शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

आघाडीची सत्ता येणार

By admin | Updated: July 12, 2014 00:08 IST

काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रच राहणार : जितेंद्र आव्हाड यांचा विश्वास

 

सोलापूर: येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदिलाने लढतील, आजवरची राज्यातील भरीव विकासकामे पाहता पुन्हा आघाडीची सत्ता स्थापन होईल, असा विश्वास राज्याचे वैद्यकीय व फलोत्पादन मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. वैद्यकीय महाविद्यालयातील कार्यक्रमानिमित्त शुक्रवारी सोलापूरच्या दौऱ्यावर आले असता, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या वार्तालापप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश गादेकर, दिनेश शिंदे, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, नगरसेवक दीपक राजगे, महेश निकंबे आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीत मोदींची लाट होती, आता ती राहिली नाही. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत ही लाट राहणार नाही. कोणतीही लाट जास्त काळ राहत नाही, बदल हा निसर्गाचा नियम आहे. मुंबईतील विविध उड्डाण पुले, मेट्रो रेल्वे आदी माणसांच्या जीवनमानावर परिणाम करणारी अनेक विकासात्मक कामे झाली आहेत. राज्यात, अन्य जिल्ह्यांतही अनेक विकासात्मक कामे झाल्याने जनता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाजूनेच राहिल. वैद्यकीय क्षेत्रातील परीक्षांसंदर्भात बोलताना आव्हाड यांनी सांगितले की, निकालानंतर फेरतपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या पेपरचे निकाल अवघ्या १५ दिवसांत दिले पाहिजेत, असा आदेश आपण विद्यापीठाला दिला आहे. फलोत्पादनसंदर्भात बोलताना आव्हाड म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. राज्यातील द्राक्ष, केळी, डाळिंब, चिकू आदी फळांचे उत्पादन देशात नंबर १ वर आहे. या उत्पादनांची म्हणावी तशी मार्केटिंग करता आली नाही, अशी खंत व्यक्त करीत आव्हाड यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी फळ उत्पादनाला वाव देणार असल्याचे सांगितले. -------------------आव्हाड म्हणाले...राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वांना विश्वासात घेऊन चालणारा पक्ष आहे. पक्षाचा मुख्यमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री निवडून आलेल्या लोकांकडूनच त्यांची निवड केली जाते. राष्ट्रवादी काँग्रेस हा सामूहिक नेतृत्व असलेला पक्ष आहे.पक्षांतर करून काही नेते इकडे तिकडे जाण्याची तयारी करीत आहेत असे विचारले असता आव्हाड म्हणाले की, ज्यांना संधी आहे असे वाटते ते तिथे जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्यातरी कोणाला घेण्यासाठी जागा नाही. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येतील खऱ्या आरोपींचा शोध सुरू आहे. तपास जरी संथ गतीने वाटत असला तरी यातील खरे आरोपी पकडले जातील. त्यामुळे सत्य बाहेर येणार आहे.