शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

गतवर्षी सोलापूर जिल्ह्याला मिळाले होते ५६ कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:18 IST

सोलापूर : ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील डाळिंबाच्या बागांचे मोठे नुकसान झाले असले तरी यंदा पंतप्रधान विमा योजनेचा लाभ ...

सोलापूर : ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील डाळिंबाच्या बागांचे मोठे नुकसान झाले असले तरी यंदा पंतप्रधान विमा योजनेचा लाभ शेतकर्यांना मिळणार नाही. यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. गतवर्षी जिल्ह्याला विमा योजनेचे ५६ कोटी रुपये मिळाले होते.

शासनाने येत्या तीन वर्षांसाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना जाहीर केली आहे. डाळिंब, चिकू, पेरू, संत्रा, लिंबू या फळ पिकासाठी नवीन निकष निश्चित करण्यात केले आहेत. विशेषत: सोलापूर जिल्ह्यात ४१ हजार हेक्टरपेक्षा अधिक डाळिंबाचे क्षेत्र आहे . मृग बहारमध्ये डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. यंदा अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील डाळिंबाच्या बागांचे नुकसान झाले आहे. जवळपास २५ हजार हेक्‍टर डाळिंबाचे क्षेत्र बाधित झाले आहे. अशा स्थितीत सरकारच्या विमा योजनेचा शेतकऱ्यांना आधार वाटत होता. मात्र नवीन निकषाचा उत्पादकांना फटका बसणार आहे. त्यांना नुकसानभरपाईसाठी दावाच करता येणार नाही.

मागील वर्षी दुष्काळामुळे डाळिंब बागा अडचणीत सापडल्या. पावसाचा खंड हा निकष समाविष्ट असल्याने जिल्ह्यातील २४ हजार ६२५ शेतकऱ्यांना ५६ कोटी रुपये विमा मंजूर झाला होता. यंदा शासनानेच योजनेचे निकष (ट्रिगर ) बदलल्यामुळे विमा कंपन्यांनी हात वर केले आहेत. या बदलाचा सर्वाधिक फटका पंढरपूर आणि सांगोला तालुक्यांना बसणार आहे.

---------

निकषांचा फेरविचार करा : जिल्हाधिकारी

सोलापूर जिल्ह्यात डाळिंबाचे मोठे क्षेत्र आहे. येथील डाळिंब जगाच्या बाजारपेठेत विकला जातो. त्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. बागांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा पडतो, याकडे शासनाचे लक्ष वेधत सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नव्याने तीन वर्षांसाठी जाहीर केलेल्या फळपीक विमा योजनेच्या निकषांचा फेरविचार व्हावा, असे पत्र राज्याच्या कृषी आयुक्तांना दिले आहे.

--------

राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना मी स्वतः नव्या पीक विमा योजनेच्या निकषासंदर्भात बोललो आहे. जुने निकष आणि नवीन याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी शंभरकर साहेबांनी यासंदर्भात कृषी आयुक्तांशी पत्रव्यवहारही केला आहे.

- रवींद्र माने , प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर