शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
4
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
5
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
6
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
7
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
9
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
10
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
11
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
13
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
14
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
15
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
16
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
17
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
18
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
19
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
20
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीची सत्ता येणार

By admin | Updated: July 12, 2014 00:08 IST

काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रच राहणार : जितेंद्र आव्हाड यांचा विश्वास

 

सोलापूर: येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदिलाने लढतील, आजवरची राज्यातील भरीव विकासकामे पाहता पुन्हा आघाडीची सत्ता स्थापन होईल, असा विश्वास राज्याचे वैद्यकीय व फलोत्पादन मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. वैद्यकीय महाविद्यालयातील कार्यक्रमानिमित्त शुक्रवारी सोलापूरच्या दौऱ्यावर आले असता, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या वार्तालापप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश गादेकर, दिनेश शिंदे, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, नगरसेवक दीपक राजगे, महेश निकंबे आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीत मोदींची लाट होती, आता ती राहिली नाही. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत ही लाट राहणार नाही. कोणतीही लाट जास्त काळ राहत नाही, बदल हा निसर्गाचा नियम आहे. मुंबईतील विविध उड्डाण पुले, मेट्रो रेल्वे आदी माणसांच्या जीवनमानावर परिणाम करणारी अनेक विकासात्मक कामे झाली आहेत. राज्यात, अन्य जिल्ह्यांतही अनेक विकासात्मक कामे झाल्याने जनता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाजूनेच राहिल. वैद्यकीय क्षेत्रातील परीक्षांसंदर्भात बोलताना आव्हाड यांनी सांगितले की, निकालानंतर फेरतपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या पेपरचे निकाल अवघ्या १५ दिवसांत दिले पाहिजेत, असा आदेश आपण विद्यापीठाला दिला आहे. फलोत्पादनसंदर्भात बोलताना आव्हाड म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. राज्यातील द्राक्ष, केळी, डाळिंब, चिकू आदी फळांचे उत्पादन देशात नंबर १ वर आहे. या उत्पादनांची म्हणावी तशी मार्केटिंग करता आली नाही, अशी खंत व्यक्त करीत आव्हाड यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी फळ उत्पादनाला वाव देणार असल्याचे सांगितले. -------------------आव्हाड म्हणाले...राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वांना विश्वासात घेऊन चालणारा पक्ष आहे. पक्षाचा मुख्यमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री निवडून आलेल्या लोकांकडूनच त्यांची निवड केली जाते. राष्ट्रवादी काँग्रेस हा सामूहिक नेतृत्व असलेला पक्ष आहे.पक्षांतर करून काही नेते इकडे तिकडे जाण्याची तयारी करीत आहेत असे विचारले असता आव्हाड म्हणाले की, ज्यांना संधी आहे असे वाटते ते तिथे जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्यातरी कोणाला घेण्यासाठी जागा नाही. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येतील खऱ्या आरोपींचा शोध सुरू आहे. तपास जरी संथ गतीने वाटत असला तरी यातील खरे आरोपी पकडले जातील. त्यामुळे सत्य बाहेर येणार आहे.