शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

जाणून घ्या; सोलापूर शहरातील दोन उड्डाणपुलांसाठी कोणत्या गोष्टी ठरताहेत अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 12:48 IST

दोन उड्डाणपुलांची भूसंपादन प्रक्रिया सुरू करा अन् दहा दिवसांत प्रगती अहवाल देण्याचे महापालिका आयुक्तांनी दिले आदेश

ठळक मुद्देशहरातील महत्त्वाच्या दोन उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची चिन्हेभूसंपादन अधिकाºयांनी या कामाला गती द्यावी. मनपा अधिकाºयांनी या कामाला सहकार्य करावे, असे आदेश

सोलापूर : सोलापूर-मंगळवेढा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक (भैय्या चौक) रेल्वे उड्डाण पूल करण्यात येणार आहे. एनजी मिल आणि जाम मिलची काही जागा बाधित होत आहे. वस्त्रोद्योग महामंडळाने एनजी मिलच्या जागेच्या बदल्यात टीडीआर घेण्याची तयारी दाखवली. मात्र जाम मिलच्या मालकांनी टीडीआरऐवजी पैशाच्या स्वरुपातही नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. मनपाकडे पैसे नसल्याने नुकसानभरपाई देण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल लटकण्याची चिन्हे आहेत.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने २०१६ मध्ये जुना पुणे नाका ते पत्रकार भवन आणि जुना बोरामणी नाका ते मोरारका बंगला यादरम्यान दोन उड्डाणपूल मंजूर केले. भूसंपादनासाठी राज्य सरकारने महापालिकेला २२९ कोटी रुपये मंजूर केले होते. प्रत्यक्षात मागील वर्षी ४१ कोटी रुपये मिळाले. एक इंचही भूसंपादन झाले नाही. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या पुलाचे काम करु नका, अशी मागणी काही नेत्यांनी केली. जानेवारी महिन्यात तत्कालीन पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या विषयाचा प्राधान्यक्रम शेवटी ठेवण्यात यावा, असे निर्देश प्रशासनाला दिले होते. याबद्दल शहरातील अनेक लोकांनी नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाºयांनी शहरातून जाणारे रस्ते, उड्डाणपूल, रेल्वे उड्डाणपुलाचे प्रश्न मार्गी लावावेत यासाठी आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासोबत बैठक घेतली.

या बैठकीत बाधित लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घर देणे, भूसंपादन प्रक्रियेला गती देणे आणि हेरीटेज इमारतींबाबत निर्णय घेणे या विषयांवर चर्चा झाली. उड्डाणपुलाच्या कामात मूळ मालकासह जागेच्या भाडेकरुंनीही मोबदला देण्याची मागणी केली आहे. या भाडेकरुंना आवास योजनेतून घर देण्याचा सूरही पुढे आला आहे. परंतु, भूसंपादन प्रक्रियेतील अडथळे दूर करण्यात यावे. दहा दिवसांत कामाच्या प्रगतीचा अहवाल सादर करा, असे आदेश पालिका आयुक्तांनी दिले.

कामाला गती देण्याचे केल्या सुचनासहा महिन्यांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी बाजूला ठेवायला सांगितलेल्या शहरातील महत्त्वाच्या दोन उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची चिन्हे आहेत. भूसंपादन अधिकाºयांनी या कामाला गती द्यावी. मनपा अधिकाºयांनी या कामाला सहकार्य करावे, असे आदेश महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरSmart Cityस्मार्ट सिटीSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका