शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

संथ गतीने सुरू असलेल्या संत विद्यापीठाचे काम जलद करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:21 IST

पंढरपूर : भारताला मोठा आध्यात्मिक वारसा आहे. तो वारसा पुढे जतन राहावा व पुढे चालवा यासाठी संत विद्यापीठ महत्त्वाचे ...

पंढरपूर : भारताला मोठा आध्यात्मिक वारसा आहे. तो वारसा पुढे जतन राहावा व पुढे चालवा यासाठी संत विद्यापीठ महत्त्वाचे आहे. परंतु पंढरपुरातील संत विद्यापीठाचे काम संथ गतीने सुरू आहे ते जलद करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. जुहू मुंबई येथे आयोजित वारकरी साहित्य परिषदेच्या नवव्या संत साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पद्मविभूषण डॉक्टर डी. वाय. पाटील, साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, ह.भ.प. माधव महाराज शिवणीकर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे यांच्यासह वारकरी उपस्थित होते. २१ आणि २२ डिसेंबर असे दोन दिवस चालणाऱ्या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद पंढरपूरचे जिल्हा सत्र न्यायाधीश ह.भ.प. चकोर महाराज बाविस्कर यांनी भूषविले.

दिंडी काढून संमेलनाची सुरुवात

राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्राथमिक स्वरूपात आलेल्या वारकरी दिंडीकरी, फडकरी मंडळाच्या प्रतिनिधींनी जुहू चौपाटीवर टाळमृदंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष केला. संत साहित्य संमेलनाची सुरुवात वारकरी परंपरेने दिंडी काढून झाली.

असा होता पहिला दिवस

स्वागताध्यक्ष ह.भ.प. चकोर महाराज बाविस्कर यांनी ह.भ.प अमृत महाराज जोशी यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. दुपारच्या पहिल्या सत्रामध्ये संप्रदायाच्या परंपरेची जोपासना या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी संत साहित्याचे अभ्यासक ह.भ.प. डॉ. सदानंद मोरे होते. यावेळी उपस्थित महाराज मंडळींनी या चर्चासत्रात सहभाग घेतला. प्रदूषण या विषयावर ही चर्चासत्र झाले. या चर्चासत्राचे अध्यक्ष ह. भ. प. माणिक गुट्टे तर वक्ते म्हणून ह.भ.प. भाटघरे, ह.भ.प सोनटक्के यांनी सहभाग घेतला. सायंकाळी ६ ते ७ या वेळामध्ये सामुदायिक हरिपाठ घेण्यात आला. संध्याकाळी अभंग वाणी आणि कीर्तनाने आजच्या दिवसाची सांगता करण्यात आली.