शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

आघाडीची सत्ता येणार

By admin | Updated: July 12, 2014 00:08 IST

काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रच राहणार : जितेंद्र आव्हाड यांचा विश्वास

 

सोलापूर: येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदिलाने लढतील, आजवरची राज्यातील भरीव विकासकामे पाहता पुन्हा आघाडीची सत्ता स्थापन होईल, असा विश्वास राज्याचे वैद्यकीय व फलोत्पादन मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. वैद्यकीय महाविद्यालयातील कार्यक्रमानिमित्त शुक्रवारी सोलापूरच्या दौऱ्यावर आले असता, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या वार्तालापप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश गादेकर, दिनेश शिंदे, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, नगरसेवक दीपक राजगे, महेश निकंबे आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीत मोदींची लाट होती, आता ती राहिली नाही. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत ही लाट राहणार नाही. कोणतीही लाट जास्त काळ राहत नाही, बदल हा निसर्गाचा नियम आहे. मुंबईतील विविध उड्डाण पुले, मेट्रो रेल्वे आदी माणसांच्या जीवनमानावर परिणाम करणारी अनेक विकासात्मक कामे झाली आहेत. राज्यात, अन्य जिल्ह्यांतही अनेक विकासात्मक कामे झाल्याने जनता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाजूनेच राहिल. वैद्यकीय क्षेत्रातील परीक्षांसंदर्भात बोलताना आव्हाड यांनी सांगितले की, निकालानंतर फेरतपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या पेपरचे निकाल अवघ्या १५ दिवसांत दिले पाहिजेत, असा आदेश आपण विद्यापीठाला दिला आहे. फलोत्पादनसंदर्भात बोलताना आव्हाड म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. राज्यातील द्राक्ष, केळी, डाळिंब, चिकू आदी फळांचे उत्पादन देशात नंबर १ वर आहे. या उत्पादनांची म्हणावी तशी मार्केटिंग करता आली नाही, अशी खंत व्यक्त करीत आव्हाड यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी फळ उत्पादनाला वाव देणार असल्याचे सांगितले. -------------------आव्हाड म्हणाले...राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वांना विश्वासात घेऊन चालणारा पक्ष आहे. पक्षाचा मुख्यमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री निवडून आलेल्या लोकांकडूनच त्यांची निवड केली जाते. राष्ट्रवादी काँग्रेस हा सामूहिक नेतृत्व असलेला पक्ष आहे.पक्षांतर करून काही नेते इकडे तिकडे जाण्याची तयारी करीत आहेत असे विचारले असता आव्हाड म्हणाले की, ज्यांना संधी आहे असे वाटते ते तिथे जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्यातरी कोणाला घेण्यासाठी जागा नाही. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येतील खऱ्या आरोपींचा शोध सुरू आहे. तपास जरी संथ गतीने वाटत असला तरी यातील खरे आरोपी पकडले जातील. त्यामुळे सत्य बाहेर येणार आहे.