनिधींनी जुहू चौपाटीवर टाळमृदंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष केला. संत साहित्य संमेलनाची सुरुवात वारकरी परंपरेने दिंडी काढून झाली.

असा होता पहिला दिवस

स्वागताध्यक्ष ह.भ.प. चकोर महाराज बाविस्कर यांनी ह.भ.प अमृत महाराज जोशी यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. दुपारच्या पहिल्या सत्रामध्ये संप्रदायाच्या परंपरेची जोपासना या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी संत साहित्याचे अभ्यासक ह.भ.प. डॉ. सदानंद मोरे होते. यावेळी उपस्थित महाराज मंडळींनी या चर्चासत्रात सहभाग घेतला. प्रदूषण या विषयावर ही चर्चासत्र झाले. या चर्चासत्राचे अध्यक्ष ह. भ. प. माणिक गुट्टे तर वक्ते म्हणून ह.भ.प. भाटघरे, ह.भ.प सोनटक्के यांनी सहभाग घेतला. सायंकाळी ६ ते ७ या वेळामध्ये सामुदायिक हरिपाठ घेण्यात आला. संध्याकाळी अभंग वाणी आणि कीर्तनाने आजच्या दिवसाची सांगता करण्यात आली.