शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

परदेशातील संधी डावलून माऊलींच्या पालखी सोहळ्यातच रांगोळी काढून केली  जात आहे सेवा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 23:52 IST

- अमोल अवचिते  बेलापूर : माऊलींच्या सानिध्यात राहून मनाला शांती मिळते. रांगोळी पाहिली की मन प्रसन्न होते. त्यातून जर ...

- अमोल अवचिते 

बेलापूर : माऊलींच्या सानिध्यात राहून मनाला शांती मिळते. रांगोळी पाहिली की मन प्रसन्न होते. त्यातून जर एखादा सामाजिक संदेश दिला तर तो संदेश मनाला पटतो. आणि त्यातुन बदल घडू  शकतो. म्हणून  संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात आफ्रिकेतील मादागास्कर येथील आलेली संधी सोडून रांगोळी काढण्याची सेवा करत आहे. असे सांगत आहेत मंचरच्या असलेल्या  प्रोफेशनल आर्टिस्ट जयश्री नितीन भागवत जुन्नरकर यांनी माऊलींप्रती भावना व्यक्त केली. 

  पालखी सोहळ्या दरम्यान आफ्रिकेत एका कार्यक्रमासाठी रंगोळी काढण्याची संधी मिळाली होती. मात्र ती संधी सोडून त्या माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या आहेत. त्यांचे वडील निवृत्ती महाराजांच्या पालखी सोहळ्यात अनेक वर्षांपासून रांगोळी काढत आहेत. कोणतेही रांगोळी काढण्याचे प्रशिक्षण घेतले नसून,  वडिलांकडून त्यांना ही कला प्राप्त झाली आहे. रांगोळी कलेला माऊलींचा आशिर्वाद असल्याचे त्यांना वाटते. 

   सेवा म्हणून त्या रांगोळी काढतात. पालखी सोहळ्यात माऊलींच्या रथा पुढे विविध विषयांवर रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याची सेवा जयश्री करतात. यावर्षी 'स्वच्छ  वारी स्वथ वारी', ' निर्मल वारी',  'मुलगी वाचवा' असे विविध विषयांवर संदेश दिला जात आहे.    एकूण पालखी मार्गवर ८० पोथी रांगोळी तर ४८५ किलो रंगांचा वापर केला जातो. 

    वारी समानता शिकवते वारी हा विठ्ठलाचा एक महिमा आहे. जात, धर्म, पंत, स्त्री पुरुष भेदभाव पाळला जात नाही. वारी म्हणजे ऊर्जा आहे. जी सांगितीने वाढते. भजन, टाळ मृदंगाच्या गजराने मनुष्य एकरूप होतो. तरुणांनी एकदा तरी वारी अनुभवावी. वारी जीवनाचा योग्य मार्ग दाखवते. समृद्ध आणि परिपूर्ण होयचे असेल तर वारीत यावे असे आवाहन जयश्री यांनी केले आहे.